शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचे पाणी पेटले!

By admin | Updated: May 4, 2016 03:10 IST

पुण्याच्या हक्काचे पाणी दौंड-इंदापूर तालुक्यासाठी सोडण्याच्या पालकमंत्री गिरीष बापट यांच्या निर्णयावरून मंगळवारी पुण्यात अक्षरश: रणकंदन झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी

पुणे : पुण्याच्या हक्काचे पाणी दौंड-इंदापूर तालुक्यासाठी सोडण्याच्या पालकमंत्री गिरीष बापट यांच्या निर्णयावरून मंगळवारी पुण्यात अक्षरश: रणकंदन झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सिंचन भवनात तोडफोड केली. महापालिकेच्या मुख्य सभेतही यावरून रणकंदन झाले. महापौरांनी नगरसेवकांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठून पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध केला. शिवसेनेनेही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. कालवा समितीच्या बैठकीला पुण्यातील एका आमदाराला न बोलाविता आणि महापालिकेला विश्वासात न घेता दौंडसाठी एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय पालकमंत्री बापट यांनी सोमवारी घेतला. त्याची पहिली प्रतिक्रिया मनसेकडून आली. सकाळी अकराच्या सुमारास मनसेचे कार्यकर्ते घोषणा देत सिंचन भवनात शिरले़ त्यांनी अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांच्या कार्यालयात शिरुन तेथील टेबलखुर्च्यांची मोडतोड केली़ काचा फोडल्या़ ‘आधी सोडलेल्या पाण्याचा हिशोब द्या, मगच पाण्याला हात लावा’, ग्रामीण भागाला पाणी देण्याला विरोध नाही़ हुकुमशाही पद्धतीला आहे़, अशी पत्रके त्यांनी वाटली. महापालिकेच्या मुख्य सभेतही याचे पडसाद उमटले. बापट यांच्या निर्णयाचा महापालिकेच्या मुख्यसभेत तीव्र निषेध करण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेच्या नगरसेवकांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत सभा तहकुब केली. महापौर प्रशांत जगताप यांनी सर्व नगरसेवकांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. पुण्याचे पाणी पळवून देऊ नये, याबाबत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.१५ जूनपर्यंत पाऊस झाला नाही तर पाणीबाणीशहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या ५.१ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. ३१ जुलैपर्यंत ३.३ टीएमसी पाणी लागणार आहे. ०.७५ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होण्याचा अंदाज आहे. ०.३३ टीएमसी पाणी पाटबंधारे विभागास तर अमानोरा व नांदेड सिटीसाठी ०.२ टीएमसी पाणी लागणार आहे. जुलैअखेरपर्यंत एकूण ५.३५ टीएमसी पाणी लागणार आहे. प्रत्यक्षात ५.१ टीएमसी इतकेच पाणी धरणात आहे. शिवसेनाही आक्रमकया निर्णयाला शिवसेनेही विरोध केला आहे. शहराध्यक्ष विनायक निम्हण यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना लेखी निवेदन देऊन पाणी सोडण्यास विरोध केला. पुणेकरांनी थेंब-थेंब बचत करून साठविलेले पाणी बापट यांच्या बालहट्टासाठी दौंड, इंदापूरला कोणत्याही परिस्थितीत सोडून देणार नाही. हा निर्णय त्वरित रद्द करावा, अन्यथा बुधवारी बापट यांच्या घरावर पुणेकर हंडा मोर्चा काढतील, असा इशाराही निम्हण यांनी दिला.