शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात रबीचा पेरा वाढणार!

By admin | Updated: September 24, 2015 23:58 IST

राज्यात यावर्षी सरासरी पावसाचे प्रमाण घटले आहे; परंतु परतीच्या पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून

अकोला : राज्यात यावर्षी सरासरी पावसाचे प्रमाण घटले आहे; परंतु परतीच्या पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, रबी हंगामासाठी मशागतीला वेग आला आहे. कृषी विभागानेही यावर्षी राज्यात ५५ लाख हेक्टरपेक्षा अधिक रबी हंगामाचे नियोजन केले आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांना मात्र पावसाची प्रतीक्षा आहे.२०१३-१४ मध्ये राज्यात अतिवृष्टी झाली. परतीच्या पावसानेही चांगलाच मुक्काम ठोकल्याने त्याचा फायदा रबी हंगामाला झाला होता. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांनी ६० लाख हेक्टरच्या वर रबी पिकांची पेरणी केली होती; मात्र २०१४-१५ मध्ये पावसाने पाठ फिरवल्याने रबी हंगाम कोरडा गेला. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली; परंतु परतीच्या पावसाने पंधरा दिवस बऱ्यापैकी हजेरी लावल्याने यावर्षी रबी हंगामासाठी पोषक वातावरण तयार झाले असल्याने कृषी विभागाने यावर्षी रबी हंगामातील पीक पेरणीचे उद्दिष्ट वाढवले आहे. या विभागात खरीप हंगामातील ३२ लाख हेक्टरपैकी १७ लाख हेक्टरपर्यंत सोयाबीनची पेरणी झाली आहे.सोयाबीनच्या क्षेत्रावर शेतकरी रबी हंगामातील पिके घेतात. यासाठी जमिनीत भरपूर ओलाव्याची नितांत गरज असते. म्हणूनच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला रबी पिकांच्या पेरणीसाठी परतीच्या पावसाची प्रतीक्षा आहे.दरम्यान, यावर्षी कृषी विभागाने रबीचे उद्दिष्ट वाढवले असून, अमरावती विभागासाठी जवळपास ९ लाख ५७ हजार हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे विभागासाठी २२ लाख हेक्टर, औरंगाबाद विभाग ८ लाख ६० हजार हेक्टर, लातूर विभाग १२ लाख हेक्टर, कोल्हापूर विभाग ५ लाख हेक्टरवर, नागपूर विभाग ४ लाख १३ हजार हेक्टर, नाशिक विभाग ४ लाख १५ हजार हेक्टर, तर कोकणात ३४ लाख हेक्टर क्षेत्रावर रबी पेरणी केली जाणार आहे.