शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

पश्‍चिम विदर्भात नऊ लाख हेक्टरवर होणार रब्बीची पेरणी!

By admin | Updated: September 19, 2016 02:54 IST

पश्‍चिम विदर्भातील शेतकरी रब्बी हंगामात सर्वाधिक हरभरा, तर पूर्व विदर्भात जवस या पिकाची पेरणी; गव्हाचे क्षेत्र वाढणार!

अकोला, दि. १८ : एक महिन्याच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने रब्बी हंगामासाठी शेतकर्‍यांनी कंबर कसली आहे. या अनुकूल स्थितीमुळे पश्‍चिम विदर्भात यावर्षी रब्बीची पेरणी नऊ लाख हेक्टर क्षेत्रावर होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत असून कृषी विभागाने यासाठीचे नियोजन केले आहे. पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे पश्‍चिम विदर्भात मागील वर्षी रब्बीची पेरणी घटली होती. तथापि २0१४ मध्ये मात्र ८ लाख ४६ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी शेतकर्‍यांनी केली होती. सर्वाधिक पेरणी बुलडाणा जिल्हय़ात २ लाख ४३ हजार हेक्टरवर झाली होती. यवतमाळ जिल्ह्यात १ लाख ७७ हजार हेक्टर, अमरावती १ लाख ५७ हजार हेक्टर, अकोला १ लाख ४१ हजार, तर वाशिम जिल्हय़ात १ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करण्यात आली होती आणि पावसाचा ओलावा अधिक असल्याने रब्बी पिके चांगली होती; परंतु काढणीच्यावेळी या पावसाने शेतकर्‍यांना दगा दिलाच होता. यावर्षी पुन्हा परतीच्या पावसाने शेतकर्‍यांना दिलासा दिल्याने रब्बी हंगामासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यावर्षी रब्बीचे क्षेत्र वाढणार आहे. पश्‍चिम विदर्भातील शेतकरी रब्बी हंगामात सर्वाधिक हरभरा, तर पूर्व विदर्भात जवस या पिकाची पेरणी करतात. करडी, मोहरी व गहू या पिकांचा पेराही केला जातो. गहू पिकाला अलीकडे पाण्याची गरज असल्याने संरक्षित सिंचनाची ज्यांच्याकडे सोय आहे, ते शेतकरी गहू पेरणी करतात. तथापि, यंदा पश्‍चिम विदर्भातील काही धरणांमध्ये बर्‍यापैकी जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे गव्हाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

 

****

  परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने  यावर्षी रब्बी हंगामातील पिकांचे क्षेत्र वाढेल. त्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी हरभर्‍यासह गहू पिकाचे क्षेत्र वाढणार आहे.

    - एस.आर. सरदार, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती.