शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

नैसर्गिक ओलाव्यावर कडधान्य शेती

By admin | Updated: March 3, 2017 03:01 IST

कर्जत तालुक्यात पावसाळ्याशिवाय अन्य हंगामात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची शेती केली जाते.

नेरळ : कर्जत तालुक्यात पावसाळ्याशिवाय अन्य हंगामात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची शेती केली जाते. नेरळजवळील कोल्हारे येथील शेतकरी कुटुंबाने कडधान्य शेतीच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी निवडलेला वेगळा पर्याय शेतीत नफा मिळवून देणारा ठरला आहे. दरम्यान, दत्तात्रय पाटील त्यांनी सुरू केलेली शेती ही जमिनीतील नैसर्गिक ओलाव्यावर केली जात आहे, हे विशेष.कोल्हारे गावाचे पोलीस पाटील असलेले दत्तात्रय शंकर पाटील यांची नेरळ-कशेळे रस्त्याच्या कडेला शेती आहे. भाजीपाला व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविणाऱ्या पाटील यांनी आपल्या तीन एकर शेतीची योग्य प्रकारे मशागत करून घेतली आणि त्यावेळी त्यांना आपल्या जमिनीत पावसाळ्याशिवाय इतर काळात कोणत्या प्रकारची शेती करायची याचा अभ्यास केला. त्यावेळी पाटील यांना शेतीतील जमिनीत पावसाळ्यानंतर देखील प्रचंड ओलावा असल्याचे लक्षात आले. अनेक शेतकऱ्यांशी बोलून दत्तात्रय पाटील यांनी आपल्या शेतात पावसाळा संपताच तूर, हरभरा, मूग, वाल यांची शेती करण्यासाठी सर्व कडधान्य टाकले. तीन एकर जमिनीत आठ किलो वाल, तर चार किलो तूर, तर प्रत्येकी दोन किलो मूग आणि हरभरा यांची बियाणे शेतीत वेगवेगळ्या भागात पसरवली. जमिनीत असलेला नैसर्गिक ओलावा एवढा प्रचंड असल्याने दत्तात्रय शंकर पाटील यांच्यात शेतात कडधान्य पीक बहरले होते. जमिनीतील नैसर्गिक ओलाव्यामुळे पाटील कुटुंबाने मागील वर्षी तब्बल १५० किलो वाल तसेच २०० किलो तूर पिकवली होती. त्याचवेळी हरभरा आणि मूग यांची देखील ६०-७० किलो विक्र ी पाटील कुटुंबाने केली आहे. त्यासाठी त्यांना वेगळी बाजारपेठ देखील शोधावी लागली नाही. कारण आपले शेत ज्या कशेळे राज्यमार्ग रस्त्यावर आहे तेथे त्यांनी फळ विक्री सुरू केली आहे आणि त्याच ठिकाणी पाटील कुटुंब कडधान्य याची विक्री होत असते. यावर्षी देखील गतवर्षीपेक्षा अधिक प्रमाणात कडधान्य विक्रीसाठी ठेवण्यास सुरु वात केली असून सध्या हरभरा, मूग यांची विक्र ी सुरू असून ही दोन्ही कडधान्य पूर्णपणे गावठी म्हणजे स्थानिक असल्याने त्याच्या विक्र ीस मोठा ग्राहक मिळत असल्याचे दत्तात्रय पाटील यांच्या पत्नी मंजुळा यांचे म्हणणे आहे. तर गावठी स्वरूपाचा वाल मोठ्या प्रमाणात पाटील यांच्या शेतात बहरला असून त्यामुळे संपूर्ण परिसरात विशिष्ट प्रकारचा सुगंध पसरला आहे. त्याचवेळी तूर शेती देखील फुलली असून मोठ्या प्रमाणात पिवळ्या फुलांची दुलई त्या शेतात दिसून येत आहे. यासर्व शेतीसाठी जमिनीची उखळण आणि त्यात कडधान्य पीक घेण्यासाठी टाकलेले बियाणे याशिवाय इतर कोणताही खर्च त्यांच्या शेतात पीक घेण्यासाठी करावा लागला नाही. पूर्णपणे जमिनीतील नैसर्गिक ओलाव्याचा फायदा घेऊन केलेली शेती कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. (वार्ताहर)>तब्बल दीड एकर जमिनीत तूर पिकविण्यासाठी शेती केली असून गतवर्षीपेक्षा अधिक उत्पन्न मिळण्याचा विश्वास आहे. हे सर्व कडधान्य विकण्यासाठी कोणतीही वेगळी बाजारपेठ मिळविण्याची आम्हाला गरज नाही. कारण फळ विक्र ी करण्यासाठी उघडलेल्या दुकानात सर्व कडधान्ये विकली जातात आणि विक्र ीसाठी वेगळे कष्ट न घेता उत्पन्न अधिक मिळत आहे.-दत्तात्रय पाटील, शेतकरी, कोल्हारेजमिनीतील नैसर्गिक ओलाव्यामुळे पाटील कुटुंबाने मागील वर्षी तब्बल १५० किलो वाल तसेच २०० किलो तूर पिकवली होती. त्याचवेळी हरभरा आणि मूग यांची देखील ६०-७० किलो विक्र ी पाटील कुटुंबाने केली आहे.यावर्षी देखील गतवर्षीपेक्षा अधिक प्रमाणात कडधान्य विक्र ीसाठी ठेवण्यास सुरु वात केली असून सध्या हरभरा, मूग यांची विक्र ी सुरू असून ही दोन्ही कडधान्य पूर्णपणे गावठी म्हणजे स्थानिक असल्याने त्याच्या विक्र ीस मोठा ग्राहक मिळत आहे. या सर्व शेतीसाठी जमिनीची उखळण आणि त्यात कडधान्य पीक घेण्यासाठी टाकलेले बियाणे याशिवाय इतर कोणताही खर्च के ला नसल्याची माहिती दत्तात्रय पाटील यांनी दिली.