शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

पर्युषणात कत्तलखाने बंद ठेवा

By admin | Updated: September 9, 2015 08:21 IST

अनेक हिंदू व मराठी कुटुंबे श्रावण महिन्यात, गणेशोत्सवात, नवरात्रोत्सवात महिनाभर किंवा आठ-दहा दिवस मांसाहार करीत नाहीत. त्यामुळे जैन धर्मीयांच्या पर्युषणात मुंबईतील

मुंबई : अनेक हिंदू व मराठी कुटुंबे श्रावण महिन्यात, गणेशोत्सवात, नवरात्रोत्सवात महिनाभर किंवा आठ-दहा दिवस मांसाहार करीत नाहीत. त्यामुळे जैन धर्मीयांच्या पर्युषणात मुंबईतील कत्तलखाने केवळ चार दिवस नव्हे तर आठ दिवस बंद ठेवण्यात काहीच गैर नाही, असे मत गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी व्यक्त केले.मेहता म्हणाले की, नियमित मांसाहार करणारे हिंदू व मराठी भाषिक त्यांच्या सणासुदीला मांसाहार पूर्णपणे बंद ठेवतात. मुस्लीम बांधवही त्यांच्या सणाला मांसाहार टाळतात. त्यामुळे जैन धर्मीयांच्या पर्युषणाच्या काळात आठ दिवस कत्तलखाने बंद राहिले तर काहीच बिघडत नाही. पर्युषणाच्या काळात गोवंश हत्या होऊ नये याकरिता ही मागणी केली जाते. राज्यात १९९५ ते १९९९ युतीची सत्ता असताना आम्ही दिवसरात्र जागून गोवंश हत्याबंदीचा कायदा केला होता. त्यामुळे त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी हा आग्रह आमच्या सरकारने धरणे यात काही गैर नाही. मूळात मुंबई महापालिकेने कत्तलखाना सुरु केला तो मुंबईतील मांसाहार करणाऱ्या लोकांना ताजे व स्वच्छ मटण मिळावे म्हणून. परंतु सध्या या कत्तलखान्यातून मटणाची निर्यात होत असेल तर हा मूळ हेतूला हरताळ फासण्याचा प्रकार आहे, असेही मेहता म्हणाले.दरम्यान, पर्युषणाच्या काळात कत्तलखाने बंद ठेवणे हा सरकारचा निर्णय नसून महापालिकांचा निर्णय आहे, असे मत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केले असून दोन-चार दिवस कत्तलखाने बंद ठेवणे म्हणजे मांसाहार बंद करणे असा होत नाही. जनतेने ज्यांना नाकारले त्या मनसेला यावर बोलण्याचा अधिकार नाही, असा टोलाही शेलार यांनी लगावला. मात्र त्याचवेळी शिवसेनेचे नेतेही या विषयावर आक्रमक झाले असून भाजपाच्या दबावाखाली हा निर्णय घेतल्याचे सांगत आहेत. (विशेष प्रतिनिधी) - सभागृहात भाजपवर सर्व पक्षातून टीका झाली. शिवसेनेनेही या बंदीला विरोध केला. यानंतर महापौर स्नेहल आंबेकर यांनी ४ दिवस मांसबंदीच्या परिपत्रकाचा पुर्नविचार करावा, असे आदेश महापालिका आयुक्त अजय मेहता यांना दिले. - सेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष अशा सर्व पक्षांनीही विरोध केला. यामुळे सभागृहात गदारोळ झाला. खाण्याविषयी भाजपने भूमिका मांडलेली नाही. विरोध करणारे समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहेत, असे भाजपचे मनोज कोटक म्हणाले.