शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

चौपाट्यांवर सुरक्षा पुरवा

By admin | Updated: June 18, 2016 01:26 IST

राज्यातील चौपाट्यांवर सुरक्षा साधने तसेच जीवरक्षक मनुष्यबळ पुरविण्यास प्राधान्य द्या, असे आदेश देत चौपाट्यांच्या सुरक्षेवरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच फैलावर

मुंबई : राज्यातील चौपाट्यांवर सुरक्षा साधने तसेच जीवरक्षक मनुष्यबळ पुरविण्यास प्राधान्य द्या, असे आदेश देत चौपाट्यांच्या सुरक्षेवरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच फैलावर घेतले. मुंबई व कोकणातील चौपट्या पर्यटकांसाठी सुरक्षित असाव्यात, यासाठी राज्य सरकारने २००६ मध्ये अधिसूचना काढली. मात्र या अधिसूचनेला १० वर्षे उलटून गेली तरी त्यावर अंमलबजावणी करण्यात न आल्याने न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारची खरडपट्टी काढली. मुख्य सचिवांनी मार्चमध्ये घेतलेल्या आढावा बैठकीतूनही काही निष्पन्न झाले नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या चौपाट्यांच्या सुरक्षेसाठी कोणकोणत्या उपाययोजना आखण्यात याव्यात, यासंदर्भात राज्य सरकारने २००६ मध्ये अधिसूचना काढली होती. मात्र या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याबाबत राज्य सरकार उदासीन असल्याने जनहित मंच या एनजीओने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. या अधिसूचनेचे पुनरावलोकन करण्यासाठी ३ मार्च रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या चौपाट्यांवर वॉच टॉवर, जीवरक्षक, जीवरक्षक बोट, लाइफ जॅकेट इत्यादी सुविधा उपलब्ध करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली, अशी माहिती मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी खंडपीठाला दिली. अंतिम मुदत ठरवूनही जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप या सुविधा चौपाट्यांवर उपलब्ध करण्यात न आल्याने खंडपीठ संतापले. ३ मार्च रोजी घेण्यात आलेल्या बैठकीतून काहीही निष्पन्न झाले नाही. या बैठकीत घेतलेल्या निर्णयावर काहीही अंमलबजावणी करण्यात आली नाही, असे निरीक्षण नोंदवण्यास आम्हाला भाग पाडले आहात. अधिसूचना काढून १० वर्षे उलटली, परंतु त्यावर अंमलबजावणी करेपर्यंत अनेक लोकांचे मृत्यू झाले, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण १९ चौपाट्या आहेत. त्यापैकी १२ चौपाट्या पर्यटकांमध्ये आणि स्थानिकांमध्ये प्रसिद्ध आहेत. पण या चौपाट्यांवर अवघे दोनच जीवरक्षक नेमण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)

कंत्राटी माणसेही नेमा

- सरकारला सर्व चौपाट्यांवर आवश्यक ती सर्व साधने आणि मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत अंतिम मुदत देत खंडपीठाने ज्या चौपाट्या असुरक्षित म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत, त्या चौपाट्यांवर जीवरक्षक आणि अन्य साधने उपलब्ध करण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे आदेश सरकारला दिले. जोपर्यंत कायमस्वरूपी जीवरक्षक नियुक्त करण्यात येत नाहीत तोपर्यंत कंत्राटी पद्धतीने जीवरक्षक नेमण्यात यावेत, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

- राज्य सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, मुंबई महापालिकेने पावसाळ्याचा विचार करून चौपाट्यांवर २९ जीवरक्षक नेमले आहेत. तसेच पावसाळ्यात एखादी दुर्घटना घडली तर नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स व सिव्हिल डिफेन्सचे जवानही तैनात करण्यात येतील.