शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

नैसर्गिक ओलाव्यावर कडधान्य शेती

By admin | Updated: March 3, 2017 03:01 IST

कर्जत तालुक्यात पावसाळ्याशिवाय अन्य हंगामात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची शेती केली जाते.

नेरळ : कर्जत तालुक्यात पावसाळ्याशिवाय अन्य हंगामात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची शेती केली जाते. नेरळजवळील कोल्हारे येथील शेतकरी कुटुंबाने कडधान्य शेतीच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी निवडलेला वेगळा पर्याय शेतीत नफा मिळवून देणारा ठरला आहे. दरम्यान, दत्तात्रय पाटील त्यांनी सुरू केलेली शेती ही जमिनीतील नैसर्गिक ओलाव्यावर केली जात आहे, हे विशेष.कोल्हारे गावाचे पोलीस पाटील असलेले दत्तात्रय शंकर पाटील यांची नेरळ-कशेळे रस्त्याच्या कडेला शेती आहे. भाजीपाला व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविणाऱ्या पाटील यांनी आपल्या तीन एकर शेतीची योग्य प्रकारे मशागत करून घेतली आणि त्यावेळी त्यांना आपल्या जमिनीत पावसाळ्याशिवाय इतर काळात कोणत्या प्रकारची शेती करायची याचा अभ्यास केला. त्यावेळी पाटील यांना शेतीतील जमिनीत पावसाळ्यानंतर देखील प्रचंड ओलावा असल्याचे लक्षात आले. अनेक शेतकऱ्यांशी बोलून दत्तात्रय पाटील यांनी आपल्या शेतात पावसाळा संपताच तूर, हरभरा, मूग, वाल यांची शेती करण्यासाठी सर्व कडधान्य टाकले. तीन एकर जमिनीत आठ किलो वाल, तर चार किलो तूर, तर प्रत्येकी दोन किलो मूग आणि हरभरा यांची बियाणे शेतीत वेगवेगळ्या भागात पसरवली. जमिनीत असलेला नैसर्गिक ओलावा एवढा प्रचंड असल्याने दत्तात्रय शंकर पाटील यांच्यात शेतात कडधान्य पीक बहरले होते. जमिनीतील नैसर्गिक ओलाव्यामुळे पाटील कुटुंबाने मागील वर्षी तब्बल १५० किलो वाल तसेच २०० किलो तूर पिकवली होती. त्याचवेळी हरभरा आणि मूग यांची देखील ६०-७० किलो विक्र ी पाटील कुटुंबाने केली आहे. त्यासाठी त्यांना वेगळी बाजारपेठ देखील शोधावी लागली नाही. कारण आपले शेत ज्या कशेळे राज्यमार्ग रस्त्यावर आहे तेथे त्यांनी फळ विक्री सुरू केली आहे आणि त्याच ठिकाणी पाटील कुटुंब कडधान्य याची विक्री होत असते. यावर्षी देखील गतवर्षीपेक्षा अधिक प्रमाणात कडधान्य विक्रीसाठी ठेवण्यास सुरु वात केली असून सध्या हरभरा, मूग यांची विक्र ी सुरू असून ही दोन्ही कडधान्य पूर्णपणे गावठी म्हणजे स्थानिक असल्याने त्याच्या विक्र ीस मोठा ग्राहक मिळत असल्याचे दत्तात्रय पाटील यांच्या पत्नी मंजुळा यांचे म्हणणे आहे. तर गावठी स्वरूपाचा वाल मोठ्या प्रमाणात पाटील यांच्या शेतात बहरला असून त्यामुळे संपूर्ण परिसरात विशिष्ट प्रकारचा सुगंध पसरला आहे. त्याचवेळी तूर शेती देखील फुलली असून मोठ्या प्रमाणात पिवळ्या फुलांची दुलई त्या शेतात दिसून येत आहे. यासर्व शेतीसाठी जमिनीची उखळण आणि त्यात कडधान्य पीक घेण्यासाठी टाकलेले बियाणे याशिवाय इतर कोणताही खर्च त्यांच्या शेतात पीक घेण्यासाठी करावा लागला नाही. पूर्णपणे जमिनीतील नैसर्गिक ओलाव्याचा फायदा घेऊन केलेली शेती कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. (वार्ताहर)>तब्बल दीड एकर जमिनीत तूर पिकविण्यासाठी शेती केली असून गतवर्षीपेक्षा अधिक उत्पन्न मिळण्याचा विश्वास आहे. हे सर्व कडधान्य विकण्यासाठी कोणतीही वेगळी बाजारपेठ मिळविण्याची आम्हाला गरज नाही. कारण फळ विक्र ी करण्यासाठी उघडलेल्या दुकानात सर्व कडधान्ये विकली जातात आणि विक्र ीसाठी वेगळे कष्ट न घेता उत्पन्न अधिक मिळत आहे.-दत्तात्रय पाटील, शेतकरी, कोल्हारेजमिनीतील नैसर्गिक ओलाव्यामुळे पाटील कुटुंबाने मागील वर्षी तब्बल १५० किलो वाल तसेच २०० किलो तूर पिकवली होती. त्याचवेळी हरभरा आणि मूग यांची देखील ६०-७० किलो विक्र ी पाटील कुटुंबाने केली आहे.यावर्षी देखील गतवर्षीपेक्षा अधिक प्रमाणात कडधान्य विक्र ीसाठी ठेवण्यास सुरु वात केली असून सध्या हरभरा, मूग यांची विक्र ी सुरू असून ही दोन्ही कडधान्य पूर्णपणे गावठी म्हणजे स्थानिक असल्याने त्याच्या विक्र ीस मोठा ग्राहक मिळत आहे. या सर्व शेतीसाठी जमिनीची उखळण आणि त्यात कडधान्य पीक घेण्यासाठी टाकलेले बियाणे याशिवाय इतर कोणताही खर्च के ला नसल्याची माहिती दत्तात्रय पाटील यांनी दिली.