शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न चिघळला

By admin | Updated: November 25, 2014 01:54 IST

अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नावर राज्यातील सर्व शिक्षक संघटनांसोबत शिक्षकमंत्र्यांनी बोलावलेली बैठक केवळ चर्चेचा फार्स ठरली.

मुंबई : अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नावर राज्यातील सर्व शिक्षक संघटनांसोबत शिक्षकमंत्र्यांनी बोलावलेली बैठक केवळ चर्चेचा फार्स ठरली. शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावरून घूमजाव केल्याने शिक्षक भारती आणि शिक्षक परिषद या संघटनांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
शाळांच्या संच मान्यतेमुळे निर्माण झालेल्या हजारो अतिरिक्त शिक्षक व शिक्षणसेवकांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रश्नाबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील सर्व संघटनांची बैठक आयोजित केली होती. ही बैठक निष्फळ ठरल्याने शिक्षक संघटना संतप्त झाल्या आहेत. विशेष अधिवेशनात शिक्षणमंत्र्यांनी संच मान्यतेबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना पुढील दोन दिवसांत संच मान्यतेला स्थगिती देणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु या बैठकीत याबाबतचा निर्णय न झाल्याने शिक्षणमंत्र्यांच्या या घूमजाव भूमिकेचा निषेध करण्यासाठी येत्या शनिवारपासून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक भारती संघटनेने दिला आहे.
या विषयावर शिक्षक भारतीने राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांची बैठक 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता शिक्षक भारतीच्या परळ येथील कार्यालयात आयोजित केली आहे. या संघटनेसह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनेही 27 नोव्हेंबरला राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे आंदोलन होणार असून, त्यात शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक सहभागी होणार आहेत.
 
कृती समितीचे आज आंदोलन : शिक्षण विभागाने शाळांचे फेरमूल्यांकन सुरू करण्याचा घाट घातला आहे. याविरोधात महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे मंगळवारी आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात राज्यभरातील शिक्षक सहभागी होणार आहेत.