शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

विचारवंतापेक्षा आचारवंत मोठा

By admin | Updated: April 26, 2015 01:21 IST

‘विचारवंतापेक्षा आचारवंत केव्हाही मोठा असतो. आचारवंत आपल्या कृतीत विचार उतरवतात. त्यातून समाजाला पुढे नेण्याचे कार्य करतात.

पुणे : ‘विचारवंतापेक्षा आचारवंत केव्हाही मोठा असतो. आचारवंत आपल्या कृतीत विचार उतरवतात. त्यातून समाजाला पुढे नेण्याचे कार्य करतात. शाहीर द. ना. गव्हाणकर, अमर शेख आणि अण्णा भाऊ साठे हेही आचारवंतच होते. त्यांनी त्यांचे विचार आचरणातून मांडले. अशी थोर मंडळी ज्यांनी त्याग करून महाराष्ट्र घडविला, त्यांचा वारसा जपला पाहिजे, पुढे नेला पाहिजे. राजकारणापेक्षा सांस्कृतिकीकरणाकडे आपला ओढा असायला हवा,’’ असे मत संत वाङ्मयाचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांनी व्यक्त केले.लोकशाहीर द. ना. गव्हाणकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डॉ. माधव पोतदारलिखित ‘लोकशाहीर द. ना. गव्हाणकर’ पुस्तकाचे अखिल भारतीय मराठी शाहिरी परिषदेचे अध्यक्ष दादा पासलकर यांच्या हस्ते शनिवारी प्रकाशन झाले. गव्हाणकरांचे कुटुंबीय व मानसगंध प्रकाशनाच्या वतीने हा प्रकाशन सोहळा झाला. ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे अध्यक्षस्थानी होते. प्रा. श्रीकांत नाईक, गव्हाणकर यांचे पुत्र विनय व जावई अरुण नेवाळकर, लेखक माधव पोतदार, डॉ. मनीषा पोतदार आदी उपस्थित होते. कामत म्हणाले, ‘‘ठराविक लोकांचा उदो उदो करून काहींना प्रकाशात, तर काहींना उपेक्षित ठेवण्याचे राजकारण नेहमीच होते. सत्तेच्या राजकारणासाठी याचा वापर करणाऱ्या बेरक्या मंडळींनी अशांचा ताबा घेतला आहे. केवळ द्वेष, असूया आकस राखून प्रगती होईल का? आजच्या समाजातील खरी लढाई ही सत्तापिपासू, आयतोबा आणि उपेक्षित, बकाल आयुष्य जगलेल्या लोकांमधील आहे. आजच्या काळात अण्णा, अमर व दत्ता गव्हाणकर यांच्या समाजातील लोकांना हे समजायला हवे, की धर्म नव्हे, तर मर्म व कर्म ओळखायला हवे. ’’ (प्रतिनिधी)४उपेक्षितांचे चरित्रसंवाद, अवघड विषयांवरचे विश्लेषण डॉ. माधव पोतदार समर्थपणे करीत आहेत. उपेक्षितांना आपलेसे करून त्यांनी लेखन केले; मात्र त्याची म्हणावी तशी दखल घेण्यात आली नाही. ते कायमच उपेक्षित संशोधक राहिले. अमर शेख, अण्णा भाऊ साठे व आता द. ना. गव्हाणकर या तिन्ही शाहिरांवर संशोधनात्मक लिहिणाऱ्या पोतदारांची दखल घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्राने त्यांची दखल घेऊन त्यांना पुरस्कृत करायला हवे. दखलीची फिकर न करता झोकून देऊन लेखन करणाऱ्यांना दाद द्यायला हवी, असे ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांनी सांगितले.