शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षेचा फास आवळला

By admin | Updated: April 6, 2016 04:27 IST

राज्यात सर्वाधिक गुन्हे सिद्ध होणाऱ्या आयुक्तालयांमध्ये नवी मुंबईचा समावेश होतो. गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून दोन वर्षात तब्बल १२७९ गुन्ह्यांमधील आरोपींना शिक्षा झाली आहे.

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई राज्यात सर्वाधिक गुन्हे सिद्ध होणाऱ्या आयुक्तालयांमध्ये नवी मुंबईचा समावेश होतो. गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून दोन वर्षात तब्बल १२७९ गुन्ह्यांमधील आरोपींना शिक्षा झाली आहे. पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरणाबरोबर पुरावे गोळा करून आरोपपत्र दाखल करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे. नवी मुंबईसह संपूर्ण राज्यात गुन्ह्यांचा उलगडा होण्याचे प्रमाण प्रत्येक वर्षी वाढत चालले आहे. परंतु पुरेसे पुरावे हाती न लागल्यामुळे अनेक गुन्ह्यांमधील आरोपी न्यायालयातून मोकाट सुटतात. शिवाय गुन्हे सिद्ध होत नसल्याने सामान्य नागरिकही नाराजी व्यक्त करतात. यामुळे राज्यभर गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वाढविण्याकडे पोलिसांकडून लक्ष देण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील सर्वाधिक दोन वर्षामध्ये प्रथम वर्ग न्यायालयात २३५२ गुन्हे निकाली लागले असून त्यापैकी ८१५ प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झाली आहे. तर सत्र न्यायालयात २३३ गुन्ह्यांचा निकाल लागला असून ४२ प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झाली आहे. अटक आरोपींना शिक्षा लागलेल्या गुन्ह्यांमध्ये बालकांचा लैंगिक अत्याचार, हत्या, जबरी दरोडा, बलात्कार, अमली पदार्थ तस्करी अशा गंभीर गुन्ह्यांसह हाणामारी, अपघात तसेच चोरी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. एखाद्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर वर्षानुवर्षे हे खटले सुरु असतात. तेवढ्या कालावधीत आरोपी विरोधातील पुराव्याचे जतन करण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान असते. यावेळी भेडसावणाऱ्या सर्व परिस्थितीवर मात करुन तपास अधिकाऱ्यांनी मांडलेल्या भक्कम पुराव्यामुळे त्या आरोपींना शिक्षा लागली आहे. पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे, गुन्हे शाखेचे उपआयुक्त दिलीप सावंत, परिमंडळ एकचे शहाजी उमाप, परिमंडळ दोनचे विश्वास पांढरे व इतर अधिकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वाढत आहे. पोलीस एखाद्या गुन्ह्याचा तपास पटकन लावतात. परंतु तो गुन्हा सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे उपलब्ध होत नाहीत. अनेक वेळा साक्षीदार त्यांची साक्ष बदलतात, काही प्रकरणांमध्ये तपासात त्रुटी राहिलेल्या असतात. यामुळे गुन्हेगार पुराव्याअभावी निर्दोष सुटतात. आरोपींना शिक्षा व्हावी व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा यासाठी पोलीस विशेष प्रयत्न करीत असल्याचे यातून उघड होत आहे.