शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

‘अभियांत्रिकी’चे ते प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 05:54 IST

पेपरचे मूल्यांकन ८० ऐवजी ७० गुणांचे; मुंबई विद्यापीठाकडून अखेर १० मार्कांचा प्रश्न रद्द

मुंबई : मुंबई विद्यापीठातर्फे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या आठव्या सत्राच्या एसएनएमआर (स्टोरेज नेटवर्क मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रीट्रायवल) या विषयाची परीक्षा १४ मे रोजी घेण्यात आली होती. ८० गुणांच्या या पेपरमधील जवळपास ३० गुणांचे प्रश्न हे जुन्या अभ्यासक्रमातील तसेच अभ्यासक्रमाबाहेरील होते, असा दावा विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. त्याच्या तक्रारी विद्यापीठास प्राप्त झाल्या. त्याची दखल घेत विद्यापीठाने ३ विषय तज्ज्ञांकडून सूचना मागविल्या होत्या. तज्ज्ञांच्या अभ्यासावरून आणि शिफारशींवरून अखेर १० गुणांचा प्रश्न रद्द करण्यात आला असून, आता या पेपरचे मूल्यांकन ७० गुणांमध्ये करण्यात येईल. परंतु अंतिम गुण देताना त्याचे रूपांतर ८० गुणांमध्ये करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने जारी केला आहे.

तज्ज्ञांकडून सुचविण्यात आलेल्या सूचनांनुसार, या पेपरमधील दोन प्रश्न हे अभ्यासक्रमाबाहेरचे आहेत. यातील प्रश्न क्र. १ (बी) हा अनिवार्य आहे व प्रश्न क्र. ४ (ए) हा ऐच्छिक असून विद्यार्थी पाचपैकी कोणतेही तीन प्रश्न सोडवू शकतो. प्रश्न क्र. १ (बी) व प्रश्न क्र. ४ (ए) या दोन्हीही प्रश्नांचा उल्लेख अभ्यासक्रमामध्ये नाही. हे दोन्हीही प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे आहेत, असा निष्कर्ष विद्यापीठाने नियुक्त केलेल्या या ३ विषय तज्ज्ञांकडून विद्यापीठास प्राप्त झाला.

या निष्कर्षाच्या आधारे या विषयाच्या अभ्यास मंडळाच्या (बोर्ड आॅफ स्टडीज) अध्यक्षांनी विद्यापीठास एक प्रस्ताव दिला. या प्रस्तावानुसार विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये याकरिता यातील प्रश्न क्र. १ (बी) हा मूल्यांकनातून (पेपर तपासणीतून) रद्द करण्यात येईल. सदर प्रश्न हा १० गुणांचा आहे. यामुळे राहिलेल्या ७० गुणांचा पेपर तपासून गुण देताना मात्र त्याचे रूपांतर ८० गुणांमध्ये करण्यात येईल. याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना होईल, असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

एसएनएमआर विषयाचा पेपर देणारे हे सर्व विद्यार्थी शेवटच्या वर्षात शिकत आहेत. चुकीच्या प्रश्नांमुळे हे विद्यार्थी या विषयात नापास झाले तर त्यांचे संपूर्ण वर्ष वाया जाईल. ज्या मुलांना महाविद्यालयाच्या प्लेसमेंटद्वारे नोकरी लागेल त्या विद्यार्थ्यांना नोकरीलादेखील मुकावे लागणार आहे. या मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून या प्रश्नांचे पूर्ण गुण विद्यार्थ्यांना देण्यात यावेत आणि प्रश्नपत्रिका ज्या प्राध्यापकांनी काढली त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना दिले होते.विद्यार्थ्यांना फायदाविद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये याकरिता यातील प्रश्न क्र. १ (बी) हा मूल्यांकनातून (पेपर तपासणीतून) रद्द करण्यात येणार आहे. रद्द करण्यात आलेला हा प्रश्न १० गुणांचा आहे. यामुळे राहिलेल्या ७० गुणांचा पेपर तपासण्यात येईल. त्यानुसार विद्यार्थ्यांना जेवढे गुण मिळतील त्याचे रूपांतर ८० गुणांमध्ये करून अंतिम गुण देण्यात येतील. याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना होईल, असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.