शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

मेंढपाळांवरील हल्ले त्वरीत रोखा, अन्यथा रस्त्यावर उतरु; महाराष्ट्र यशवंत सेनेचा सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 20:42 IST

मेंढपाळांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी ६ ऑगस्टला राज्यभरात जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयवर निवेदन देणार

ठळक मुद्देमेंढपाळांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी देण्यात यावी.मेंढपाळ बांधवांच्या विध्यार्थांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र होस्टेल तयार करण्यात याव्यात.प्रत्येक मेंढपाळ बांधवाना फिरते रेशनकार्ड मिळावे.

मुंबई - राज्यातील मेंढपाळ बांधवांवरती होणारे हल्ले, अन्याय व अत्याचार विरोधात स्वतंत्र कडक कायदा करा, मेंढपाळांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करा अशी मागणी महाराष्ट्र यशवंत सेनेने केली आहे स्वतः ची शेती नसल्यामुळे किंवा पुरेश्या चाऱ्या अभावी आपले गाव सोडून गावोगावी भटकंती करून मेंढपाळ आपला उदरनिर्वाह करतात मात्र या मेंढपाळ बांधवांवरती गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गावगुंड, टवाळखोर यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण खूप वाढलेले आहे असा आरोप महाराष्ट्र यशवंत सेनेने केला आहे.

याबाबत महाराष्ट्र यशवंत सेनेचे सरचिटणीस संतोष वाघमोडे म्हणाले की, बरेच ठिकाणी मेंढपाळांवरील हल्ल्याची तक्रार तर लांबच साधी दखल ही स्थानिक गावगुंडांच्या राजकीय आर्थिक दबावामुळे पोलीस प्रशासन घेत नाही. सद्य स्थितीत राज्यात रोज अशी दोन ते तीन प्रकरणे  कुठे तरी घडतच आहेत.  शेतीव्यवसाय प्रमाणेच फार मोठ्या प्रमाणात मेंढपाळ हा व्यवसाय राज्यात केला जातो. म्हणून या गोष्टीची व मेंढपाळांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी ६ ऑगस्टला राज्यभरात जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयवर निवेदन देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

काय आहेत मेंढपाळांच्या प्रमुख मागण्या?

१) मेंढपाळांच्यावर हल्ला, अन्याय व‌ अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी ऐट्रोसिटी सारखा स्वतंत्र कायदा व्हावा व त्वरित रू ५ लाखाचे अर्थ सहाय्य मिळावे.

२) मेंढपाळांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी देण्यात यावी.

३) मेंढरांची विक्री होण्यासाठी पूर्वी प्रमाणे जनावरांचे आठवडे बाजार त्वरित सुरू करावेत.

४) महाराष्ट्रात मेंढपाळांसाठी चराऊ कुरणे आरक्षित करून ती मेंढपाळांसाठी खुली करण्यात यावीत. दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये चारा छावणी सुरू करण्यात याव्यात

५) नैसर्गिक आपत्ती किंवा हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात आणि रस्ते अपघातात होणाऱ्या नुकसानाची भरपाई कोणतीही आडकाठी न येता त्वरीत मेंढपाळच्या खात्यात मिळावी.

६) प्रत्येक मेंढपाळ बांधवाना फिरते रेशनकार्ड मिळावे.

७) मेंढपाळ लोकांना मेंढ्या खरेदी साठी विशेष अनूदान व बिनव्याजी कर्ज मिळावे.

८) आजपर्यंत अनेक मेंढपाळांवर अन्याय,अत्याचार व हल्ल्याच्या घटनांचे कोर्टात केस चालू आहेत त्या फास्टट्रॅक कोर्टात घेऊन दोषीना त्वरीत शिक्षा मिळावी.

९) मेंढपाळ बांधवांच्या विध्यार्थांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र होस्टेल तयार करण्यात याव्यात.

१०) पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास व उद्योजकता महामंडळावरती प्रत्यक्ष मेंढपाळबांधवांना काम करण्याची संधी मिळावी.

या सर्व मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा येत्या काळात मेंढपाळ बांधवांच्या सन्मासाठी महाराष्ट्र‌ यशवंत सेनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा विषय झाला तर याची सर्वस्वी जवाबदारी शासनाची असेल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र यशवंत सेनेचे प्रमुख राजू झंजे यांनी दिली आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकार