शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

एसटीच्या सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: October 27, 2014 02:09 IST

‘एसटीचा प्रवास, सुरक्षित प्रवास’ हे वाक्य नियमित आपल्या कानी पडते. मात्र पुणे विभागात ९ महिन्यांत एसटीचे तब्बल ११८ अपघात घडले आहेत.

अमोल जायभाये, पिंपरी‘एसटीचा प्रवास, सुरक्षित प्रवास’ हे वाक्य नियमित आपल्या कानी पडते. मात्र पुणे विभागात ९ महिन्यांत एसटीचे तब्बल ११८ अपघात घडले आहेत. त्यामुळे एसटीचा प्रवास सुरक्षित कसा, हा प्रश्न उपस्थित होत आहे. या अपघातात मनुष्यहानीबरोबरच एसटीचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले़ हे वाढते अपघात रोखण्यासाठी महामंडळाला तातडीने उपाययोजना आखाव्या लागणार आहेत. पुणे विभागात १ जानेवारी ते ९ आॅक्टोबर या कालावधीत ११८ अपघात घडले आहेत. यात २७ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर २२१ जखमी झाले आहेत. ‘गाव तिथे एसटी’ आहे. तिच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनांचा अजूनही अभाव आहे. बसस्थानकांवर मोठ्या प्रमाणात पाकीटमारी होते. प्रवाशांच्या सेवेशी एकनिष्ठ असणाऱ्या एसटीला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या उपाययोजना करता आल्या नाहीत हे वास्तव नाकारता येणार नाही़ एसटीला नफ्यात आणण्यासाठी उपाययोजना सुरू असतात. प्रवासी दिन, प्रवासात सवलत अशा योजना आखूनही एसटी तोट्यात चालत आहे. ग्रामीण भागात खिळखिळ्या बस धावत आहेत. रस्त्यातच एसटी बंद पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. तुटलेल्या-फाटलेल्या सीट, काचा नसलेल्या खिडक्या हे नेहमीचेच आहे. अनेक अपघात हे टायर फुटल्याने किंवा स्टिअरिंग फेल झाल्यानेही घडले आहेत. अनेकदा चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडतात. चालक, वाहकाची पदे रिक्त आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे नियमित काम करावे लागणे किंवा जास्त वेळ गाडी चालवल्यामुळे, चालकाची झोप होत नसल्यानेही अपघात घडल्याची उदाहरणे आहेत़ चालकांना सुट्या मिळत नासल्याने त्यांना पुरेसा आराम मिळत नाही. त्यांची मानसिक अवस्था वाहन चालवण्यासाठी सुयोग्य नसते. त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी होते का, पुरेसे वेतन आहे का, या सर्व गोष्टी पाहणेही गरजेचे आहे.