शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

पुरंदरच्या ‘टेकआॅफ’लाही विरोध!

By admin | Updated: September 13, 2016 01:28 IST

पुरंदर तालुक्यात दुसऱ्यांदा विमानतळासाठी पाहणी झाल्याने आता येथील शेतकरीही विरोधाची भाषा करू लागले आहेत. स्थानिक ग्रामस्थांबरोबरच विविध संघटनांनी विरोध दर्शविला आहे

भुलेश्वर : पुरंदर तालुक्यात दुसऱ्यांदा विमानतळासाठी पाहणी झाल्याने आता येथील शेतकरीही विरोधाची भाषा करू लागले आहेत. स्थानिक ग्रामस्थांबरोबरच विविध संघटनांनी विरोध दर्शविला आहे. पुरंदर तालुक्याची संपूर्ण देशात गोड, चवीष्ट अंजीर व अवीट गोडीची सीताफळे अशी असणारी ओळख यामुळे पुसणार असून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन जागेचा निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. या ठिकाणच्या पडीक व गायरान जागेवर विमानतळ व्हावे, फळबागांच्या क्षेत्रांचा विचार करावा. येथे मोठ्या प्रमाणात माळरान क्षेत्र असल्याने विमानतळ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, हा परिसर गोड, चवीष्ट अंजीर, अवीट गोडी असणारी सीताफळे यासाठी देशात प्रसिद्ध आहे. फळबागेसाठी येथील हवामान उपयुक्त आहे. येथील सर्वसामान्य शेतकरी याच फळबागेच्या जोरावर तग धरून उभा आहे. पाणी कमी पडू नये, म्हणून अनेक शेतकऱ्यांनी शेततळीही केलेली आहेत. यातूनच उत्पादन वाढवले आहे. यामुळे येथील शेतकरी धास्तावला आहे. शेतकऱ्यांबरोबर विविध संघटना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आल्या आहेत. (वार्ताहर)धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. त्यात विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांची जमिनी जाणार आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचे काय? आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुरंदर तालुक्याचा विकास होईल, परंतु त्या मातीत जन्मलेल्या लोकांची माती करू नका. स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देत असतानाच राजकारण करू नका. - मस्कू शेंडगे, जिल्हाध्यक्ष, लहुजी शक्ती सेना