शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

भूमिपूजनापासून सेनेला ठेवले दूर

By admin | Updated: October 9, 2015 01:54 IST

इंदू मिलच्या जमिनीवर उभ्या राहणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन समारंभापासून शिवसेनेला दूर ठेवण्याची खेळी भाजपाने खेळली आहे. यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई : इंदू मिलच्या जमिनीवर उभ्या राहणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन समारंभापासून शिवसेनेला दूर ठेवण्याची खेळी भाजपाने खेळली आहे. यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या कार्यक्रमाला हजर न राहता, बीडला जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.राज्यात शिवशक्ती-भीमशक्तीची कल्पना सर्वप्रथम दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मांडली होती. त्यामुळे रामदास आठवले यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेना-भाजपा युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने महायुतीत फूट पाडून आठवले यांच्या रिपाइंला आपल्यासोबत घेऊन शिवसेनेला एकटे पाडले होते. आता इंदू मिलच्या कार्यक्रमापासून शिवसेनेला दूर ठेवत, या स्मारकाचे श्रेय शिवसेनेला मिळू न देण्याची खेळी केली गेली आहे.इंदू मिलच्या भूमिपूजन समारंभाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रिपाइं नेते आठवले हजर राहणार आहेत. या कार्यक्रमाला केंद्र व राज्य सरकारमधील घटकपक्ष या नात्याने उद्धव यांना बोलावण्यात येईल, अशी शिवसेनेची अपेक्षा होती. मात्र, येणारी महापालिका निवडणूक लक्षात घेऊन ठाकरे यांना टाळले गेले असावे. त्यामुळे एमएमआरडीए मैदानावर होणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या भूमिपूजन कार्यक्रमाला हजर न राहण्याचे ठाकरे यांनी ठरवले आहे. याबाबत एमएमआरडीएच्या जनसंपर्क विभागाकडे चौकशी केली असता, शुक्रवारी सकाळी कार्यक्रमाचे निमंत्रण उद्धव ठाकरे यांना दिले जाईल, असे सांगण्यात आले. मात्र, इंदू मिलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण ठाकरे यांना देण्यात आल नसल्याचे समजते. याबाबत शिवसेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांनी आपल्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवून त्याद्वारे जो निधी उभा राहिला, त्यातून रविवारी बीडमधील शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता ते जाणार आहेत.’ राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखाली सरकार आले व देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी वानखेडे स्टेडियमवर आयोजित केला होता, पण या शपथविधी सोहळ््याचेही निमंत्रण उद्धव यांना मिळाले नव्हते. त्यामुळे ते या सोहळ््याला हजर राहणार नाहीत, असे सांगण्यात आले, पण अरुण जेटली यांनी दूरध्वनी केल्यामुळे उद्धव अगदी ऐनवेळी वानखेडेवर सहकुटुंब दाखल झाले होते. आताही ते भाजपाच्या एखाद्या वरिष्ठ नेत्याचा फोन आल्यास कार्यक्रमाला जाणार का, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.