शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

रब्बीवर अवकाळी

By admin | Updated: February 12, 2015 03:24 IST

राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पाऊस व गारपिटीने तडाखा दिला असून खान्देश, अकोला, अमरावतीत रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

मुंबई : राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पाऊस व गारपिटीने तडाखा दिला असून खान्देश, अकोला, अमरावतीत रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खान्देशात मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे ज्वारी व गहू आडवा झाला. जळगाव जिल्ह्यात या दोन्ही पिकांचे ३० ते ३५ टक्के नुकसान होण्याची भीती आहे. तर हरभऱ्यामध्ये घाटेअळी, तुडतुडे पडण्याची शक्यता आहे. पावसाने कापसाची बोंडे काळवंडली आहेत. जिल्ह्यात चार लाख ६२ हजार हेक्टरवर कापूस आहे. सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या तडाख्याने गहू व ज्वारी आडवी झाली आहे. यंदा हरभऱ्याचे क्षेत्र थंडी व ओलाव्यामुळे वाढले. मात्र पावसामुळे घाटेअळी फोफावेल. कृषि विभागाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. धुळे जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या गारपीटचा तडाखा साक्री आणि धुळे तालुक्याला अधिक बसला आहे. गहू, मका, डाळींब, द्राक्ष, मिरची, टमाटे, ऊस व कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. विदर्भात अमरावती व अकोला जिल्ह्याला पाऊस व गारपिटीने तडाखा दिला. अमरावती जिल्ह्यात मंगळवारी रात्री वादळवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गहू जमीनदोस्त झाला. संत्र्याचा आंबिया बहार गळाल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. आंब्याचा मोहोरही झडला. अकोला जिल्ह्याच्या काही भागात गाराही पडल्याने हरभरा, गहू, आंब्याचे नुकसान झाले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)