शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
3
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
4
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
5
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
6
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
7
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
8
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
9
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
10
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
11
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
12
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
13
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
14
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
15
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
16
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
17
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
18
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
19
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
20
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती

तरतूद दोन हजार कोटींची घोषणा सात हजार कोटींच्या

By admin | Updated: December 12, 2014 01:57 IST

भाजप-शिवसेना युती सरकारने राज्यातील दुष्काळग्रस्त शेतक:यांना मदत देण्यासाठी पुरवणी मागण्यात 2 हजार कोटींची तरतूद दाखविली आहे.

नागपूर : भाजप-शिवसेना युती सरकारने राज्यातील दुष्काळग्रस्त शेतक:यांना मदत देण्यासाठी  पुरवणी मागण्यात 2 हजार कोटींची तरतूद दाखविली आहे. पॅकेजमध्ये मात्र 7 हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. हा शेतक:यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील तसेच काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पतंगराव कदम आदींनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला.
राज्यातील 19 हजारांहून अधिक गावातील पैसेवारी 5क् पैशापेक्षा कमी आहे. पैसेवारी कमी असलेल्या सर्वच गावांना मदतीची गरज आहे. परंतु पॅकेजमध्ये मराठवाडा व विदर्भातील दुष्काळग्रस्त भागासाठीच मदतीची घोषणा केलेली आहे. वास्तविक खरीप हंगाम बुडाल्याने प्रतिहेक्टरी 25 हजार तर ओलिताच्या शेतीला 5क् हजारांची मागणी केली. पीक कर्ज माफ करण्याची मागणी केली होती. तिही मान्य केलेली नाही. केवळ पीक कर्जावरील व्याज माफ करण्याची घोषणा केली आहे. जुन्याच योजना एकत्रित करून पॅकेजची घोषणा करण्यात आल्याचा आरोप अजीत पवार यांनी केला. यावर बोलण्याची संधी द्यावी, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली परंतु त्यांनी संधी नाकारली. सोलर पंपासाठी तरतूद कोण करणार. शेतक:यांना तातडीने रोख रक्कम किती मिळणार हेही स्पष्ट केले नसल्याचे त्यांनी सांगितले.
पॅकेजमध्ये सोयाबीन, कापूस, धान व फळबागांना मदत मिळण्याची अपेक्षा होती. तसेच दूध उत्पादक शेतक:यांसाठी घोषणा होईल, अशी आशा होती.  (प्रतिनिधी)
 
दुष्काळमुक्तीचा जुनाच अजेंडा
कर्जावरील व्याज माफी, कर्जाचे पुनर्गठन, वीज बील माफी यापूर्वीही दिली आहे. युती सरकारने पॅकेजमध्ये तीन महिन्याचेच वीज माफ दिली आहे.  आम्ही 1क् हजार कोटींच्या पॅकेजची मागणी केली होती. परंतु ती नाकारली. आघाडीच्या काळात दुष्काळमुक्तीसाठी राबविलेल्या जुन्याच अजेंडय़ाची युती सरकारने पॅकेजमध्ये घोषणा केल्याचा टीका राधाकृष्ण विखे-पाटील  व डॉ. पतंगराव कदम यांनी यांनी केली.
कोकणाला काहीच नाही
राज्यात  भाजप-शिवसेना सत्तेत सहभागी असूनही पॅकजेमध्ये कोकणाला काहीच दिले नाही. या भागातील शेतक:यांवर अन्याय केला. सत्तेत असूनही न्याय मिळत नसेल तर त्यांना लोकांना का निवडून द्यावे, असा प्रश्न नितेश राणो यांनी केला.