शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ मदत देणार

By admin | Updated: April 2, 2017 23:46 IST

सदाभाऊ खोत : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यामधील अवकाळीग्रस्त भागाला भेट

तासगाव/ कवठेमहांकाळ : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार संजयकाका पाटील यांनी सावळज (ता. तासगाव) व कवठेमहांकाळ तालुक्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्षबागांची पाहणी केली. यावेळी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन तात्काळ मदत करण्याचे आश्वासन मंत्री खोत यांनी दिले.शनिवारी तासगाव व कवठेमहांकाळ तालका परिसरात वादळी वारे आणि गारपीटीसह अवकाळी पावसाने तडाखा दिला होता. या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांचे नुकसान झाले, तर अनेक शेतकऱ्यांच्या बागा उखडून पडल्या. या पार्श्वभूमीवर रविवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार संजयकाका पाटील यांनी सावळज येथे भेट देऊन, येथील नुकसान झालेल्या विजय पाटील आणि सरपंच हेमंत पाटील यांच्या द्राक्षबागेची पाहणी केली. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक एन. टी. शिसोदे, तहसीलदार सुधाकर भोसले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. तसेच येथील मृत शेतकरी विठ्ठल मोरे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.यावेळी बोलताना ना. सदाभाऊ खोत म्हणाले, अवकाळी पावसाने तासगाव तालुक्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. सावळज परिसरात गारपीट आणि पावसाने द्राक्षबागांचे नुकसान झाले असून, सर्व बागांचे आणि इतर पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. दोन दिवसात अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर केली जाईल. तसेच मृत विठ्ठल मोरे या शेतकऱ्याच्या वारसांना गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेतून मदत देण्याचे आदेश तहसीलदार भोसले यांना त्यांनी दिले.यावेळी खा. संजयकाका पाटील म्हणाले, द्राक्षबागा पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बेदाणाही भिजला असून नवीन छाटलेल्या द्राक्षबागेस गारपीटीने इजा झाल्याने त्यांचेही पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी विकास सोसायटीचे अध्यक्ष आनंदराव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे आदी उपस्थित होते.कवठेमहांकाळ तालुक्यातील माळेवाडी येथील शेतकरी प्रशांत माळी यांची दीड एकर द्राक्षबाग शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात भुईसपाट झाली. त्यामुळे या शेतकऱ्याचे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रविवारी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. संजयकाका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे यांनी भेट दिली. यावेळी मंत्री खोत यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनपातळीवरून मदत देण्याचे आश्वासन दिले.तसेच घाटनांद्रे येथील शेतकरी सोपान शिंदे यांनी कर्जाला कंटाळून शनिवारी आत्महत्या केली होती. मंत्री खोत व खा. पाटील यांनी त्यांच्या घरीही भेट देऊन त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याची ग्वाही दिली. तसेच नांगोळे येथे घराचे पत्रे उडालेल्या लोकांच्या घरीही मंत्री खोत यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे, सूरज पाटील, शिवाजी पाटील, अशोक खाडे, जोतिराम जाधव, सचिन पाटील, अक्षय बनसर, किरण इंगवले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते. (वार्ताहर)शेतकऱ्यांसाठी सर्व ती मदतनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनपातळीवरून मदत देण्यासाठी प्रयत्न करू. तसेच घाटनांद्रे (ता. कवठेमहांकाळ) येथील आत्महत्या केलेल्या सोपान शिंदे या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत मिळवून देण्याचे आश्वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. शनिवारी झालेल्या वळवाच्या पावसाने व वादळी वाऱ्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी व त्या शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी मंत्री खोत आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत खा. संजयकाका पाटील होते.