शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पुण्यात १०० विद्यार्थी नेट परीक्षेला मुकले

By admin | Updated: January 23, 2017 04:24 IST

सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) रविवारी आयोजित नेट परीक्षेला पुण्यात सुमारे १०० विद्यार्थी मुकले. एक-दोन मिनिटांपासून

पुणे : सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) रविवारी आयोजित नेट परीक्षेला पुण्यात सुमारे १०० विद्यार्थी मुकले. एक-दोन मिनिटांपासून ते पाच मिनिटे उशिरा आल्याचे कारण देत, ‘सीबीएसई’च्या अधिकाऱ्यांनी त्यांना परीक्षेला बसू दिले नाही. विशेष म्हणजे, एका अंध विद्यार्थ्यालाही असंवेदशीलता दाखवित वर्गाबाहेर काढले. हाच प्रकार मुंबईतही काही विद्यार्थ्यांसोबत घडला. अवघ्या काही मिनिटांसाठी त्यांना परीक्षेला मुकावे लागले. परीक्षा प्रशासनाकडून मात्र, अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.या प्रकारामुळे विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून ‘नेट’च्या आयोजनाची जबाबदारी ‘सीबीएसई’कडे दिली आहे. शहरातील विविध केंद्रांवर एक-दोन मिनिटे उशिरा पोहचलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले. पहिला पेपर सकाळी ९.३०ला होता. त्यापूर्वी किमान अर्धा तास आधी विद्यार्थ्यांनी केंद्रावर हजर राहणे बंधनकारक असते. परंतु जळगाव, लातूर, सातारा, पुणे आदी जिल्ह्यांच्या ग्रामीण भागामधील काही विद्यार्थ्यांना ५ ते १० मिनिटे उशीर झाला. त्यामुळे शिवाजीनगर येथील पॉलिटेनिक कॉलेजच्या केंद्र प्रमुखांनी त्यांना परीक्षेस बसू दिले नाही. बाणेरच्या आॅर्किड इंटरनॅशनल स्कूलच्या परीक्षा केंद्रावर जळगाव येथील जितेंद्र पाटील या अंध विद्यार्थ्याला दोन मिनिटे उशिरा आल्याने केंद्राबाहेर काढले.पॉलिटेक्निक कॉलेजच्या केंद्रावर मी वेळेत पोहोचलो होतो. हॉलमध्ये गेल्यावर मात्र मला परीक्षेस बसू दिले नाही. मी केंद्र प्रमुखांना भेटण्यासाठी गेलो. ते नाष्टा करीत होते. त्यात पाच ते १० मिनिटे गेली. त्यानंतर केंद्र प्रमुखांनीही उशीर झाल्याचे सांगत मला बाहेर जाण्यास सांगितले, अशी तक्रार सतीश येलकर यांनी ‘लोकमत’कडे केली. अंध विद्यार्थीही वर्गाबाहेरमला आॅर्किड इंटरनॅशनल स्कूल केंद्राच्या प्रवेशद्वारावर थांबवले व दुसऱ्या प्रवेशद्वारातून जाण्यास सांगितले. त्यामुळे मला दोन मिनिटे उशीर झाला. त्यानंतर मला परीक्षेस बसू दिले नाही, अशी माहिती जळगावचे अंध विद्यार्थी जितेंद्र पाटील यांनी दिली.केंद्र बदलाचाही फटकानेट परीक्षेचे केंद्र बदलल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २० जानेवारीला दिले होते. रविवारी अनेक विद्यार्थ्यांना केंद्र बदलाचा फटका बसला. लुल्लानगर, दिघी, पिंपरी चिंचवड भागात केंद्र बदल झाल्याने विद्यार्थ्यांना उशीर झाला. (प्रतिनिधी)