शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

ब्रिटनस्थित गोमंतकीयांना धक्का

By admin | Updated: June 25, 2016 03:46 IST

अठ्ठावीस देशांच्या युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय ब्रिटनने घेतल्यामुळे तेथे राहणाऱ्या सुमारे ६० हजार गोमंतकीयांना धक्का बसला आहे.

पणजी : अठ्ठावीस देशांच्या युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय ब्रिटनने घेतल्यामुळे तेथे राहणाऱ्या सुमारे ६० हजार गोमंतकीयांना धक्का बसला आहे. युरोपीय संघाच्या स्थापनेनंतर पोर्तुगालमार्गे ब्रिटनमध्ये जाणाऱ्यांची संख्या खूप वाढलेली आहे. गोवा सोडून जाण्याचा हा प्रश्न गोव्यातही राजकीय आणि नाजूक बनलेला आहे. प्रमुख सत्ताधारी भारतीय जनता पार्टीसह सर्वच राजकीय पक्षांनी नागरिकांच्या दुहेरी नागरिकत्वाच्या मागणीचा वेळोवेळी पुुरस्कारच केलेला आहे. ब्रिटनच्या निर्णयामुळे तेथे स्थायिक गोमंतकीयांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गोव्यातील २०१७ च्या विधानसभा निवडणुकीतही हा राजकीय मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोव्यातील बहुतेक पक्ष ब्रिटनमधील गोमंतकीयांना दिलासा देण्याच्याच प्रयत्नात अहेत.आम्ही गोमंतकीयांबरोबर आहोत, असे सांगत गोवा सरकारने याप्रकरणी विनाविलंब टास्क फोर्स स्थापन करावा, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाने केली. गोवा फॉरवर्ड पक्ष ब्रिटनस्थित गोमंतकीय आणि त्यांचे गोव्यातील नातेवाईक यांच्यासाठी सल्ला व पुनर्वसन केंद्र स्थापन करणार आहे. (विशेष प्रतिनिधी)