शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भासाठी दिल्लीवर दबाव आणा - श्रीहरी अणे

By admin | Updated: January 24, 2016 00:25 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती होणे महाराष्ट्रातून तरी शक्य नाही. महाराष्ट्र सरकार राज्य निर्माण करू शकत नाही; तिथे फक्त ठराव होतो. विदर्भातील आमदारांची संख्या लक्षात घेतली तर हा ठराव

चंद्रपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती होणे महाराष्ट्रातून तरी शक्य नाही. महाराष्ट्र सरकार राज्य निर्माण करू शकत नाही; तिथे फक्त ठराव होतो. विदर्भातील आमदारांची संख्या लक्षात घेतली तर हा ठराव मुंबईत पास होणे शक्य नाही. त्यामुळे दिल्लीवर दबाव आणा, तो कसा आणायचा यासाठी विचार करा, असे सांगत राज्याचे महाअधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी विदर्भ राज्यासाठी लढ्याचे संकेत दिले.स्थानिक जनता महाविद्यालयात शनिवारी सायंकाळी झाल्या ‘विदर्भ गाथा’ या समारंभात त्यांनी दिल्लीवर दबाव आणण्याचे आवाहन केले. अ‍ॅड. अणे म्हणाले, तेलंगणच्या निर्मितसाठी १२०० तरुणांनी बलिदान दिले. विदर्भासाठी असे रक्त सांडविण्याची दिल्लीकर वाट बघत असतील तर ते अयोग्य आहे. आम्ही वीज निर्माण करतो, कोळसा त्यांना देतो, तिकडच्या प्रकल्पासाठी आमचे जंगल देतो. विदर्भातील शेतकऱ्यांनी ठरविले तर महाराष्ट्रावर उपाशी राहायची पाळी येईल.विदर्भाच्या भावनांचा भडका उडाला तर त्याची किंमत कुणालाही भरून देता येणार नाही. आपणच आपली जाळपोळ करायची, आपल्याच माणसांच्या तोंडाला काळे फासायचे, आपल्याच माणसांना अपमानीत करायचे, हा मार्ग नव्हे. मात्र उद्याच्या भविष्यात हेच होणार, हे आपणाला आतापासून दिसत आहे, असे ते म्हणाले. माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साहित्य संमेलनादरम्यान केलेल्या वक्तव्याबद्दल अणे म्हणाले, साहित्यिकांना महाराष्ट्राएवढाच विदर्भ प्रिय आहे. विदर्भातील साहित्यिकांनी विदर्भाबद्दल का बोलू नये? विदर्भातील मराठीपण, हिंदीपण समजून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.