शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

लागला टकळा पंढरीचा!

By admin | Updated: June 20, 2014 22:38 IST

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे उद्या (शनिवारी) सकाळी सहाला आजोळघरातून पंढरीकडे प्रस्थान होईल.

शेलपिंपळगाव / आळंदी  : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे उद्या (शनिवारी) सकाळी सहाला आजोळघरातून पंढरीकडे प्रस्थान होईल. प्रस्थानापूर्वी शनिवारी पहाटे एक वाजता माऊलींच्या पादुकांना रुद्राभिषेक करण्यात येणार असून, नंतर पंचामृत पूजा, पंचपक्वान्न नैवेद्य, आरती व पसायदान घेतले जाणार आहे.
ज्ञानेश्वरमहाराजांचा आषाढी पायीवारी पालखी प्रस्थान सोहळा लाखो वैष्णवांसह आजपासून पंढरीच्या वाटेवर निघणार आहे. रात्नी उशिरा आजोळघरात विसावलेल्या या सोहळ्यातील माऊलींच्या पादुकांचे लाखो वारक:यांनी अगदी सहज व सुलभ दर्शन घेतले. माऊलींच्या दर्शनसाठी रात्नीपासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
धन्य आज संत दशर्नाचा !
अनंत जन्मीचा शीण गेला !!
मज वाटे त्यांशी आलिंगन द्यावे !
कदा न सोडावे चरण त्यांचे !!
अशीच भावना प्रत्येक वारक:यांमध्ये दिसत होती. संपूर्ण अलंकापुरी चैतन्यमय, धार्मिक वातावरणात दंग झाली आहे. वारक:यांच्या संख्येत अजूनही वाढ होत आहे. शनिवारी पहाटे साडेपाच वाजता परंपरेनुसार शितोळे सरकारांचा माऊलींच्या पालखीला नैवेद्य दाखविला जाईल. पावणोसहाच्या दरम्यान शितोळे सरकारांचे अश्व आजोळघरी आणले जाणार असून, गांधीवाडय़ात त्यांना मानपान दिले जाईल. त्यानंतर माऊलींची पालखी आळंदी ग्रामस्थ व मानकरी खांद्यावर घेऊन नगरपालिकेसमोर सजविलेल्या रथात विराजमान करतील. वाजतगाजत पालखी सोहळा पुढे धाकटय़ा पादुका व नंतर साई मंदिरासमोर थोरल्या पादुकांशेजारी जाऊन विसावा घेईल. या ठिकाणी देवाची आरती होईल. आरतीनंतर पालखी पुण्याकडे मार्गस्थ होईल. नवमी व दशमीला हा सोहळा पुण्यात भवानी पेठेत, तर एकादशीला सासवड या ठिकाणी मुक्काम करेल.
 
माऊलींचे आजोळघर..
 माऊलींचे आजोळघर पूर्वी गोसावी यांचा वाडा होता. त्यांच्याकडून हा वाडा श्रीपाद गांधी यांनी खरेदी केला. पूर्वी पालखीचे प्रस्थान ज्येष्ठ वैद्य नवमीला होत असे; परंतु कधी कधी सलग दोन नवम्या येत असल्याने सोहळा प्रस्थानानंतर माउलींची पालखी ठेवायची कोठे? असा पेच निर्माण होई. हा पेच सोडविण्यासाठी माऊलींची पालखी मंदिराशेजारील गांधीवाडय़ात ठेवण्यात येऊ लागली. पुढे हीच प्रथा रूढ झाली. कालांतराने याच वाडय़ाला ‘माऊलींचे आजोळघर’ संबोधले जाऊ लागले. गांधीवाडय़ात माऊली आल्यानंतर त्यांच्या सर्व सेवेचा मान याच घरण्याकडे देण्यात आला. आजही ही परंपरा सुरू आहे.