शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

वसई-विरारच्या २९ गावांचा प्रश्न टांगणीला

By admin | Updated: December 12, 2015 02:13 IST

गेले काही महिने वसई-विरार महापालिकेच्या हद्दीमधून २९ गावे वगळण्याबाबतचा निर्णय सरकारने अधांतरी ठेवला आहे. उच्च न्यायालयाने आॅक्टोबर महिन्यातच राज्य सरकारला याबाबत निर्णय घेण्याचा आदेश दिला होता

मुंबई : गेले काही महिने वसई-विरार महापालिकेच्या हद्दीमधून २९ गावे वगळण्याबाबतचा निर्णय सरकारने अधांतरी ठेवला आहे. उच्च न्यायालयाने आॅक्टोबर महिन्यातच राज्य सरकारला याबाबत निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. मात्र अद्याप या गावांबाबत राज्य सरकारने काहीच निर्णय घेतला नसून, ३१ डिसेंबरपर्यंत ठोस निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शुक्रवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली. वसई-विरार महापालिकेच्या हद्दीतून २९ गावे वगळण्याच्या भूमिकेवर राज्य सरकार ठाम होते आणि तसा शासन निर्णयही काढला. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला त्यांच्या भूमिकेवर फेरविचार करण्यासाठी काही आठवड्यांची मुदतही दिली. तरीही राज्य सरकार गावे वगळण्याच्या भूमिकेवर ठाम होते. मात्र आॅक्टोबरमध्ये अचानकपणे राज्य सरकारने भूमिकेवरून ‘यू-टर्न’ घेतला. २९ गावे वगळण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांची मुदत मागितली. उच्च न्यायालयाने राज्य सरकारची विनंती मान्य केली.शुक्रवारच्या सुनावणीवेळी अ‍ॅड. वग्यानी यांनी कोकण विभागीय आयुक्तांनी १० डिसेंबर रोजी सरकारपुढे अहवाल सादर केला असल्याची माहिती खंडपीठाला दिली. अहवाल सादर केला असला तरी सरकारला त्यावर अभ्यास करायचा आहे. अधिवेशनामुळे अभ्यास करण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे आता ३१ डिसेंबरलाच वसई-विरारच्या माहपालिकेतून २९ गावे वगळायची की ठेवायची याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे खंडपीठाला सांगितले.