शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लोकसेवा हक्क विधेयक मंजूर

By admin | Updated: July 15, 2015 00:19 IST

राज्यातील सर्वसामान्य माणसाला प्रशासनाकडून वेळेत सेवेची हमी देणारे महाराष्ट्र लोकसेवा हक्क विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले.

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य माणसाला प्रशासनाकडून वेळेत सेवेची हमी देणारे महाराष्ट्र लोकसेवा हक्क विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले. उत्तरदायी, गतिमान, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी राज्य सरकारने आज या विधयेकाच्या माध्यमातून क्रांतिकारी पाऊल टाकले आहे. यामुळे शासनाच्या विविध विभागांच्या ११० प्रकारच्या सेवा निश्चित कालावधीत प्राप्त करण्याचा अधिकार नागरिकांना मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या विधेयकाला दोन्ही सभागृहांची मान्यता मिळाल्यानंतर लगेच कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीची नियमावली निश्चित केली जाईल. सरकार दरबारी लोकांची कामे निश्चित वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने हा कायदा मैलाचा दगड असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या कायद्यात तूर्त ११० शासकीय सेवांचा समावेश करण्यात आला असला तरी त्यांची संख्या नजीकच्या भविष्यात वाढविली जाईल. तसेच, कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना काही त्रुटी असल्याचे आढळले तर कायद्यात दुरुस्त्याही केल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. सरकारला कायद्यासाठी विधेयकच आणायचे होते तर तीन महिन्यांपूर्वी अध्यादेश काढण्याची काय गरज होती आणि अध्यादेशाने सरकारने काय साधले, असा सवाल ज्येष्ठ सदस्य शेकापचे गणपतराव देशमुख यांनी केला. यावर, या तीन महिन्यांत कायद्यांतर्गतच्या सेवांची निश्चिती करण्यात आली, हे काम मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने केले, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)...तर बडतर्फयापूर्वी राज्यातील नागरिकांना प्रशासनाकडून सेवा प्राप्त करून घेण्याबाबत कोणताही कायदेशीर अधिकार नव्हता. तसेच एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याने नागरिकांना सेवा नाकारल्यास संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करणे शक्य होत नव्हते. आता मात्र या कायद्यामुळे ही परिस्थिती बदलणार आहे. निश्चित कालावधीत योग्य पद्धतीने सेवा न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासोबतच सेवेतून बडतर्फीची कठोर तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.