शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती; युद्धविरामानंतर शरद पवारांचं भाष्य
6
कडक सॅल्यूट! "डॅडी... मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

शेकाप राज्यात 35 जागा लढविणार!

By admin | Updated: August 2, 2014 22:47 IST

शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्रात किमान 35 जागा लढविणार असल्याचे संकेत आज शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी कामोठे येथे दिले.

पनवेल : देशात सत्तास्थानी बसलेल्या भारतीय जनता पक्षाने व शिवसेनेने आधी सीमा प्रश्न सोडवून दाखवावा, मगच मते मागण्यासाठी यावे असे आव्हान देत शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्रात किमान 35 जागा लढविणार असल्याचे संकेत आज शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी कामोठे येथे दिले.
शेतकरी कामगार पक्षाच्या 67 व्या वर्धापनदिनानिमित्त कामोठे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार जयंत पाटील बोलत होते. राज्यात येऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाने युती आघाडी न करता हिंमत असेल तर एकएकटे लढून दाखवावे, मग आम्हीही आमची ताकद दाखवून देऊ, असे थेट आव्हानही त्यांनी यावेळी दिले. आजर्पयत शेकापचे अनेक नेते पक्ष सोडून गेले परंतु शेकापचा निष्ठावान कार्यकर्ता मात्र कुठेच गेला नाही म्हणूनच आजर्पयत कितीही लाटा आल्या तरीही पक्षाचा लाल बावटा डौलाने फडकत राहिला आहे.
ते म्हणाले की, या देशात आता काँग्रेस वाढू शकत नाही कारण त्यांच्याकडे आता नेतृत्व राहीले नाही. त्याचप्रमाणो भाजपा - शिवसेना देखील काँग्रेस विरोधात लढू शकत नसल्याने काँग्रेस विरोधी मतदारांना शेतकरी कामगार पक्ष हाच तिसरा पर्याय असल्याचे त्यांना समजले आहे. येत्या पंधरा ऑगस्टनंतर शेतकरी कामगार पक्ष आपले सर्व उमेदवार जाहीर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार विवेक पाटील यावेळी म्हणाले की, पनवेलच्या रस्त्यांप्रमाणोच स्थानिक काँग्रेसलाही खड्डे पडले आहेत. काँग्रेस - राष्ट्रवादी ढेपाळली आहे तर शिवसेना - भाजपा हवेत आहेत. बदलते पनवेल बहरते पनवेल या खोटय़ा जाहीराती पाहून कोणीही पनवेलमध्ये येण्याचे धाडस करु नका, कारण पनवेलच्या रस्त्यावरुन फिरताना तुमची गाडी पंर होईल व कंबर मोडल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका यावेळी त्यांनी केली.
शेकापचे पनवेल विधानसभा मतदार संघाचे उमेदवार व जिल्हाचिटणीस बाळाराम पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही उरण व पनवेल मतदार संघात शेकापने आघाडी घेऊन शेकापचा निष्ठावान कार्यकर्ता काय करु शकतो हे दाखवून दिल्याचे सांगितले. शेकापची आंदोलने ही केवळ ढोंगबाजी नसते तर जनतेच्या  प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी असतात. मतदारांचा कौल हा काँग्रेस विरोधी असून येत्या विधानसभेत काँग्रेस आघाडीला तख्तावरुन खाली खेचण्यासाठी व शेकापचा खटारा विधानसभेत पोहचविण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी व्यासपीठावर आमदार मिनाक्षी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडित पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, तालुका चिटणीस नारायण घरत, पनवेल विधानसभा मतदार संघ अध्यक्ष काशीनाथ पाटील, राज्य प्रवक्ते मल्लीनाथ गायकवाड, आंबेजोगाईचे नगरसेवक डॉ. राजेश इंगोले, जतचे बबन शिंगाडे, बिड जिल्हा चिटणीस मोहन गुंड, शेकापचे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, पदाधिकारी आदि उपस्थित होते. सुरुवातीला दत्तुशेठ पाटील व मोहन पाटील यांना आदरांजली वाहिली.