शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

रस्त्यांसाठी तरतूद भरीव!

By admin | Updated: March 19, 2017 02:34 IST

मोठमोठे आकडे आणि आकर्षक शब्दयोजना हे गत काही वर्षांपासून अर्थसंकल्पीय भाषणांचे वैशिष्ट्य झाले आहे. जनतेला अपेक्षा असलेल्या प्रत्येक क्षेत्रासाठी भरीव तरतूद

- रवी टाले

मोठमोठे आकडे आणि आकर्षक शब्दयोजना हे गत काही वर्षांपासून अर्थसंकल्पीय भाषणांचे वैशिष्ट्य झाले आहे. जनतेला अपेक्षा असलेल्या प्रत्येक क्षेत्रासाठी भरीव तरतूद केल्याचे चित्र अर्थसंकल्पात रंगविलेले असते. वर्षाच्या अखेरीस मात्र त्या क्षेत्राची स्थिती ‘जैसे थे’ असल्याचा प्रत्यय येतो. रस्ते हे त्याचे सर्वांगसुंदर उदाहरण! अगदी गुळगुळीत नव्हे, तरी किमान खड्डेमुक्त रस्ते मिळण्याची अपेक्षा जनता वर्षानुवर्षांपासून करीत आहे; मात्र रस्त्यांवर खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता आहे, याचा शोधच तिच्या नशिबी लिहून ठेवलेला आहे. रस्त्यांबद्दल बोलायचे झाले, की जॉन एफ. केनेडी यांचे वाक्य उद््धृत करायचे, हा जणू काही शिरस्ताच झाला आहे. त्याला जागत जनतेला दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी भरीव तरतुदी केल्याचा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय भाषणात केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासाठीची तरतूद गतवर्षीच्या सुमारे साडेचार हजार कोटींवरून सात हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही वाढ कागदावर घसघशीत भासत असली, तरी ती रस्त्यांवर उतरणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. त्याशिवाय हायब्रिड अ‍ॅन्युइटीमध्ये ३० हजार कोटी रुपये एवढ्या अंदाजित किमतीची १९५ कामे प्रस्तावित करण्यात आली असून, त्यासाठी चालू वर्षी साडेतीन हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. वाहनधारकांकडून एकरकमी रस्ते कर वसूल केल्यानंतरही त्यांना टोल टॅक्सरूपी खंडणी देण्यास भाग पाडणाऱ्या बीओटी-टोल मॉडेलनंतरचे हायब्रिड अ‍ॅन्युइटी हे नवे मॉडेल आहे. बीओटी-टोल मॉडेलच्या आधी बीओटी-अ‍ॅन्युइटी हे मॉडेल चलनात आणण्यात आले होते. हायब्रिड अ‍ॅन्युइटी हे त्या दोघांचा सुवर्णमध्य साधणारे चांगले मॉडेल आहे, असे म्हणता येईल. दर्जा टिकविण्याचे आव्हानअर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निधीतून प्रत्येक रस्त्याच्या किमान दहा किलोमीटर लांबीच्या देखभाल दुरुस्तीचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. ही स्वागतार्ह तरतूद असली तरी मूळ प्रश्न कायम आहे-प्रत्यक्षात काय होणार? याशिवाय केंद्रीय मार्ग निधीतून किती लांबीच्या रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत, किती पुलांची कामे सुरू आहेत, याचा गौरवपूर्ण उल्लेख मुनगंटीवार यांनी भाषणातून केला. केवळ राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषित केल्याने काम भागत नसते, तर त्याचा दर्जाही उंचवावा लागतो, हे त्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. रस्त्यांची अवस्था ‘माय जेऊ घालत नाही अन् बाप भीक मागू देत नाही’, अशी होऊ लागली आहे.