शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

शेकाप राज्यात 35 जागा लढविणार!

By admin | Updated: August 2, 2014 22:47 IST

शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्रात किमान 35 जागा लढविणार असल्याचे संकेत आज शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी कामोठे येथे दिले.

पनवेल : देशात सत्तास्थानी बसलेल्या भारतीय जनता पक्षाने व शिवसेनेने आधी सीमा प्रश्न सोडवून दाखवावा, मगच मते मागण्यासाठी यावे असे आव्हान देत शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्रात किमान 35 जागा लढविणार असल्याचे संकेत आज शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी कामोठे येथे दिले.
शेतकरी कामगार पक्षाच्या 67 व्या वर्धापनदिनानिमित्त कामोठे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार जयंत पाटील बोलत होते. राज्यात येऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाने युती आघाडी न करता हिंमत असेल तर एकएकटे लढून दाखवावे, मग आम्हीही आमची ताकद दाखवून देऊ, असे थेट आव्हानही त्यांनी यावेळी दिले. आजर्पयत शेकापचे अनेक नेते पक्ष सोडून गेले परंतु शेकापचा निष्ठावान कार्यकर्ता मात्र कुठेच गेला नाही म्हणूनच आजर्पयत कितीही लाटा आल्या तरीही पक्षाचा लाल बावटा डौलाने फडकत राहिला आहे.
ते म्हणाले की, या देशात आता काँग्रेस वाढू शकत नाही कारण त्यांच्याकडे आता नेतृत्व राहीले नाही. त्याचप्रमाणो भाजपा - शिवसेना देखील काँग्रेस विरोधात लढू शकत नसल्याने काँग्रेस विरोधी मतदारांना शेतकरी कामगार पक्ष हाच तिसरा पर्याय असल्याचे त्यांना समजले आहे. येत्या पंधरा ऑगस्टनंतर शेतकरी कामगार पक्ष आपले सर्व उमेदवार जाहीर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार विवेक पाटील यावेळी म्हणाले की, पनवेलच्या रस्त्यांप्रमाणोच स्थानिक काँग्रेसलाही खड्डे पडले आहेत. काँग्रेस - राष्ट्रवादी ढेपाळली आहे तर शिवसेना - भाजपा हवेत आहेत. बदलते पनवेल बहरते पनवेल या खोटय़ा जाहीराती पाहून कोणीही पनवेलमध्ये येण्याचे धाडस करु नका, कारण पनवेलच्या रस्त्यावरुन फिरताना तुमची गाडी पंर होईल व कंबर मोडल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका यावेळी त्यांनी केली.
शेकापचे पनवेल विधानसभा मतदार संघाचे उमेदवार व जिल्हाचिटणीस बाळाराम पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही उरण व पनवेल मतदार संघात शेकापने आघाडी घेऊन शेकापचा निष्ठावान कार्यकर्ता काय करु शकतो हे दाखवून दिल्याचे सांगितले. शेकापची आंदोलने ही केवळ ढोंगबाजी नसते तर जनतेच्या  प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी असतात. मतदारांचा कौल हा काँग्रेस विरोधी असून येत्या विधानसभेत काँग्रेस आघाडीला तख्तावरुन खाली खेचण्यासाठी व शेकापचा खटारा विधानसभेत पोहचविण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी व्यासपीठावर आमदार मिनाक्षी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडित पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, तालुका चिटणीस नारायण घरत, पनवेल विधानसभा मतदार संघ अध्यक्ष काशीनाथ पाटील, राज्य प्रवक्ते मल्लीनाथ गायकवाड, आंबेजोगाईचे नगरसेवक डॉ. राजेश इंगोले, जतचे बबन शिंगाडे, बिड जिल्हा चिटणीस मोहन गुंड, शेकापचे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, पदाधिकारी आदि उपस्थित होते. सुरुवातीला दत्तुशेठ पाटील व मोहन पाटील यांना आदरांजली वाहिली.