शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
4
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
5
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
6
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
7
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
8
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
9
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
10
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
11
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
12
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
13
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
14
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
15
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
16
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
17
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
18
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
19
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
20
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...

जिल्हा बँकांसाठी तरतूद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2016 04:35 IST

नोटाबंदीमुळे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांना दररोज लाखो रुपयांच्या व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा तोटा

सांगली : नोटाबंदीमुळे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांना दररोज लाखो रुपयांच्या व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अंदाजपत्रकात तरतूद करावी, अशी मागणी माजी ग्रामविकास व अर्थमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी केली. सहकारी क्षेत्रावर अविश्वास दाखवून ज्या राष्ट्रीयीकृत व नागरी बँकांच्या व्यवस्थेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास दाखविला, त्याच व्यवस्थेकडून नोटांच्या बॅगाच्या बॅगा बदलून काळ्याचे पांढरे करण्यात आल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली. सांगली जिल्हा बँकेच्या कार्यालय नूतनीकरणाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी झाले, या वेळी ते बोलत होते. नोटाबंदीचे शेवटचे चार दिवस शिल्लक आहेत. जिल्हा बँकांना नोटा बदलून देण्यास व भरून घेण्यास बंदी घालण्यात आली. त्यामुळे राज्यातील २८ हजार गावांतील जनतेला नोटा बदलण्यासाठी त्रास सहन करावा लागला. सांगली जिल्हा बँकेत ३१५ कोटी रुपये जमा झाले. त्याचा दररोजच्या सहा लाख रुपये व्याजाचा भुर्दंड बँकेला सहन करावा लागत आहे. राज्यातील इतर जिल्हा बँकांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. आपल्याकडील बँकांची स्थिती भक्कम आहे. पण मराठवाडा, विदर्भातील जिल्हा बँकांची स्थिती पाहता, त्या पुन्हा सुरू होतील की नाही, अशी शंका आहे. (प्रतिनिधी)मोदींनी जाब विचारावा : जयंत पाटीलगेल्या दोन आठवड्यांत नव्याकोऱ्या कोट्यवधींच्या दोन हजार रुपयांच्या नोटांची बंडले सापडू लागली आहेत. सामान्य माणसे बँकेसमोर रांगेत आहेत. त्यांना दोन हजार रुपये देताना बँकांचे हात जड होत आहेत. मग इतक्या मोठ्या प्रमाणात नव्या नोटा बाहेर कशा आल्या? या व्यवस्थेला मोदी जाब विचारणार आहेत का? - जयंत पाटील, माजी मंत्री