शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

बालगृहातील बालके हंगामी वसतिगृहात टाका

By admin | Updated: June 27, 2016 04:47 IST

बालकांचे थकीत भोजन अनुदान, इमारत भाडे आणि कर्मचारी वेतनाचा प्रश्न ऐरणीवर येताच महिला-बालविकासने पुन्हा एकदा जबाबदारी झटकली

स्नेहा मोरे,

मुंबई- बालकांचे थकीत भोजन अनुदान, इमारत भाडे आणि कर्मचारी वेतनाचा प्रश्न ऐरणीवर येताच महिला-बालविकासने पुन्हा एकदा जबाबदारी झटकली आहे. बालगृहांतील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या तब्बल ८० हजारांवर बालकांना थेट शिक्षण विभागाच्या हंगामी वसतिगृहात पाठवण्याचा फतवा काढून, बालगृहे बंद करण्याच्या शक्यतांवर शिक्कामोर्तब केले आहे.स्वयंसेवी बालगृहातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना त्या-त्या जिल्ह्यातील बाल कल्याण समिती बाल न्याय अधिनियमांतर्गत प्रवेश देते. या समितींना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांचा दर्जा प्राप्त आहे. ते एक स्वतंत्र न्याय प्राधिकरण आहे. या समितीच्या कामकाजावर ताशेरे ओढत महिला व बालविकास विभागाचे आयुक्त के.एम. नागरगोजे यांनी १ जून २०१६ला परिपत्रक काढून बालगृहातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना बालगृहांत प्रवेश न देता, त्यांची रवानगी शिक्षण विभागाच्या हंगामी वसतिगृहात करण्याचे फर्मान काढून आयुक्तालयात बोलावलेल्या बैठकीतही तंबी देऊन बालगृहातील प्रवेश प्रक्रियेत खोडा घातला आहे. परिपत्रकातील पृष्ठ क्रमांक ७ मध्ये खास शिक्षण विभागाची जाहिरात करण्यासाठी आयुक्तांनी फर्मान काढल्याचे दिसते. या पृष्ठावरील मुद्दा क्रमांक १४ व १५मध्ये स्थलांतरित कष्टकरी, ऊसतोड, दगडांच्या खाणी-बांधकाम, रस्ते बांधणी मजूर, शेतमजूर यांच्या मुलांना बालगृहात प्रवेश न देता, त्यांची रवानगी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या हंगामी वसतिगृहात करण्याचा हुकूमच दिला आहे. त्यांच्या कामात ढवळाढवळ करून पर्यायाने बाल न्याय अधिनियमांशी फारकत होत असल्याची प्रतिक्रिया बालकांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.>परिपत्रकातच विसंगत मुद्देआयुक्तांच्या लेखी आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या गरिबांची मुले, स्थलांतरित कष्टकरी, ऊसतोड, दगडांच्या खाणी-बांधकाम, रस्तेबांधणी मजूर, शेतमजूर यांच्या मुलांना काळजी व संरक्षणाची गरज नाही. परिपत्रकातील पृष्ठ क्रमांक ६ वरील मुद्दा क्रमांक १२ व १३ मध्ये त्यांनी स्पष्टपणे ‘गरिबी व गावात शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाही’ अशी परिस्थिती सांगणाऱ्यांच्या मुलांना बालगृहांत प्रवेश न देण्याचे आदेशच दिले आहेत. वास्तविक, याच परिपत्रकातील पृष्ठ क्रमांक ४वर बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५च्या कलम २ (१४) मध्ये काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांची व्याख्या देताना पोट कलम १ मध्ये स्पष्टपणे ‘ज्यांना घर किंवा निवारा नाही, निर्वाहाचे साधन नाही’ अशा बालकांना बालगृहात प्रवेश द्यावा, असा उल्लेख आहे.>आयुक्तांचे तोंडी आदेश चुकीचे ‘बालगृहात फक्त अनाथच बालकांनाच प्रवेश द्या,’ असा आयुक्तांचा कोणताही लेखी आदेश नसताना आयुक्तांचा ‘तोंडी’ आदेश चुकीचा आहे. विसंगतीने परिपूर्ण असलेल्या परिपत्रकाच्या आधारे बालकल्याण समित्याही आपला अधिकार आणि अधिनियमातील कलमांचा ‘बाल हितासाठी’ विचार न करता, सरसकट बालगृहातील मुलांचे प्रवेश रद्द करत आहेत. त्यामुळे शिक्षण, संस्कार, तसेच काळजीची गरज असलेल्या बालकांची परवड होत आहे. रवींद्रकुमार जाधव, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बालगृह चालक व कर्मचारी महासंघ