शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

रबीचे क्षेत्र अर्ध्यावर

By admin | Updated: November 27, 2014 00:18 IST

अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम बुडाला. आता रबी हंगामाचीही अशीच परिस्थिती आहे. पाण्याची पातळी खाली गेल्याने नागपूर जिल्ह्यातील रबी हंगामाचे क्षेत्र अर्ध्यावर आले आहे.

कमी पावसाचा परिणाम : गहू, हरभरा उत्पादक संकटातनागपूर : अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम बुडाला. आता रबी हंगामाचीही अशीच परिस्थिती आहे. पाण्याची पातळी खाली गेल्याने नागपूर जिल्ह्यातील रबी हंगामाचे क्षेत्र अर्ध्यावर आले आहे. जिल्ह्याचे रबी हंगामाचे सरासरी क्षेत्र १४४६३० हेक्टर आहे. २६ नोव्हेंबरपर्यंत ३९ टक्के म्हणजेच ५६,८९३ हेक्टर क्षेत्रात पेरणी आहे. १५ डिसेंबरपर्यत गव्हाची पेरणी शक्य आहे. यात १० ते १५ हजार हेक्टर क्षेत्राची भर पडण्याची आशा आहे. असे असले तरी सरासरीच्या ५० ते ५५ टक्के क्षेत्रात रबी हंगाम घेतला जाणार आहे. पारशिवनी तालुक्यात सर्वात कमी ७ टक्के तर काटोल व रामटेक तालुक्यात सर्वाधिक ७५ टक्के पेरणी झाली आहे. ३००० हेक्टर क्षेत्रात ज्वारीचे पीक घेतले जाते. यंदा ६३१ हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली आहे. गव्हाच्या ८५००० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २२१४३ तर ९५००० च्या तुलनेत २८४९५ हेक्टर क्षेत्रात हरभरा लावण्यात आला आहे. गळीत पिकांनाही फटका बसला आहे. २५०० च्या तुलनेत ३३१ हेक्टरमध्ये जवस , ४०० च्या तुलनेत १७३ हेक्टरमध्ये करडई, ३०० हेक्टर क्षेत्रात तीळाचे पीक घेतले जाते. यावर्षी २९ हेक्टर क्षेत्रात हे पीक घेतले जात आहे. रबीच्या इतर पिकांचीही अशीच अवस्था आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने रबी हंगामाचे नियोजन केले होते. गेल्या पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊ स पडला. त्यामुळे जमिनीत ओलवा नसल्याने गहू व हरभऱ्याच्या पिकाला फटका आहे. तसेच अनेक गावात उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता अहे. (प्रतिनिधी)