शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारच्या २९ गावांचा प्रश्न टांगणीला

By admin | Updated: December 12, 2015 02:13 IST

गेले काही महिने वसई-विरार महापालिकेच्या हद्दीमधून २९ गावे वगळण्याबाबतचा निर्णय सरकारने अधांतरी ठेवला आहे. उच्च न्यायालयाने आॅक्टोबर महिन्यातच राज्य सरकारला याबाबत निर्णय घेण्याचा आदेश दिला होता

मुंबई : गेले काही महिने वसई-विरार महापालिकेच्या हद्दीमधून २९ गावे वगळण्याबाबतचा निर्णय सरकारने अधांतरी ठेवला आहे. उच्च न्यायालयाने आॅक्टोबर महिन्यातच राज्य सरकारला याबाबत निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. मात्र अद्याप या गावांबाबत राज्य सरकारने काहीच निर्णय घेतला नसून, ३१ डिसेंबरपर्यंत ठोस निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शुक्रवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली. वसई-विरार महापालिकेच्या हद्दीतून २९ गावे वगळण्याच्या भूमिकेवर राज्य सरकार ठाम होते आणि तसा शासन निर्णयही काढला. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला त्यांच्या भूमिकेवर फेरविचार करण्यासाठी काही आठवड्यांची मुदतही दिली. तरीही राज्य सरकार गावे वगळण्याच्या भूमिकेवर ठाम होते. मात्र आॅक्टोबरमध्ये अचानकपणे राज्य सरकारने भूमिकेवरून ‘यू-टर्न’ घेतला. २९ गावे वगळण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांची मुदत मागितली. उच्च न्यायालयाने राज्य सरकारची विनंती मान्य केली.शुक्रवारच्या सुनावणीवेळी अ‍ॅड. वग्यानी यांनी कोकण विभागीय आयुक्तांनी १० डिसेंबर रोजी सरकारपुढे अहवाल सादर केला असल्याची माहिती खंडपीठाला दिली. अहवाल सादर केला असला तरी सरकारला त्यावर अभ्यास करायचा आहे. अधिवेशनामुळे अभ्यास करण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे आता ३१ डिसेंबरलाच वसई-विरारच्या माहपालिकेतून २९ गावे वगळायची की ठेवायची याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे खंडपीठाला सांगितले.