शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ मदत देणार

By admin | Updated: April 2, 2017 23:46 IST

सदाभाऊ खोत : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यामधील अवकाळीग्रस्त भागाला भेट

तासगाव/ कवठेमहांकाळ : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार संजयकाका पाटील यांनी सावळज (ता. तासगाव) व कवठेमहांकाळ तालुक्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्षबागांची पाहणी केली. यावेळी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन तात्काळ मदत करण्याचे आश्वासन मंत्री खोत यांनी दिले.शनिवारी तासगाव व कवठेमहांकाळ तालका परिसरात वादळी वारे आणि गारपीटीसह अवकाळी पावसाने तडाखा दिला होता. या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांचे नुकसान झाले, तर अनेक शेतकऱ्यांच्या बागा उखडून पडल्या. या पार्श्वभूमीवर रविवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार संजयकाका पाटील यांनी सावळज येथे भेट देऊन, येथील नुकसान झालेल्या विजय पाटील आणि सरपंच हेमंत पाटील यांच्या द्राक्षबागेची पाहणी केली. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक एन. टी. शिसोदे, तहसीलदार सुधाकर भोसले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. तसेच येथील मृत शेतकरी विठ्ठल मोरे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.यावेळी बोलताना ना. सदाभाऊ खोत म्हणाले, अवकाळी पावसाने तासगाव तालुक्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. सावळज परिसरात गारपीट आणि पावसाने द्राक्षबागांचे नुकसान झाले असून, सर्व बागांचे आणि इतर पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. दोन दिवसात अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर केली जाईल. तसेच मृत विठ्ठल मोरे या शेतकऱ्याच्या वारसांना गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेतून मदत देण्याचे आदेश तहसीलदार भोसले यांना त्यांनी दिले.यावेळी खा. संजयकाका पाटील म्हणाले, द्राक्षबागा पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बेदाणाही भिजला असून नवीन छाटलेल्या द्राक्षबागेस गारपीटीने इजा झाल्याने त्यांचेही पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी विकास सोसायटीचे अध्यक्ष आनंदराव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे आदी उपस्थित होते.कवठेमहांकाळ तालुक्यातील माळेवाडी येथील शेतकरी प्रशांत माळी यांची दीड एकर द्राक्षबाग शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात भुईसपाट झाली. त्यामुळे या शेतकऱ्याचे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रविवारी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. संजयकाका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे यांनी भेट दिली. यावेळी मंत्री खोत यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनपातळीवरून मदत देण्याचे आश्वासन दिले.तसेच घाटनांद्रे येथील शेतकरी सोपान शिंदे यांनी कर्जाला कंटाळून शनिवारी आत्महत्या केली होती. मंत्री खोत व खा. पाटील यांनी त्यांच्या घरीही भेट देऊन त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याची ग्वाही दिली. तसेच नांगोळे येथे घराचे पत्रे उडालेल्या लोकांच्या घरीही मंत्री खोत यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे, सूरज पाटील, शिवाजी पाटील, अशोक खाडे, जोतिराम जाधव, सचिन पाटील, अक्षय बनसर, किरण इंगवले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते. (वार्ताहर)शेतकऱ्यांसाठी सर्व ती मदतनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनपातळीवरून मदत देण्यासाठी प्रयत्न करू. तसेच घाटनांद्रे (ता. कवठेमहांकाळ) येथील आत्महत्या केलेल्या सोपान शिंदे या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत मिळवून देण्याचे आश्वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. शनिवारी झालेल्या वळवाच्या पावसाने व वादळी वाऱ्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी व त्या शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी मंत्री खोत आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत खा. संजयकाका पाटील होते.