शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

पुण्याला पाणी अवघडच

By admin | Updated: April 3, 2017 01:20 IST

भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तब्बल १३१ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

पुणे : शहराच्या पूर्व भागातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेला भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तब्बल १३१ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हा निधी धरणातील पाणी उचलणाऱ्या सर्व संस्थांकडून वसूल करण्यात येणार आहे. परंतु याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविणे अपेक्षित असून, दीड वर्षापासून हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या स्तरावर पडून असल्याची माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.भामा-आसखेड धरण ८ टीएमसी क्षमतेचे असून, यातील सव्वा दोन टीएमसी पाणी पुणे महापालिकेला देण्यात येणार आहे. याशिवाय पिंपरी- चिंचवड शहर, चाकण एमआयडीसी, आळंदी शहर आणि काही स्थानिक लोकांसाठी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत पुणे शहराची लोकसंख्या वाढली असून, खडकवासला धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर शहराची गरज भागविणे कठीण जात आहे. यामुळेच शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी भामा-आसखेड प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. परंतु शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी पुणे महापालिकेने हाती घेतलेल्या भामा- आसखेड प्रकल्पाच्या प्रामुख्याने जॅकवेलच्या कामाला स्थानिक शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला आहे. या प्रकल्पामुळे तब्बल १३०० कुटुंबे बाधित झाली असून, त्यांचे शंभर टक्के पुनर्वसन होणे आवश्यक आहे. शासनाने यापूर्वी केलेल्या अनेक प्रकल्पांचे काम पूर्ण होऊन अनेक वर्षे लोटली तरी अद्याप प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न सुटलेला नाही. यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय धरणातून पाणी उचलू देणार नाही, असा पवित्रा स्थानिक शेतकऱ्यांनी घेतला आहे. १३१ कोटींची गरजमहापालिकेतील अधिकारी यांनी सांगितले, की शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक असलेला निधी धरणातून पाणी उचलणाऱ्या सर्व संबंधित संस्थांकडून वसूल करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे १३१ कोटी रुपयांच्या निधीची गरज असून, यातील ६० ते ६५ कोटी रुपयांचा हिस्सा महापालिका उचलणार आहे. ज्या प्रमाणात पाणी उचलणार त्या प्रमाणात हा निधी द्यावा लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाने राज्य शासनाला पाठविणे अपेक्षित आहे. परंतु आॅक्टोबर २०१५पासून हा प्रस्ताव प्रशासनाकडे पडून असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.