शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकांसाठी तरतूद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2016 04:35 IST

नोटाबंदीमुळे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांना दररोज लाखो रुपयांच्या व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा तोटा

सांगली : नोटाबंदीमुळे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांना दररोज लाखो रुपयांच्या व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अंदाजपत्रकात तरतूद करावी, अशी मागणी माजी ग्रामविकास व अर्थमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी केली. सहकारी क्षेत्रावर अविश्वास दाखवून ज्या राष्ट्रीयीकृत व नागरी बँकांच्या व्यवस्थेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास दाखविला, त्याच व्यवस्थेकडून नोटांच्या बॅगाच्या बॅगा बदलून काळ्याचे पांढरे करण्यात आल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली. सांगली जिल्हा बँकेच्या कार्यालय नूतनीकरणाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी झाले, या वेळी ते बोलत होते. नोटाबंदीचे शेवटचे चार दिवस शिल्लक आहेत. जिल्हा बँकांना नोटा बदलून देण्यास व भरून घेण्यास बंदी घालण्यात आली. त्यामुळे राज्यातील २८ हजार गावांतील जनतेला नोटा बदलण्यासाठी त्रास सहन करावा लागला. सांगली जिल्हा बँकेत ३१५ कोटी रुपये जमा झाले. त्याचा दररोजच्या सहा लाख रुपये व्याजाचा भुर्दंड बँकेला सहन करावा लागत आहे. राज्यातील इतर जिल्हा बँकांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. आपल्याकडील बँकांची स्थिती भक्कम आहे. पण मराठवाडा, विदर्भातील जिल्हा बँकांची स्थिती पाहता, त्या पुन्हा सुरू होतील की नाही, अशी शंका आहे. (प्रतिनिधी)मोदींनी जाब विचारावा : जयंत पाटीलगेल्या दोन आठवड्यांत नव्याकोऱ्या कोट्यवधींच्या दोन हजार रुपयांच्या नोटांची बंडले सापडू लागली आहेत. सामान्य माणसे बँकेसमोर रांगेत आहेत. त्यांना दोन हजार रुपये देताना बँकांचे हात जड होत आहेत. मग इतक्या मोठ्या प्रमाणात नव्या नोटा बाहेर कशा आल्या? या व्यवस्थेला मोदी जाब विचारणार आहेत का? - जयंत पाटील, माजी मंत्री