शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

नियोजित महापालिकेची जनसुनावणी

By admin | Updated: July 18, 2016 02:36 IST

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली नियोजित पनवेल महानगरपालिकेची जनसुनावणी शनिवारी कोकण भवन येथे पार पडली.

पनवेल : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली नियोजित पनवेल महानगरपालिकेची जनसुनावणी शनिवारी कोकण भवन येथे पार पडली. जनसुनावणीवेळी आपल्या हरकती व तक्रारी नोंदविलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली ही जनसुनावणी पार पडली. महानगरपालिकेत समाविष्ट भागाचा वेध घेतल्यास अनेकांनी पनवेल महानगरपालिकेला हिरवा कंदील दाखविला आहे. मात्र खारघर शहरातून पनवेल महापालिकेमध्ये समाविष्ट होण्यास तीव्र विरोध दर्शविण्यास येत असल्याचे याठिकाणी स्पष्ट झाले आहे. पनवेल नगरपरिषद हद्दीसह शहर आणि वसाहती, सिडको क्षेत्रातील २१ गावे, नवी मुंबई विमानतळ अधिसूचित (नैना) क्षेत्रातील ३६ गावे, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रातील ११ गावांचा यामध्ये समावेश केला जाईल. शहर आणि ६८ गावे एकत्रित करून त्यात ५ लाख ९५ हजार लोकसंख्या गृहीत धरलेली आहे. जनसुनावणी वेळी ६८ गावांपैकी बहुतांशी गावांनी महानगरपालिकेत समाविष्ट होण्यास तयारी दर्शविली. खारघर, तळोजामधील शेकडो रहिवासी, लोकप्रतिनिधी याठिकाणी उपस्थित होते. खारघरसाठी स्वतंत्र महानगरपालिका असावी असा सूर या जनसुनावणीच्या वेळी उमटताना दिसला. भाजपा, सेना महानगरपालिकेच्या बाजूने असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. नागरिकांच्या हरकती व सूचनांचा अभ्यास करून अहवाल तयार केला जाईल, त्यानंतर तो अहवाल पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच महानगरपालिकेचे चित्र स्पष्ट होणार आहे. खारघरमधील नागरिकांनी याठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांचा हवाला देत सद्य:स्थितीत खारघरचा महानगरपालिकेत समावेश करू नये, अशी विनंती केली. नियोजित पनवेल महानगरपालिकेच्या अनुषंगाने चार हजारांच्या आसपास सूचना व हरकती जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या आहेत. नियोजित महानगरपालिका परिसर व शहरामधून सर्वात जास्त सूचना व हरकती खारघर शहर व परिसरातून आलेल्या आहेत त्याची प्रचिती जमलेले विविध पक्षाचे कार्यकर्ते, नागरिक यांच्या उपस्थितीवरून दिसून आली. पनवेल नगरपरिषदेची निवडणूक डिसेंबर महिन्यात होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार नव्याने प्रभाग रचना देखील करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिवस नागरिकांमध्ये संभ्रम होता. हरकतींवर व सूचनांवरील सुनावणी आता देखील पार पडली असून लवकरच महानगरपालिकेचे चित्र स्पष्ट होणार आहे हे मात्र निश्चित आहे. (प्रतिनिधी)