शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

सिंचन घोटाळ्यांवर मात्रा

By admin | Updated: December 15, 2014 04:03 IST

सुमारे ७० हजार कोटींच्या कथित सिंचन घोटाळ्यात आघाडी सरकार पोळल्यानंतर राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपा सरकारने सावधगिरीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

नारायण जाधव, ठाणेसुमारे ७० हजार कोटींच्या कथित सिंचन घोटाळ्यात आघाडी सरकार पोळल्यानंतर राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपा सरकारने सावधगिरीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. संभाव्य घोटाळे टाळण्यासाठी राज्याच्या दरवर्षीच्या सिंचनस्थितीदर्शक अहवालातील माहिती आता महामंडळनिहाय घेण्यात येणार आहे. मोठ्या, मध्यम, लघू प्रकल्पांच्या सिंचनाचा जिल्हानिहाय गोषवारा घेण्याचा निर्णय झाला आहे़ याशिवाय, खबरदारी म्हणून माधवराव चितळेंच्या समितीने सुचविल्यानुसार जलसंपदा विभागासाठी सर्वंकष स्वतंत्र नियमावली तयार करण्याचा आणि पाटबंधारे अधिनियम १९७६मध्ये सुधारणा करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे़ या निर्णयांमुळे जलसंपदा विभागाकडून करण्यात येणाऱ्या कामांत आणि त्यांच्या विविध कंत्राटांत पारदर्शीपणा येईल, असा विश्वास राज्य सरकारला आहे. शिवाय यामुळे राज्याची सिंचनक्षमता वाढले आणि संभाव्य घोटाळे टळता येतील, अशी आशाही या निर्णयामुळे निर्माण झाली आहे. महामंडळनिहाय माहिती सिंचनस्थितीदर्शक अहवालात सध्या विभागनिहाय माहिती देण्यात येते़ याच अहवालाच्या आधारे गेल्या १० वर्षांत ७० हजार कोटी खर्चूनही सिंचन क्षेत्र मात्र एक टक्काही वाढले नसल्याचा आरोप तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर करण्यात आला होता. यातून बोध घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अशा प्रकारे माहिती न देता ती महामंडळनिहाय द्यावी व मोठ्या, मध्यम, लघू प्रकल्पांच्या सिंचनांची जिल्हानिहाय माहिती द्यावी, असा निर्णय घेतला आहे. यात धरणांमध्ये पुढील वर्षासाठी किती पाणीसाठा राखीव आहे, किती पाणी सिंचनासाठी वापरण्यात येणार आहे, त्यात किती क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, तसेच बिगर सिंचन पाणीवापरामध्ये इतर पाणीवापर या शीर्षाखाली पाणीवापराचा तपशील नमूद करण्याचे बंधन घातले आहे़सहा महिन्यांत नवी नियमावलीसार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलसंपदा विभागाकडून करण्यात येणाऱ्या कामांसाठी सध्या महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावली ही एकच नियमावली वापरण्यात येत आहे़ तीसुद्धा १९२९ची आहे़ तिची सहावी आवृत्ती १९८४मध्ये प्रकाशित झाली होती़ त्यानंतर, आजपर्यंत नवीन आवृत्ती प्रसिद्ध झालेली नाही़ मात्र, या नियमावलीत सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभाग यांची कामे एकाच प्रकारे होतात, असे गृहीत धरून त्यात सार्वजनिक बांधकामाच्या बाबींचा जास्त प्रमाणात समावेश आहे़ वास्तविक, जलसंपदा विभागाची कामे पूर्णत: वेगळी आहेत. महामंडळाच्या निर्मितीमुळे कामांत आमूलाग्र बदल झाले आहेत़ जलसंपदा विभागाने स्वतंत्र नियमावली तयार करावी, अशी सूचना जलतज्ज्ञ माधव चितळे यांच्या समितीने केली होती़ त्यानुसार, नव्या सरकारने यासाठी निवृत्त कार्यकारी संचालक एस़एऩ सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली १५ सदस्यीय समिती स्थापन केली आहे़