शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

ऐतिहासिक स्थळांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह

By admin | Updated: May 7, 2017 01:28 IST

ऐतिहासिक व वैभवशाली अशा दुहेरी सोनेरी इतिहासाची साक्ष असणारा वसई तालुका पुरातत्व विभागाच्या दृष्टीने दुर्लक्षणीय ठरला

लोकमत न्यूज नेटवर्कविरार : ऐतिहासिक व वैभवशाली अशा दुहेरी सोनेरी इतिहासाची साक्ष असणारा वसई तालुका पुरातत्व विभागाच्या दृष्टीने दुर्लक्षणीय ठरला आहे. राज्य पुरातत्व व केंद्रीय पुरातत्व विभाग मिळून वसई तालुक्यातील केवळ ५ स्मारके, वास्तू पुरातत्व विभागाच्या संरक्षित यादीत येतात. केंद्रीय पुरातत्व विभागात सोपारा स्तूप, बुरूडकोटÞ, सोनारभाट, गासÞटाकी, उमराळे बोळींज़, वसई किल्ला, अर्नाळा किल्ला यांचा समावेश होतो. प्रत्यक्षात या संरक्षित वास्तूंची संख्या मोजकीच असली तरीही त्याच्या संवर्धनाची बोंबाबोंब कायमच आहे. वसई तालुक्यात २०० हून अधिक ऐतिहासिक स्थानी प्राचीन मूर्त्या समाधी किल्ले आहेत. यातील बरेच अवशेष अत्यंत विखुरलेल्या व बिकट अवस्थेत शेवटचे क्षण मोजत आहेत.या वास्तूंचे संवर्धन कधी व कोण करणार हा प्रश्न आहे. यातील बरेच अवशेष इतिहासाची साक्ष आहेत.ऐतिहासिक कागदपत्रांतून डोकावणारी ही गावे व त्यातील वैशिष्टयपूर्ण अवशेष संकलित करणे काळाची गरज आहे. आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या विखुरलेल्या इतिहासाच्या खूणा जपण्यासाठी पुरातत्व विभागाने ५० वर्षे वाया घालवली आहेत. येत्या काळात पुरातत्व विभागाच्या संरक्षित स्मारकां व्यतिरिक्त इतर स्मारके आणि वास्तू , जतन करणारी अशी कोणतीही व्यवस्था अस्तित्वात नाही. आणि पुढे होईल, अशी चिन्हेही दिसत नाहीत. यामुळे वसई तालुक्याच्या ऐतिहासिक अवशेषांचे भवितव्य अंधकार:मय आहे. वसई तालुक्याच्या प्रदीर्घ इतिहासात बिंब  ञैकुट, अभिर, मौर्य, राष्ट्रकुट, चालुक्य शिलाहार, सातवाह़न, मौर्य, पोर्तुगीज, ब्रिटीश, मराठे इत्यादी राजवटी होऊन गेल्यात वसई तालुक्यातील प्रत्येक गावागावांत असणारे किल्ले , मूर्त्या, लेणी, समाधी,  नाणी, वास्तु स्मारके, शिला लेख इत्यादींचे संशोधन व संवर्धन होणार तरी कधी? ते तत्परतेने झाल्यास सामाजिक, आर्थिक, राजकीय, भौगोलिक इतिहास संकलनास व संशोधनास एक नवीन दिशा उपलब्ध होईल. ज्या व्यक्ती आणि संस्था यांना इतिहास संशोधन व संवर्धनात स्वारस्य आहे. त्यांची सातत्यपूर्ण मदत पुरातत्व खात्याने घेतल्यास या कामाला गती मिळू शकते. यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचा ठाम संकल्प व निर्णय घेण्याची आज आवश्यकता आहे, असे किल्ले वसई मोहीमेचे श्रीदत्त राऊत यांनी लोकमत न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले.