शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

विचारवंतापेक्षा आचारवंत मोठा

By admin | Updated: April 26, 2015 01:21 IST

‘विचारवंतापेक्षा आचारवंत केव्हाही मोठा असतो. आचारवंत आपल्या कृतीत विचार उतरवतात. त्यातून समाजाला पुढे नेण्याचे कार्य करतात.

पुणे : ‘विचारवंतापेक्षा आचारवंत केव्हाही मोठा असतो. आचारवंत आपल्या कृतीत विचार उतरवतात. त्यातून समाजाला पुढे नेण्याचे कार्य करतात. शाहीर द. ना. गव्हाणकर, अमर शेख आणि अण्णा भाऊ साठे हेही आचारवंतच होते. त्यांनी त्यांचे विचार आचरणातून मांडले. अशी थोर मंडळी ज्यांनी त्याग करून महाराष्ट्र घडविला, त्यांचा वारसा जपला पाहिजे, पुढे नेला पाहिजे. राजकारणापेक्षा सांस्कृतिकीकरणाकडे आपला ओढा असायला हवा,’’ असे मत संत वाङ्मयाचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांनी व्यक्त केले.लोकशाहीर द. ना. गव्हाणकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डॉ. माधव पोतदारलिखित ‘लोकशाहीर द. ना. गव्हाणकर’ पुस्तकाचे अखिल भारतीय मराठी शाहिरी परिषदेचे अध्यक्ष दादा पासलकर यांच्या हस्ते शनिवारी प्रकाशन झाले. गव्हाणकरांचे कुटुंबीय व मानसगंध प्रकाशनाच्या वतीने हा प्रकाशन सोहळा झाला. ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे अध्यक्षस्थानी होते. प्रा. श्रीकांत नाईक, गव्हाणकर यांचे पुत्र विनय व जावई अरुण नेवाळकर, लेखक माधव पोतदार, डॉ. मनीषा पोतदार आदी उपस्थित होते. कामत म्हणाले, ‘‘ठराविक लोकांचा उदो उदो करून काहींना प्रकाशात, तर काहींना उपेक्षित ठेवण्याचे राजकारण नेहमीच होते. सत्तेच्या राजकारणासाठी याचा वापर करणाऱ्या बेरक्या मंडळींनी अशांचा ताबा घेतला आहे. केवळ द्वेष, असूया आकस राखून प्रगती होईल का? आजच्या समाजातील खरी लढाई ही सत्तापिपासू, आयतोबा आणि उपेक्षित, बकाल आयुष्य जगलेल्या लोकांमधील आहे. आजच्या काळात अण्णा, अमर व दत्ता गव्हाणकर यांच्या समाजातील लोकांना हे समजायला हवे, की धर्म नव्हे, तर मर्म व कर्म ओळखायला हवे. ’’ (प्रतिनिधी)४उपेक्षितांचे चरित्रसंवाद, अवघड विषयांवरचे विश्लेषण डॉ. माधव पोतदार समर्थपणे करीत आहेत. उपेक्षितांना आपलेसे करून त्यांनी लेखन केले; मात्र त्याची म्हणावी तशी दखल घेण्यात आली नाही. ते कायमच उपेक्षित संशोधक राहिले. अमर शेख, अण्णा भाऊ साठे व आता द. ना. गव्हाणकर या तिन्ही शाहिरांवर संशोधनात्मक लिहिणाऱ्या पोतदारांची दखल घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्राने त्यांची दखल घेऊन त्यांना पुरस्कृत करायला हवे. दखलीची फिकर न करता झोकून देऊन लेखन करणाऱ्यांना दाद द्यायला हवी, असे ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांनी सांगितले.