शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी जनजागृती

By admin | Updated: March 26, 2016 01:44 IST

अल्पावधीत पैसे दुप्पट-तिप्पट करण्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांना लुबाडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा फसव्या कंपन्यांना आळा बसावा यासाठी केबल टीव्ही, एफएम आणि

मुंबई : अल्पावधीत पैसे दुप्पट-तिप्पट करण्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांना लुबाडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा फसव्या कंपन्यांना आळा बसावा यासाठी केबल टीव्ही, एफएम आणि वृत्तपत्रांतील जाहिरातींच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरादरम्यान दिली. आर्थिक फसवणूक करणाऱ्या बोगस कंपन्यांवर कारवाई करण्याबाबतचा तारांकित प्रश्न गिरीशचंद्र व्यास, शोभाताई फडणवीस आदी सदस्यांनी विचारला होता. ५५ हजार कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी पर्ल्स कंपनीचा म्होरक्या निर्मलसिंग भांगू आणि त्याच्या साथीदारांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. मात्र, अद्याप या कंपनीच्या एजंटवर कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. यावर संचयनी, संजीवनी, शांतिदूत, कल्पवृक्ष, कामधेनू, निसर्ग फॉरेस्ट, पर्ल्स ग्रीन, अनुभव प्लांटेशन, सुमन मोटेल्स आदी विविध कंपन्यांच्या विरोधात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी राज्यभर ३३ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच कल्पवृक्ष मार्केटिंगविरोधात दाखल २९ गुन्ह्यांचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला असल्याची लेखी माहिती मुख्यमंत्र्यांनी उत्तरात दिली. पर्ल्स म्हणजेच आताच्या पीएसीएल कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे, कोल्हापूर, सातारा, बीड, गोंदियात गुन्हे दाखल आहेत. साताऱ्यातील फसवणूक प्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतलेल्या ४ आरोपींचा ताबा मिळवण्यासाठी दिल्लीच्या मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी उत्तरात सांगितले.