शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

आत्महत्या रोखण्यासाठी मानसोपचाराची मदत

By admin | Updated: September 26, 2015 03:03 IST

विदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मानसिक प्रबोधन करण्यासाठी सरकारने मानसोपचार तज्ज्ञांची नेमणूक केली असून, त्यासाठी साडेसात कोटींचा निधी मंजूर केला आहे

विश्वास पाटील, कोल्हापूरविदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मानसिक प्रबोधन करण्यासाठी सरकारने मानसोपचार तज्ज्ञांची नेमणूक केली असून, त्यासाठी साडेसात कोटींचा निधी मंजूर केला आहे. यापूर्वीही काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात असाच प्रयत्न झाला होता; परंतु त्यानंतरही आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही.शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. या प्रकल्पास ‘पे्ररणा प्रकल्प-शेतकरी मानसिक आरोग्य सेवा कार्यक्रम’ असे संबोधण्यात येणार आहे. त्यानुसार औरंगाबाद, जालना, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, अकोला, यवतमाळ, वाशिम, परभणी, उस्मानाबाद, अमरावती, बुलडाणा व वर्धा या जिल्ह्यांत शाश्वत आरोग्य सेवा देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत बीड, बुलडाणा, हिंगोली, जालना, उस्मानाबाद, परभणी, वाशिम आणि वर्धा येथील जिल्हा रुग्णालयांत व अकोला, औरंगाबाद, नांदेड, लातूर आणि यवतमाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात मानसोपचार कक्षाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या उपक्रमाबद्दल शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांना विचारले असता ते म्हणाले, की शेतकऱ्यांचे मानसिक प्रबोधन करणे म्हणजे आत्महत्येचा विषय दुसरीकडेच वळविणे होय. नैसर्गिक संकटे वाढत आहेत. शेतकऱ्यांचे जगणे अधिक खर्चाचे होत आहे आणि बाजारातील अनिश्चितीमुळे त्याचा तोटा वाढत आहे. यंदाच्या हंगामात विदर्भातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी एकरी १० ते १५ हजार रुपये खर्च केले आहेत आणि ते पीक वाया गेले आहे. जुने कर्ज फेडल्याशिवाय नवे कर्ज मिळणार नाही व ते फेडायचे कसे, याचे उत्तर शेतकऱ्यांजवळ नाही. असे असताना प्रबोधनाने काय साधणार, असा सवालही जावंधिया यांनी केला.