शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पर्युषणात कत्तलखाने बंद ठेवा

By admin | Updated: September 9, 2015 08:21 IST

अनेक हिंदू व मराठी कुटुंबे श्रावण महिन्यात, गणेशोत्सवात, नवरात्रोत्सवात महिनाभर किंवा आठ-दहा दिवस मांसाहार करीत नाहीत. त्यामुळे जैन धर्मीयांच्या पर्युषणात मुंबईतील

मुंबई : अनेक हिंदू व मराठी कुटुंबे श्रावण महिन्यात, गणेशोत्सवात, नवरात्रोत्सवात महिनाभर किंवा आठ-दहा दिवस मांसाहार करीत नाहीत. त्यामुळे जैन धर्मीयांच्या पर्युषणात मुंबईतील कत्तलखाने केवळ चार दिवस नव्हे तर आठ दिवस बंद ठेवण्यात काहीच गैर नाही, असे मत गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी व्यक्त केले.मेहता म्हणाले की, नियमित मांसाहार करणारे हिंदू व मराठी भाषिक त्यांच्या सणासुदीला मांसाहार पूर्णपणे बंद ठेवतात. मुस्लीम बांधवही त्यांच्या सणाला मांसाहार टाळतात. त्यामुळे जैन धर्मीयांच्या पर्युषणाच्या काळात आठ दिवस कत्तलखाने बंद राहिले तर काहीच बिघडत नाही. पर्युषणाच्या काळात गोवंश हत्या होऊ नये याकरिता ही मागणी केली जाते. राज्यात १९९५ ते १९९९ युतीची सत्ता असताना आम्ही दिवसरात्र जागून गोवंश हत्याबंदीचा कायदा केला होता. त्यामुळे त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी हा आग्रह आमच्या सरकारने धरणे यात काही गैर नाही. मूळात मुंबई महापालिकेने कत्तलखाना सुरु केला तो मुंबईतील मांसाहार करणाऱ्या लोकांना ताजे व स्वच्छ मटण मिळावे म्हणून. परंतु सध्या या कत्तलखान्यातून मटणाची निर्यात होत असेल तर हा मूळ हेतूला हरताळ फासण्याचा प्रकार आहे, असेही मेहता म्हणाले.दरम्यान, पर्युषणाच्या काळात कत्तलखाने बंद ठेवणे हा सरकारचा निर्णय नसून महापालिकांचा निर्णय आहे, असे मत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केले असून दोन-चार दिवस कत्तलखाने बंद ठेवणे म्हणजे मांसाहार बंद करणे असा होत नाही. जनतेने ज्यांना नाकारले त्या मनसेला यावर बोलण्याचा अधिकार नाही, असा टोलाही शेलार यांनी लगावला. मात्र त्याचवेळी शिवसेनेचे नेतेही या विषयावर आक्रमक झाले असून भाजपाच्या दबावाखाली हा निर्णय घेतल्याचे सांगत आहेत. (विशेष प्रतिनिधी) - सभागृहात भाजपवर सर्व पक्षातून टीका झाली. शिवसेनेनेही या बंदीला विरोध केला. यानंतर महापौर स्नेहल आंबेकर यांनी ४ दिवस मांसबंदीच्या परिपत्रकाचा पुर्नविचार करावा, असे आदेश महापालिका आयुक्त अजय मेहता यांना दिले. - सेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष अशा सर्व पक्षांनीही विरोध केला. यामुळे सभागृहात गदारोळ झाला. खाण्याविषयी भाजपने भूमिका मांडलेली नाही. विरोध करणारे समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहेत, असे भाजपचे मनोज कोटक म्हणाले.