शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही; तर खासदारकी काय चाटायची काय? - राजू शेट्टी

By admin | Updated: May 19, 2016 19:19 IST

कांद्याला किमान १५ रुपये किलो हमीभाव द्या, अन मग काय रामराज्य करायचं ते करा, असा राज्य व केंद्र सरकारला टोला मारून शेतकऱ्यांचे प्रश्न भिजत राहिले; तर खासदारकी काय चाटायची काय

चाकण येथे रास्ता रोको : शेतकऱ्यांनी महामार्गावर ओतला कांदा; ५ किलोमीटरवर वाहनांच्या रांगाचाकण : कांद्याला किमान १५ रुपये किलो हमीभाव द्या, अन् मग काय रामराज्य करायचं ते करा, असा राज्य व केंद्र सरकारला टोला मारून ह्यशेतकऱ्यांचे प्रश्न भिजत राहिले; तर खासदारकी काय चाटायची काय? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी चाकण येथे केला. कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी चाकण येथे गुरुवार (दि. १९) सकाळी साडेअकराच्या सुमारास शेतकऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्गावर आंबेठाण चौकात रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी खासदार राजू शेट्टी बोलत होते. शेतकऱ्यांनी संतप्त होऊन कांदा महामार्गावर ओतून दिला. या आंदोलनामुळे अर्धा तास महामार्गावर दोन्ही बाजूला ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

राजू शेट्टी म्हणाले, की १९८० च्या दशकात शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली व शेतकऱ्यांचे संघटन करून कांद्यासाठी आंदोलन केले. ३५ वर्षांनंतरही शेतमालाच्या भावासाठी शेतकऱ्यांना वारंवार रस्त्यावर उतरावे लागत आहे. शेतमालाचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश केल्याने जीवनावश्यक वस्तू १९५५ च्या कायद्यानुसार शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार सरकारला प्राप्त झाला. त्यामुळे कांद्याचे भाव वाढले की सरकार हस्तक्षेप करते. पाकिस्तानहून ४० रुपये किलोने कांदा आयात करून शासन येथील शेतकऱ्यांना मातीत घालते, म्हणजे शेतकरी हा पाकिस्तानपेक्षा मोठा शत्रू आहे काय? असा सवाल त्यांनी केला.

या वेळी पोलीस उपविभागीय अधिकारी मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शेतकऱ्यांनी कांद्याला हमीभाव मिळण्याबाबतचे निवेदन मंडलाधिकारी राजाराम मोराळे यांच्याकडे दिले. या आंदोलनात प्रामुख्याने जयप्रकाश परदेशी, दिनेश मोहिते, अनिल देशमुख, गुलाब गोरे, राम गोरे, बाबासाहेब पवार, काळूराम कड, धीरज परदेशी, चंद्रकांत गोरे, बाजीराव जाधव, दशरथ काचोळे, किसन गोरे आदी शेतकरी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.चौकटघामाच्या थेंबा थेंबाचा हिशेब द्याराज्यकर्ते धोरण बनवतात, शेतमाल स्वस्तात देऊन सर्वसामन्यांचा बळी देतात. भीक नको, पण आमच्या घामाच्या थेंबा थेंबाचा हिशेब द्या. कांदा उत्पादनाचा खर्च किलोस १३ रुपये येत असून, सरकार कांद्याला ३ रुपये ते ६ रुपये भाव देत असेल, तर शेतकऱ्याने कर्ज कसे फेडायचे? उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची ग्वाही सरकारने दिली होती, म्हणून कांद्याला किमान १५ रुपये हमीभाव मिळाला पाहिजे व प्रत्येक बाजार समितीमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू करावे, असे राजू शेट्टी या वेळी म्हणाले.शेतकरी गळफास घेतात; सरकारला लाज वाटली पाहिजेदेशात गरजेपेक्षा कांद्याचे उत्पादन जास्त झाले असून, जगभर व देशात मंदीची लाट आहे. उद्योजकांनी १ लाख २५ हजार कोटी कर्ज थकविले म्हणून बँकिंग व्यवसाय अडचणीत आला आहे. उद्योजकांना वसुलीचा तगादा लावू नये, म्हणून बँकांना २५ हजार कोटी दिले जातात आणि लाख मोलाचा ७/१२ गहाण ठेवून १० हजार कर्ज देताना लाज वाटली पाहिजे. शेतकऱ्याने कर्ज थकविले, तर नोटीस फलकावर नाव लावता, त्यांच्या जमिनी लिलाव करून विकता, याचा निषेध केला पाहिजे. कांदा खाल्ला नाही म्हणून कुणी तडफडून मेला नाही, पण कांद्याला २/४ रुपये भाव मिळाला म्हणून कर्ज फेडता आले नाही, म्हणून शेतकरी गळफास घेतात, याची सरकारला लाज वाटली पाहिजे, अशी घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी केली.