शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

डाळी पुन्हा कडाडल्या!

By admin | Updated: September 4, 2016 00:40 IST

मागील आठवड्यापर्यंत आवाक्यात येऊ लागलेल्या डाळी पुन्हा कडाडल्या आहेत. घाऊक बाजारात तूरडाळीसह हरभरा डाळीनेही शंभरीचा टप्पा ओलांडला आहे. आठवडाभरात दोन्ही

पुणे : मागील आठवड्यापर्यंत आवाक्यात येऊ लागलेल्या डाळी पुन्हा कडाडल्या आहेत. घाऊक बाजारात तूरडाळीसह हरभरा डाळीनेही शंभरीचा टप्पा ओलांडला आहे. आठवडाभरात दोन्ही डाळींचे भाव क्विंटलमागे दीड ते दोन हजार रुपयांनी वाढले आहेत.गुलटेकडी येथील मार्केटयार्डातील घाऊक बाजारात मागील वर्षभर शंभरीच्या पुढे गेलेल्या तूरडाळीने १० दिवसांपूर्वी दीड वर्षातील भावाचा नीचांक गाठला होता. हे भाव क्विंटलमागे ७५०० ते ८५०० रुपयांपर्यंत खाली आले होते. मार्च २०१५मध्ये तूरडाळीचे भाव क्विंटलमागे सुमारे ८५०० ते ८००० रुपये एवढे होते. त्यामुळे पुढील काही दिवसांत हे भाव आणखी घसरण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र, प्रत्यक्षात तूरडाळीसह हरभरा, मूगडाळ व मटकीडाळीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. मागील काही महिन्यांत बाजारात डाळींची आवक मोठ्या प्रमाणावर होत होती. केंद्र व राज्य शासनाच्या विविध प्रयत्नांमुळे भावही आटोक्यात येऊ लागले होते. त्यामुळे बाजारात मुबलक प्रमाणात डाळी उपलब्ध झाल्या होत्या. त्यामुळे शासनाच्या ९५ रुपये प्रति किलो भावाच्या तूरडाळीकडेही ग्राहकांनी पाठ फिरवली होती. (प्रतिनिधी)सद्य:स्थितीत डाळींचा साठा कमी होऊ लागल्याने साठेबाजांनी पुन्हा साठेबाजी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जागेवरच डाळींचे भाव वाढले आहेत. आठवडाभरात अपेक्षेपेक्षा अधिक भाववाढ झाली आहे. ३० आॅगस्टपर्यंत भाव कमी होत चालले होते. त्यानंतर मात्र, भावाने अचानक उसळी घेतली. काही दिवस ही भाववाढ कायम राहण्याची शक्यता व्यापारी विजय राठोड यांनी व्यक्त केली.