शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

नक्षल्यांच्या प्रतिवादाचा ‘कोटमी’ पॅटर्न

By admin | Updated: December 27, 2015 01:54 IST

नक्षली चळवळीमुळे संवेदनशील बनलेल्या एटापल्ली तालुक्यातील कोटमी हे नक्षलवाद्यांचा प्रभावाखालील गाव आता कात काटत आहे. नक्षली चळवळीमुळे विकास खुंटल्याची जाणीव गावकऱ्यांना

- अभिनय खोपडे / रवी रामगुंडेवार,  गडचिरोली

नक्षली चळवळीमुळे संवेदनशील बनलेल्या एटापल्ली तालुक्यातील कोटमी हे नक्षलवाद्यांचा प्रभावाखालील गाव आता कात काटत आहे. नक्षली चळवळीमुळे विकास खुंटल्याची जाणीव गावकऱ्यांना झाली अन् शेकडो लोक आता समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी पुढे आले आहेत. गेल्या वर्षभरात गडचिरोली पोलीस दलाकडे ५२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यात एकट्या कोटमी गावातील २२ नक्षल सदस्यांचा समावेश आहे. एटापल्ली तालुका मुख्यालयापासून ३५ किमी अंतरावरील कोटमी गावात कायम नक्षलवाद्यांचा वावर राहायचा. चकमकी, भूसुरूंग स्फोट व नक्षलवाद्यांकडून नागरिकांच्या हत्येच्या घटनांमुळे या भागात विकासाला कधीही गती मिळाली नाही. अनेक गावांपर्यंत रस्ते पोहोचलेले नाहीत. वीज नाही, आरोग्य, शाळेचा प्रश्न सुटला नाही. त्यातून मार्ग काढण्यासाठी गावातील काही शिक्षित तरुण त्या दिशेने कामालाही लागले होते. त्यातच १९ फेब्रुवारी २०१५ रोजी एटापल्ली तालुक्यातील कोटमी येथे पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रांतर्गत कसनसूर, जारावंडी, हालेवारा या तीन उपपोलीस ठाण्यांमध्ये समाविष्ट असलेली २२ गावे जोडण्यात आली. त्यात एटावाही, कोंदावाही, झुरी, सासावंडी या नक्षली कारवायांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या मोठ्या गावांचाही समावेश होता. २० किमीच्या परिघातील गावे कोटमी पोलीस मदत केंद्राच्या क्षेत्रात देण्यात आली व पोलीस ठाणे झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अशोक संजय भापकर यांच्याकडे ठाणेदार पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. पोलीस प्रशासनाने भापकरांच्या नेतृत्वात या भागात शासनाचे अनेक उपक्रम सुरू केले. जनजागरण मेळावे, ग्रामभेटी, नवजीवन अभियान, अग्नीपंख आदी उपक्रम लोकांपर्यंत नेण्यात आले. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या कारवायांना कंटाळलेल्या लोकांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा संकल्प केला. त्यातून एकट्या कोटमी पोलीस मदत केंद्रांतर्गत २२ नक्षल सदस्यांनी गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासनासमोर आत्मसमर्पण केले. दोन नक्षलवाद्यांना अटकही करण्यात आली. पोलीस ठाण्याअंतर्गत चार चकमकीही झाल्या. मात्र कोटमीतील परिवर्तनाने नक्षल चळवळीला हादरा तर दिलाच, शिवाय दुर्गम भागात कायम नक्षल्यांच्या दहशतीत जगणाऱ्या शेकडो आदिवासी गावांमध्ये नवा पंचप्राण फुंकण्याचे काम झाले. ३५ किमी जंगलव्याप्त परिसरात पसरलेल्या कोटमी आणि रेगडी या दोन पोलीस मदत केंद्रांतर्गत पोलीस यंत्रणेला गेल्या वर्षभरात चांगले यश मिळाले. आत्मसमर्पण केलेल्या ५२पैकी २२ नक्षलवादी कोटमी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील आहेत. जिल्ह्यात ८४ गावांनी नक्षल्यांना गावबंदी केली आहे. - संदीप पाटील,जिल्हा पोलीस अधीक्षक, गडचिरोली