शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ मदत देणार

By admin | Updated: April 2, 2017 23:46 IST

सदाभाऊ खोत : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यामधील अवकाळीग्रस्त भागाला भेट

तासगाव/ कवठेमहांकाळ : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार संजयकाका पाटील यांनी सावळज (ता. तासगाव) व कवठेमहांकाळ तालुक्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्षबागांची पाहणी केली. यावेळी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन तात्काळ मदत करण्याचे आश्वासन मंत्री खोत यांनी दिले.शनिवारी तासगाव व कवठेमहांकाळ तालका परिसरात वादळी वारे आणि गारपीटीसह अवकाळी पावसाने तडाखा दिला होता. या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांचे नुकसान झाले, तर अनेक शेतकऱ्यांच्या बागा उखडून पडल्या. या पार्श्वभूमीवर रविवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार संजयकाका पाटील यांनी सावळज येथे भेट देऊन, येथील नुकसान झालेल्या विजय पाटील आणि सरपंच हेमंत पाटील यांच्या द्राक्षबागेची पाहणी केली. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक एन. टी. शिसोदे, तहसीलदार सुधाकर भोसले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. तसेच येथील मृत शेतकरी विठ्ठल मोरे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.यावेळी बोलताना ना. सदाभाऊ खोत म्हणाले, अवकाळी पावसाने तासगाव तालुक्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. सावळज परिसरात गारपीट आणि पावसाने द्राक्षबागांचे नुकसान झाले असून, सर्व बागांचे आणि इतर पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. दोन दिवसात अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर केली जाईल. तसेच मृत विठ्ठल मोरे या शेतकऱ्याच्या वारसांना गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेतून मदत देण्याचे आदेश तहसीलदार भोसले यांना त्यांनी दिले.यावेळी खा. संजयकाका पाटील म्हणाले, द्राक्षबागा पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बेदाणाही भिजला असून नवीन छाटलेल्या द्राक्षबागेस गारपीटीने इजा झाल्याने त्यांचेही पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी विकास सोसायटीचे अध्यक्ष आनंदराव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे आदी उपस्थित होते.कवठेमहांकाळ तालुक्यातील माळेवाडी येथील शेतकरी प्रशांत माळी यांची दीड एकर द्राक्षबाग शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात भुईसपाट झाली. त्यामुळे या शेतकऱ्याचे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रविवारी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. संजयकाका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे यांनी भेट दिली. यावेळी मंत्री खोत यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनपातळीवरून मदत देण्याचे आश्वासन दिले.तसेच घाटनांद्रे येथील शेतकरी सोपान शिंदे यांनी कर्जाला कंटाळून शनिवारी आत्महत्या केली होती. मंत्री खोत व खा. पाटील यांनी त्यांच्या घरीही भेट देऊन त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याची ग्वाही दिली. तसेच नांगोळे येथे घराचे पत्रे उडालेल्या लोकांच्या घरीही मंत्री खोत यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे, सूरज पाटील, शिवाजी पाटील, अशोक खाडे, जोतिराम जाधव, सचिन पाटील, अक्षय बनसर, किरण इंगवले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते. (वार्ताहर)शेतकऱ्यांसाठी सर्व ती मदतनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनपातळीवरून मदत देण्यासाठी प्रयत्न करू. तसेच घाटनांद्रे (ता. कवठेमहांकाळ) येथील आत्महत्या केलेल्या सोपान शिंदे या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत मिळवून देण्याचे आश्वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. शनिवारी झालेल्या वळवाच्या पावसाने व वादळी वाऱ्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी व त्या शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी मंत्री खोत आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत खा. संजयकाका पाटील होते.