शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणकडून गणेशोत्सवात वीजवापराबाबत जनजागृती

By admin | Updated: September 18, 2015 00:53 IST

गणेशोत्सवात विना परवाना वीज वापरली जात असल्यामुळे सर्वात जास्त तोटा होत असेल तर महावितरणचा. त्यातून वाचण्यासाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांनी नामी

पुणे : गणेशोत्सवात विना परवाना वीज वापरली जात असल्यामुळे सर्वात जास्त तोटा होत असेल तर महावितरणचा. त्यातून वाचण्यासाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांनी नामी शक्कल लढवली आहे. विजेपासून काही आपत्ती निर्माण झाली तर काय काळजी घ्यायची या माहितीबरोबरच परवानगी घेऊन वीज वापरा असे आवाहन करणारे एक निवेदनच त्यांनी व्हाटस् अ‍ॅप व अन्य माध्यमातून जारी केले आहे. उत्सवाच्या काळात बहुसंख्य मंडळे विद्यूत रोषणाईसाठी महावितरणची वीज वापरत असतात. त्यांच्यातील अगदीच मोजकी मंडळे त्यासाठी अधिकृतपणे परवानगी घेतात. त्यामुळे उत्सवाच्या कालावधीत महावितरणची वीज तर खर्च होते, मात्र त्याचे शुल्क काही त्यांना मिळत नाही. बराच मोठा तोटा त्यांना यामुळे उत्सव काळात सहन करावा लागतो. सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांनी यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला आहे.गणेश मंडळांसाठी असलेल्या विजेचे दरच त्यांनी त्यांच्या निवेदनात जाहीर केले आहे. त्यानुसार मंडळांना फक्त ३ रूपये २७ पैसे प्रति युनिट या दराने वीज पुरवठा केला जातो. घरगुती विजेसाठीचा दर ३ रूपये ३६ पैसे प्रति युनिट व पथदिव्यांसाठीचा दर ४ रूपये २७ पैसे आहे. त्या तुलनेत मंडळांसाठीचा दर कमी असून त्यामुळे सर्व गणेशोत्सव मंडळांनी अधिकृत परवानगी घेऊनच उत्सवासाठी वीज वापरावी असे आवाहन महावितरणने केले आहे. याचबरोबर या निवेदनात विजेच्या तारा तुटल्यास काय काळजी घ्यायची याचीही माहिती दिली आहे. सर्व महावितरण अधिकारी व कर्मचारी अशा नावाने हे निवेदन व्हॉटस् अ‍ॅप वरील विविध ग्रुप्सना तसेच फेसबुकवरही पाठवण्यात आले आहे. (प्रतिनिधी) - सध्या पाऊस सुरू आहे, अशा काळात विजेचा शॉक बसणे, तारा तुटुन पडणे असे प्रकार होत असतात. तसे होऊ नयेत यासाठी आधीच काळजी घ्यावी व दुर्दैवाने काही प्रकार घडलेच तर त्वरीत महावितरणच्या नजिकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, तेथील दुरध्वनी क्रमांक मंडळाच्या दर्शनी भागावर लिहावेत असे आवाहन करण्यात आले आहे. - काही आपत्ती निर्माण झाली तर काय काळजी घ्यायची या माहितीबरोबरच परवानगी घेऊन वीज वापरा - मंडळांसाठीचा दर कमी असून सर्व मंडळांनी अधिकृत परवानगी घेऊनच वीज वापरावी असे आवाहन महावितरणने केले आहे.