शहरं
Join us  
Trending Stories
1
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
2
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
3
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
4
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
5
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
6
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
7
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
8
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
9
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
10
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
11
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
12
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
13
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
14
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
15
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
16
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
17
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
18
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
19
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
20
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी

ऐतिहासिक स्थळांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह

By admin | Updated: May 7, 2017 01:28 IST

ऐतिहासिक व वैभवशाली अशा दुहेरी सोनेरी इतिहासाची साक्ष असणारा वसई तालुका पुरातत्व विभागाच्या दृष्टीने दुर्लक्षणीय ठरला

लोकमत न्यूज नेटवर्कविरार : ऐतिहासिक व वैभवशाली अशा दुहेरी सोनेरी इतिहासाची साक्ष असणारा वसई तालुका पुरातत्व विभागाच्या दृष्टीने दुर्लक्षणीय ठरला आहे. राज्य पुरातत्व व केंद्रीय पुरातत्व विभाग मिळून वसई तालुक्यातील केवळ ५ स्मारके, वास्तू पुरातत्व विभागाच्या संरक्षित यादीत येतात. केंद्रीय पुरातत्व विभागात सोपारा स्तूप, बुरूडकोटÞ, सोनारभाट, गासÞटाकी, उमराळे बोळींज़, वसई किल्ला, अर्नाळा किल्ला यांचा समावेश होतो. प्रत्यक्षात या संरक्षित वास्तूंची संख्या मोजकीच असली तरीही त्याच्या संवर्धनाची बोंबाबोंब कायमच आहे. वसई तालुक्यात २०० हून अधिक ऐतिहासिक स्थानी प्राचीन मूर्त्या समाधी किल्ले आहेत. यातील बरेच अवशेष अत्यंत विखुरलेल्या व बिकट अवस्थेत शेवटचे क्षण मोजत आहेत.या वास्तूंचे संवर्धन कधी व कोण करणार हा प्रश्न आहे. यातील बरेच अवशेष इतिहासाची साक्ष आहेत.ऐतिहासिक कागदपत्रांतून डोकावणारी ही गावे व त्यातील वैशिष्टयपूर्ण अवशेष संकलित करणे काळाची गरज आहे. आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या विखुरलेल्या इतिहासाच्या खूणा जपण्यासाठी पुरातत्व विभागाने ५० वर्षे वाया घालवली आहेत. येत्या काळात पुरातत्व विभागाच्या संरक्षित स्मारकां व्यतिरिक्त इतर स्मारके आणि वास्तू , जतन करणारी अशी कोणतीही व्यवस्था अस्तित्वात नाही. आणि पुढे होईल, अशी चिन्हेही दिसत नाहीत. यामुळे वसई तालुक्याच्या ऐतिहासिक अवशेषांचे भवितव्य अंधकार:मय आहे. वसई तालुक्याच्या प्रदीर्घ इतिहासात बिंब  ञैकुट, अभिर, मौर्य, राष्ट्रकुट, चालुक्य शिलाहार, सातवाह़न, मौर्य, पोर्तुगीज, ब्रिटीश, मराठे इत्यादी राजवटी होऊन गेल्यात वसई तालुक्यातील प्रत्येक गावागावांत असणारे किल्ले , मूर्त्या, लेणी, समाधी,  नाणी, वास्तु स्मारके, शिला लेख इत्यादींचे संशोधन व संवर्धन होणार तरी कधी? ते तत्परतेने झाल्यास सामाजिक, आर्थिक, राजकीय, भौगोलिक इतिहास संकलनास व संशोधनास एक नवीन दिशा उपलब्ध होईल. ज्या व्यक्ती आणि संस्था यांना इतिहास संशोधन व संवर्धनात स्वारस्य आहे. त्यांची सातत्यपूर्ण मदत पुरातत्व खात्याने घेतल्यास या कामाला गती मिळू शकते. यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचा ठाम संकल्प व निर्णय घेण्याची आज आवश्यकता आहे, असे किल्ले वसई मोहीमेचे श्रीदत्त राऊत यांनी लोकमत न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले.