शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

सिंचन घोटाळ्यांवर मात्रा

By admin | Updated: December 15, 2014 04:03 IST

सुमारे ७० हजार कोटींच्या कथित सिंचन घोटाळ्यात आघाडी सरकार पोळल्यानंतर राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपा सरकारने सावधगिरीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

नारायण जाधव, ठाणेसुमारे ७० हजार कोटींच्या कथित सिंचन घोटाळ्यात आघाडी सरकार पोळल्यानंतर राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपा सरकारने सावधगिरीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. संभाव्य घोटाळे टाळण्यासाठी राज्याच्या दरवर्षीच्या सिंचनस्थितीदर्शक अहवालातील माहिती आता महामंडळनिहाय घेण्यात येणार आहे. मोठ्या, मध्यम, लघू प्रकल्पांच्या सिंचनाचा जिल्हानिहाय गोषवारा घेण्याचा निर्णय झाला आहे़ याशिवाय, खबरदारी म्हणून माधवराव चितळेंच्या समितीने सुचविल्यानुसार जलसंपदा विभागासाठी सर्वंकष स्वतंत्र नियमावली तयार करण्याचा आणि पाटबंधारे अधिनियम १९७६मध्ये सुधारणा करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे़ या निर्णयांमुळे जलसंपदा विभागाकडून करण्यात येणाऱ्या कामांत आणि त्यांच्या विविध कंत्राटांत पारदर्शीपणा येईल, असा विश्वास राज्य सरकारला आहे. शिवाय यामुळे राज्याची सिंचनक्षमता वाढले आणि संभाव्य घोटाळे टळता येतील, अशी आशाही या निर्णयामुळे निर्माण झाली आहे. महामंडळनिहाय माहिती सिंचनस्थितीदर्शक अहवालात सध्या विभागनिहाय माहिती देण्यात येते़ याच अहवालाच्या आधारे गेल्या १० वर्षांत ७० हजार कोटी खर्चूनही सिंचन क्षेत्र मात्र एक टक्काही वाढले नसल्याचा आरोप तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर करण्यात आला होता. यातून बोध घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अशा प्रकारे माहिती न देता ती महामंडळनिहाय द्यावी व मोठ्या, मध्यम, लघू प्रकल्पांच्या सिंचनांची जिल्हानिहाय माहिती द्यावी, असा निर्णय घेतला आहे. यात धरणांमध्ये पुढील वर्षासाठी किती पाणीसाठा राखीव आहे, किती पाणी सिंचनासाठी वापरण्यात येणार आहे, त्यात किती क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, तसेच बिगर सिंचन पाणीवापरामध्ये इतर पाणीवापर या शीर्षाखाली पाणीवापराचा तपशील नमूद करण्याचे बंधन घातले आहे़सहा महिन्यांत नवी नियमावलीसार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलसंपदा विभागाकडून करण्यात येणाऱ्या कामांसाठी सध्या महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावली ही एकच नियमावली वापरण्यात येत आहे़ तीसुद्धा १९२९ची आहे़ तिची सहावी आवृत्ती १९८४मध्ये प्रकाशित झाली होती़ त्यानंतर, आजपर्यंत नवीन आवृत्ती प्रसिद्ध झालेली नाही़ मात्र, या नियमावलीत सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभाग यांची कामे एकाच प्रकारे होतात, असे गृहीत धरून त्यात सार्वजनिक बांधकामाच्या बाबींचा जास्त प्रमाणात समावेश आहे़ वास्तविक, जलसंपदा विभागाची कामे पूर्णत: वेगळी आहेत. महामंडळाच्या निर्मितीमुळे कामांत आमूलाग्र बदल झाले आहेत़ जलसंपदा विभागाने स्वतंत्र नियमावली तयार करावी, अशी सूचना जलतज्ज्ञ माधव चितळे यांच्या समितीने केली होती़ त्यानुसार, नव्या सरकारने यासाठी निवृत्त कार्यकारी संचालक एस़एऩ सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली १५ सदस्यीय समिती स्थापन केली आहे़