शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
3
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
4
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
5
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
6
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
7
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
8
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
9
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
10
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
11
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
12
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
13
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
14
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
15
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
16
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
17
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
18
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
19
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
20
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!

पुरंदरेंना पुरस्कार म्हणजे पानसरेंचा दुसरा खून

By admin | Updated: May 25, 2015 00:30 IST

धनाजी गुरव : विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या बैठकीत आरोप

सातारा : ‘सध्याच्या राज्यकर्त्यांनी कॉ. गोविंद पानसरे यांचे खुनी शोधले तर नाहीतच; पण त्यांचे विचार गावागावात जाऊ नयेत म्हणून छत्रपती शिवरायांचा विकृत इतिहास सांगणाऱ्या ब. मो. पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण जाहीर केला़ याचा अर्थ असा आहे की, छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास सांगणाऱ्यांना गोळ्या घालायच्या आणि विकृत इतिहास सांगणाऱ्यांचे पुरस्कार देऊन कौतुक करायचे़ हा महाराष्ट्र शासनाने कॉ. गोविंद पानसरे यांचा घडविलेला वैचारिक खून आहे,’ असा आरोप कॉ़ धनाजी गुरव यांनी केला.विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सातारा येथे झाली़ यावेळी ते बोलत होते. आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सचिव गौतम कांबळे, उपाध्यक्ष प्रा़ डॉ़ बाबूराव गुरव, विजय मांडके, कार्यकारिणी सदस्य प्रा़ सुधीर अनावले, प्रा़ नामदेव करगणे, प्रा. विजयकुमार जोखे, दीपक कोठावळे, प्राचार्य विश्वास सायनाकर, शिवराम ठवरे आदींची उपस्थिती होती.धनाजी गुरव म्हणाले, ‘महाराष्ट्रातले सध्याचे सरकार हे राष्टीय स्वयंसेवक संघाचे समर्थक असल्याने पुरंदरे यांना जसा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार राज्य शासनाच्या वतीने जाहीर झाला आहे़ या प्रकारचे अनेक निर्णय भविष्यात शासनाकडून घेतले जातील म्हणून आपण सावधपणे त्यांच्या निर्णयांचा अर्थ काय होतो, हे राबणाऱ्या बहुजन समाजाला सांगितले पाहिजे़ पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार याचाच अर्थ कॉ. गोविंद पानसरे यांचा दुसरा खून आहे,’ असे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे मत असल्याचे कॉ़ धनाजी गुरव यांनी सांंिगतले़ ‘या निर्णयाविरोधात जनतेचा आवाज उठविण्यासाठी व राज्यभर चर्चा घडवून आणण्यासाठी शक्य झाल्यास सर्व समविचारी संघटनांना सोबत घेऊन परिणामकारक कार्यक्रम घेण्याबाबतही निर्णय घेण्यात आला,’ असे यावेळी गौतम कांबळे यांनी सांगितले़सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी लवकरच ‘पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण म्हणजे कॉ. गोविंद पानसरे यांचा दुसरा खून’ या विषयावर मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर कार्यक्रम घेण्याचे या बैठकीत ठरले़ यावेळी महत्त्वाच्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)