शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयातही करणार अवयवदानाची जनजागृती

By admin | Updated: September 20, 2016 02:59 IST

अवयवदानाविषयी जनजागृती राज्यभर होत आहे.

मुंबई : अवयवदानाविषयी जनजागृती राज्यभर होत आहे. पण, जिल्हा पातळीवर अजूनही काही ठिकाणी अवयवदान प्रक्रियेत समस्या निर्माण होतात. जिल्हा रुग्णालयांमध्येही अवयवदानाचा टक्का वाढावा म्हणून जिल्हा स्तरावर जाऊन ‘दी फेडरेशन आॅफ आॅर्गन अ‍ॅण्ड बॉडी डोनेशन’ प्रशिक्षण वर्ग घेणार आहेत. शहरी भागांत विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीमुळे संस्थांचे एक जाळे निर्माण झाले आहे. ज्या व्यक्तींना अवयवदान करायचे असले त्यांना या संस्था आणि समिती मदत करते. पण, याच पद्धतीने जिल्हा पातळीवर संस्थांचे एक जाळे निर्माण व्हावे यासाठी फेडरेशनने पुढाकार घेतला आहे. जिल्हा रुग्णालयातही अवयवदान वाढल्यास त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. जिल्हा पातळीवर अवयवदान वाढल्यास प्र्रतीक्षायादी कमी होण्यास अधिक फायदा होईल. त्यामुळे येत्या २५ सप्टेंबर रोजी मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघात एका परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत राज्यातील अवयवदानासाठी काम करणाऱ्या सर्व संस्था एकत्र येणार असल्याची माहिती फेडरेशनचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांनी दिली.या परिषदेत संस्था पहिल्यांदाच एकत्र भेटणार आहेत. त्यावेळी अवयवदान प्रक्रियेत येणाऱ्या समस्या, कोणत्या भागात प्रमाण वाढते आहे अथवा कमी आहे, अशा सर्व विषयांवर चर्चा करण्यात येणार आहेत. या परिषदेतून अवयवदान जनजागृतीसाठी एक जाळे तयार केले जाणार आहे. त्यानंतरच्या टप्प्यात जिल्हा रुग्णालयात जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. (प्रतिनिधी)