शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

शेतकऱ्यांपुढे जगावं की मरावं हा सवाल - नाना पाटेकर यांची खंत

By admin | Updated: March 6, 2016 01:02 IST

जगावं की मरावं, हा एकच सवाल सध्या शेतकऱ्यांना सतावत आहे. कर्जमाफीने त्यांच्या समस्या मिटणार नाहीत. त्यांना शेतीसाठी केवळ वीज, पाणी आणि शेतीमालाला हमीभाव हवा आहे.

पुणे : जगावं की मरावं, हा एकच सवाल सध्या शेतकऱ्यांना सतावत आहे. कर्जमाफीने त्यांच्या समस्या मिटणार नाहीत. त्यांना शेतीसाठी केवळ वीज, पाणी आणि शेतीमालाला हमीभाव हवा आहे. शेती टिकवायची असेल, तर पाणी अडवण्यापेक्षा ग्रामीण भागातील मुलांसाठी ‘अडवा आणि जिरवा’ योजना अमलात आणली पाहिजे, असे मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले. सिंबायोसिस स्पोटर््स सेंटरतर्फे क्रीडाभूषण पुरस्कार रायफल शूटर दीपाली देशपांडे यांना पाटेकर यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शां.ब.मुजुमदार अध्यक्षस्थानी होते. यावेळी अस्थिरोगतज्ज्ञ पराग संचेती, सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका विद्या येरवडेकर, सिंबायोसिस स्पोर्टस सेंटरचे मानद संचालक डॉ. सतीश ठिगळे आदि मान्यवर उपस्थित होते.पाटेकर म्हणाले, ‘कारण, आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करण्याची क्षमता तरुणांमध्ये आहे. पारंपरिक शेतीने आता शेतक-यांचे भले होणार नाही. नाम फाऊंडेशनच्या निमित्ताने सुख- दु:खाच्या ख-या व्याख्या समजू लागल्या आहेत. राजकारण्यांना नावे ठेवण्यात वेळ वाया न घालवता शेतक-यांना मदत करण्याच्या निमित्ताने मरेपर्यंत जगण्यासाठी एक कारण मिळाले आहे.’अभिनेत्याच्या मनातील भावनांचा कल्लोळ शब्दबध्द करताना नाना पाटेकर म्हणाले, ‘खेळामध्ये भावना बाजूला ठेवाव्या लागतात. अभिनेता मात्र इतरांच्या भावना, दु:खे घेऊन जगत असतो. त्याला स्वत:च्या भावना बाजूला ठेवाव्या लागतात. अभिनेत्याचा प्रवास हा अश्वत्थाम्यासारखा असतो. प्रत्येक देशाची भावनिक आंदोलने वेगवेगळी असतात. पण, आपण जसे आहोत, तसेच राहणारा नट खरा कलाकार असतो. कारण, अभिनय एका चौकटीत बांधील राहू शकत नाही. त्याची लाटच आली पाहिजे. मुजुमदार म्हणाले, ‘जगण्यासाठी श्रीमंती नव्हे तर दिलदार ह्रदय लागते. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेकांचे अश्रू पुसायला मदत होईल.’नानांच्या पुण्यकार्यात खारीचा वाटा म्हणून सिंबायोसिसच्या वतीने नाम फाऊंडेशनला दहा लाखांचा तसेच संजीवनी मुजुमदार यांच्या वतीने वैयक्तिक एक लाख रुपयांचा निधी सुपूर्त करण्यात आला. यावेळी दीपाली देशपांडे म्हणाल्या, ‘‘२०२० नंतरच्या आॅलिंपिकमध्ये प्रत्येक विभागात भारताला किमान एक पदक मिळावे, अशी माझी इच्छा आहे. त्यादृष्टीने लक्ष्य फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रशिक्षण घेण्याचे काम सुरु आहे.’’यावेळी ज्ञानदा तायडे या विद्यार्थिनीने आपल्या खाऊचे पैसे वाचवून नाम फाऊंडेशनसाठी धनादेश दिला. स्वाती दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)