शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

मलंग पट्ट्यातील गावांत आता पक्के रस्ते

By admin | Updated: June 9, 2016 04:30 IST

तालुक्यातील ग्रामीण भागात मोडणाऱ्या मलंगगड पट्ट्यातील गावांमध्ये अंतर्गत रस्ते तयार केले जाणार आहेत.

कल्याण : तालुक्यातील ग्रामीण भागात मोडणाऱ्या मलंगगड पट्ट्यातील गावांमध्ये अंतर्गत रस्ते तयार केले जाणार आहेत. ग्रामविकास निधीतून होणाऱ्या या कामांचा प्रारंभ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जलसंवर्धन कामाची पाहणी करण्यात आली. मलंगगडाच्या पायथ्याशी एक लाख लीटर क्षमतेच्या आॅस्ट्रेलियन पद्धतीने बांधलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटनही डॉ. शिंदे यांच्या हस्ते झाले. टाकीची एक पाइपलाइन संपूर्ण गावातून फिरवण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक घरासमोर नळ देण्यात आला आहे. खासदार निधीतून मलंगवाडी, नेवाळीपाडा, चिंचवली, कुंभार्ली, काकडवाल, मांगरूळ, आंभे, उसाटणे, पोसरी, खरड येथे बोअरवेल खोदून त्यात मोटार व हातपंप बसवण्यात आले आहेत. तसेच, नेवाळी व मलंगगड येथील भेंडीचापाडा येथे पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. नेवाळीपाडा, उसाटणे येथील तलावांची खोली वाढवून गाळ काढण्याची कामे सुरू आहेत. काकडवाल, चिंचोली, आंभे, कुशवली, कुंभार्ली, पोसरी या गावांजवळील वन व पाटबंधारे यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व बंधाऱ्यांमधील गाळ काढून त्यांच्या खोलीकरणाचीही कामे सुरू आहेत. या कामांची पाहणीही यावेळी करण्यात आली. याप्रसंगी वनविभागाचे बदलापूरचे परिक्षेत्र वन अधिकारी चंद्रकांत शेळके, शिवसेनेचे अंबरनाथ तालुकाप्रमुख अशोक म्हात्रे, उपतालुकाप्रमुख रामचंद्र मढवी, नेवाळीचे सरपंच चैनू जाधव, विभागप्रमुख जितेंद्र पाटील, अंकुश पाटील, हिरामण जाधव, विजय जोशी आदी उपस्थित होते.ठाणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी आणि ठाण्याचे उपवनसंरक्षक किशोर ठाकरे यांच्यासमवेत बैठक घेऊन जलसंवर्धनाचे कार्यक्र म मोठ्या प्रमाणावर राबवण्याबाबत चर्चा करून आराखडा तयार केला होता. वनविभागाने १५ वर्षांपूर्वी बांधलेल्या बंधाऱ्यांमधील गाळ काढण्याचा आग्रह डॉ. शिंदे यांनी धरल्यानंतर वनविभागाने ते कामे सुरू केले आहे. मलंगगड परिसरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन या परिसरात माथा ते पायथा पद्धतीने पाणी अडवण्याच्या व जिरवण्याच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यास वनविभागाला सांगितले होते. ते अंतिम टप्प्यात आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीद्वारे मिळण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.>बोहोनोली, मलंगवाडी येथे केले वृक्षारोपणमृगनक्षत्राचे औचित्यसाधून बोहोनोली आणि मलंगवाडी येथे वनविभागाच्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले. स्थानिक प्रजातीची झाडे आणि फळझाडांचे येथे प्रामुख्याने रोपण करण्यात आले आहे. येथील संपूर्ण टेकडी हिरवीगार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.