शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

तटकरेंच्या पुस्तकाचे प्रकाशन : फडणवीसांच्या अनुपस्थितीची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 04:07 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पुस्तक प्रकाशनाला येण्याचे कबूल करूनही आयत्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाला गैरहजर राहिल्यावरून राजकीय चर्चा रंगली आहे.

अतुल कुलकर्णी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पुस्तक प्रकाशनाला येण्याचे कबूल करूनही आयत्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाला गैरहजर राहिल्यावरून राजकीय चर्चा रंगली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेली निदर्शने यामुळे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली.विशेष म्हणजे त्याच कार्यक्र मात शरद पवार यांनी महाराष्ट्र राजकीय दृष्टीने सुसंस्कृत आहे, राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होण्याची परंपरा फक्त याच राज्यात आहे, असे सांगितले. राष्ट्रवादीचे एक नेते म्हणाले, मुख्यमंत्र्यांना जर कार्यक्रमाला यायचेच नव्हते तर आधीच नकार दिला असता तरीही चालले असते. मात्र त्यांनी कार्यक्रम स्वीकारलेला असताना ऐनवेळी येण्याचे रद्द केले. आधी मुख्यमंत्री नांदेडहून निघाल्याची बातमी आली पण त्यांचे विमान औरंगाबादला उतरले तेव्हा मुख्यमंत्री येणार नाहीत हे स्पष्ट झाले. तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर तटकरे संकटात असूनही हिमतीने उभे आहेत, असे आपल्या भाषणात सांगितले. पण हे सांगण्याचे ते व्यासपीठ नव्हते, असेही तो नेता म्हणाला. राजकीय लढाया लढण्याची व्यासपीठे वेगळी असतात, याचे भान भाजपाने दाखवले नाही, शरद पवार यांनी ज्या भावना भाषणात मांडल्या त्याउलट कालचे राजकीय चित्र होते, असेही तो नेता म्हणाला.उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमाला जातच आहात तर तटकरेंना क्लीन चिटही देऊन टाका, असा सल्ला दिला होता. त्यामुळे शिवसेनेचे कोणीही मंत्री या कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. खा. संजय राऊत आले होते. त्यांना स्टेजवर बसण्याची विनंती आयोजकांनी केली. पण राऊत यांनी त्यास नकार देत खाली श्रोत्यांमध्ये बसणे पसंत केले होते.भाजपाने मात्र आम्ही आमचे तीन-चार प्रमुख मंत्री पाठवले होते. त्यामुळे याचे राजकीय भांडवल करू नये असे म्हटले आहे. अंजली दमानिया यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे पण त्यांच्या कथित आंदोलनाला मुख्यमंत्री न येण्याने दमानिया मोठ्या झाल्या अशी खोचक टिपणीही राष्ट्रवादीच्या नेत्याने केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस