शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पुणे मनपामध्ये ११ गावांचा समावेश; राज्य सरकारचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 02:35 IST

फुरसुंगी व उरळी या दोन गावांबरोबरच नऊ गावांचा अंशत: डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत पुणे महापालिकेमध्ये समावेश करण्यात येणार आहे. तर उर्वरित २३ गावांचा टप्प्याटप्प्याने

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : फुरसुंगी व उरळी या दोन गावांबरोबरच नऊ गावांचा अंशत: डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत पुणे महापालिकेमध्ये समावेश करण्यात येणार आहे. तर उर्वरित २३ गावांचा टप्प्याटप्प्याने पुणे महापालिकेत समावेश करण्यात येईल, अशी माहिती राज्य सरकारने एका पत्राद्वारे उच्च न्यायालयाला बुधवारी दिली. पुणे भोवतालच्या ३४ गावांचा महापालिकेत समावेश करावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. विभा कंकणवाडी यांच्या खंडपीठापुढे होती.बुधवारच्या सुनावणीत सरकारी वकील मनीष पबाळे यांनी न्यायालयात सरकारचे एक पत्र सादर केले. महापालिकेचे डम्पिंग ग्राउंड उरळी व फुरसुंगी येथे आहे. या दोन गावांचा आणि यापूर्वी महापालिकेत अंशत: समाविष्ट असलेल्या तथापि काही अंशी महापालिकेत समाविष्ट नसलेल्या नऊ गावांचा डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत पूर्णत: महापालिकेत समावेश करण्यात येईल. त्यासंदर्भात डिसेंबर २०१७ अखेरीस अंतिम अधिसूचना काढण्यात येईल, असे पत्रात म्हटले आहे. तसेच उर्वरित २३ गावांचा टप्प्याटप्प्याने पुणे महापालिकेत समावेश करण्यात येईल, त्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागेल, असेही राज्य सरकारने पत्रात म्हटले आहे. पाण्याची उपलब्धता, पाणी योजना, कचऱ्याचे नियोजन, रिंगरोड इत्यादी बाबींचा विचार करून या गावांचा पुणे मनपात समावेश करण्यात येईल, असे सरकारने स्पष्ट केले. सरकारच्या या निर्णयानंतर न्यायालयाने या याचिका निकाली काढल्या. सरकारच्या या निर्णयामुळे उर्वरित २३ गावांना आणखी तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.