शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदरच्या ‘टेकआॅफ’लाही विरोध!

By admin | Updated: September 13, 2016 01:28 IST

पुरंदर तालुक्यात दुसऱ्यांदा विमानतळासाठी पाहणी झाल्याने आता येथील शेतकरीही विरोधाची भाषा करू लागले आहेत. स्थानिक ग्रामस्थांबरोबरच विविध संघटनांनी विरोध दर्शविला आहे

भुलेश्वर : पुरंदर तालुक्यात दुसऱ्यांदा विमानतळासाठी पाहणी झाल्याने आता येथील शेतकरीही विरोधाची भाषा करू लागले आहेत. स्थानिक ग्रामस्थांबरोबरच विविध संघटनांनी विरोध दर्शविला आहे. पुरंदर तालुक्याची संपूर्ण देशात गोड, चवीष्ट अंजीर व अवीट गोडीची सीताफळे अशी असणारी ओळख यामुळे पुसणार असून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन जागेचा निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. या ठिकाणच्या पडीक व गायरान जागेवर विमानतळ व्हावे, फळबागांच्या क्षेत्रांचा विचार करावा. येथे मोठ्या प्रमाणात माळरान क्षेत्र असल्याने विमानतळ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, हा परिसर गोड, चवीष्ट अंजीर, अवीट गोडी असणारी सीताफळे यासाठी देशात प्रसिद्ध आहे. फळबागेसाठी येथील हवामान उपयुक्त आहे. येथील सर्वसामान्य शेतकरी याच फळबागेच्या जोरावर तग धरून उभा आहे. पाणी कमी पडू नये, म्हणून अनेक शेतकऱ्यांनी शेततळीही केलेली आहेत. यातूनच उत्पादन वाढवले आहे. यामुळे येथील शेतकरी धास्तावला आहे. शेतकऱ्यांबरोबर विविध संघटना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आल्या आहेत. (वार्ताहर)धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. त्यात विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांची जमिनी जाणार आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचे काय? आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुरंदर तालुक्याचा विकास होईल, परंतु त्या मातीत जन्मलेल्या लोकांची माती करू नका. स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देत असतानाच राजकारण करू नका. - मस्कू शेंडगे, जिल्हाध्यक्ष, लहुजी शक्ती सेना