शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

आत्महत्या रोखण्यासाठी मानसोपचाराची मदत

By admin | Updated: September 26, 2015 03:03 IST

विदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मानसिक प्रबोधन करण्यासाठी सरकारने मानसोपचार तज्ज्ञांची नेमणूक केली असून, त्यासाठी साडेसात कोटींचा निधी मंजूर केला आहे

विश्वास पाटील, कोल्हापूरविदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मानसिक प्रबोधन करण्यासाठी सरकारने मानसोपचार तज्ज्ञांची नेमणूक केली असून, त्यासाठी साडेसात कोटींचा निधी मंजूर केला आहे. यापूर्वीही काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात असाच प्रयत्न झाला होता; परंतु त्यानंतरही आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही.शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. या प्रकल्पास ‘पे्ररणा प्रकल्प-शेतकरी मानसिक आरोग्य सेवा कार्यक्रम’ असे संबोधण्यात येणार आहे. त्यानुसार औरंगाबाद, जालना, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, अकोला, यवतमाळ, वाशिम, परभणी, उस्मानाबाद, अमरावती, बुलडाणा व वर्धा या जिल्ह्यांत शाश्वत आरोग्य सेवा देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत बीड, बुलडाणा, हिंगोली, जालना, उस्मानाबाद, परभणी, वाशिम आणि वर्धा येथील जिल्हा रुग्णालयांत व अकोला, औरंगाबाद, नांदेड, लातूर आणि यवतमाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात मानसोपचार कक्षाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या उपक्रमाबद्दल शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांना विचारले असता ते म्हणाले, की शेतकऱ्यांचे मानसिक प्रबोधन करणे म्हणजे आत्महत्येचा विषय दुसरीकडेच वळविणे होय. नैसर्गिक संकटे वाढत आहेत. शेतकऱ्यांचे जगणे अधिक खर्चाचे होत आहे आणि बाजारातील अनिश्चितीमुळे त्याचा तोटा वाढत आहे. यंदाच्या हंगामात विदर्भातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी एकरी १० ते १५ हजार रुपये खर्च केले आहेत आणि ते पीक वाया गेले आहे. जुने कर्ज फेडल्याशिवाय नवे कर्ज मिळणार नाही व ते फेडायचे कसे, याचे उत्तर शेतकऱ्यांजवळ नाही. असे असताना प्रबोधनाने काय साधणार, असा सवालही जावंधिया यांनी केला.