शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

मतदान घेऊन पुन्हा बहुमत सिद्ध करावे

By admin | Updated: November 15, 2014 02:35 IST

विश्वासदर्शक ठरावादरम्यान संवैधानिक तरतुदींचे उल्लंघन करण्यात आल्याने राज्यातील भाजपा सरकार असंवैधानिक आहे. त्यामुळे भाजपाला मतदानाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत,

मुंबई : विश्वासदर्शक ठरावादरम्यान संवैधानिक तरतुदींचे उल्लंघन करण्यात आल्याने राज्यातील भाजपा सरकार असंवैधानिक आहे. त्यामुळे भाजपाला मतदानाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी 
आग्रही मागणी काँग्रेसने शुक्रवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली. 
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. या वेळी पक्षाच्या वतीने राज्यपालांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. विश्वासदर्शक ठरावावर आवाजी मतदान घेण्यात आले. त्या वेळी फक्त ठरावाच्या बाजूने असलेल्यांच्या आवाजाचीच दखल घेण्यात आली व विरोधी आवाजाची नोंदच घेण्यात आली नाही. त्यामुळे ध्वनिमताची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे शिष्टमंडळाने राज्यपालांना सांगितले.
काँग्रेसच्या सदस्यांनी विहित वेळेत व तातडीने मतविभाजनाची मागणी केली. परंतु, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचे शिष्टमंडळाने राज्यपालांच्या निदशर्नास आणून दिले. या पाश्र्वभूमीवर राज्यपालांनी भाजपाला तातडीने पुन्हा प्रत्यक्ष मतदानाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत आणि तोवर या सरकारचे सर्व धोरणात्मक निर्णय स्थगित करून त्यांना नवे निर्णय घेण्यास प्रतिबंध घालावा, अशीही मागणी काँग्रेसने केली. (प्रतिनिधी)
 
विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी काँग्रेस आमदारांनी विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. या ठरावाच्या वेळी झालेल्या गोंधळाकडे राज्यपालांचे लक्ष वेधणो इतकाच उद्देश होता, असे सांगतानाच याप्रसंगी राज्यपालांना झालेल्या धक्काबुक्कीबद्दल शिष्टमंडळाने खेद व्यक्त केला.