शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

घटक पक्षांच्या उमेदवारांची माहिती द्या!

By admin | Updated: September 30, 2014 01:02 IST

भाजप पक्षश्रेष्ठींचे जिल्हाध्यक्षांना आदेश

अकोला : महायुती तुटल्यानंतर उमेदवार निश्‍चित करताना उडालेला गोंधळ बघता, भाजपने त्यांच्यासोबत असलेल्या घटक पक्षांच्या नेत्यांकडून दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची माहिती गोळा करणे सुरू केले आहे. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांना तातडीने ही माहिती प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्याचे आदेश भाजपने दिले असून, संपूर्ण माहिती गोळा झाल्यानंतर कुणाची उमेदवारी कायम ठेवायची आणि कुणाला माघार घ्यायला लावायची, याबाबत निर्णय होणार आहे.भाजप-शिवसेनेची २५ वर्षांची युती यंदाच्या निवडणुकीत संपुष्टात आली. राज्याच्या राजकारणातील ही सर्वात मोठी उलथापालथ आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होण्यास केवळ दोन दिवसांचा अवधी असताना, युती तुटल्यामुळे इच्छुक उमेदवारांची चांगलीच धावपळ झाली. या धाव पळीत महायुतीमध्ये भाजप-शिवसेनेसोबत असलेल्या घटक पक्षांच्या उमेदवारांची फरफट झाली. कोणता मतदारसंघ कोणत्या घटक पक्षाला सोडण्यात आला, याबाबतची निश्‍चित माहितीच नसल्यामुळे, काही मतदारसंघांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं (आठवले गट) आणि शिवसंग्रामच्या उमेदवारांनी नामांकन दाखल केले. काही ठिकाणी घटक पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरताना, थेट भाजपचा उमेदवार म्हणून अर्ज सादर केले. पश्‍चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात रिपाइंचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांनी मेहकर येथून भाजपतर्फे उमेदवारी दाखल केली. खामगाव येथे स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हेमेंद्र ठाकरे यांनी, तर वाशिम मतदारसंघातून रिपाइंचे (आठवले गट) तेजराव वानखेडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अकोला जिल्ह्यात बाळापूर मतदारसंघातून शिवसंग्रामचे नेते संदीप पाटील लोड यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला असून, अकोला पूर्व मतदारसंघातून रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक नागदेवे यांचा अर्ज आहे. या उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्राबाबतची माहिती भाजपच्या जिल्हा कार्यालयाकडून प्रदेश कार्यालयाकडे तातडीने पाठविली जात आहे. घटक पक्षांच्या सर्व उमेदवारांची माहिती गोळा केल्यानंतर कोणत्या मतदारसंघात कुणाची उमेदवारी कायम ठेवायची आणि कुणाला माघार घ्यायला लावायची, याबाबतचा निर्णय पक्षस्तरावर होणार आहे.