शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

विचारवंतापेक्षा आचारवंत मोठा

By admin | Updated: April 26, 2015 01:21 IST

‘विचारवंतापेक्षा आचारवंत केव्हाही मोठा असतो. आचारवंत आपल्या कृतीत विचार उतरवतात. त्यातून समाजाला पुढे नेण्याचे कार्य करतात.

पुणे : ‘विचारवंतापेक्षा आचारवंत केव्हाही मोठा असतो. आचारवंत आपल्या कृतीत विचार उतरवतात. त्यातून समाजाला पुढे नेण्याचे कार्य करतात. शाहीर द. ना. गव्हाणकर, अमर शेख आणि अण्णा भाऊ साठे हेही आचारवंतच होते. त्यांनी त्यांचे विचार आचरणातून मांडले. अशी थोर मंडळी ज्यांनी त्याग करून महाराष्ट्र घडविला, त्यांचा वारसा जपला पाहिजे, पुढे नेला पाहिजे. राजकारणापेक्षा सांस्कृतिकीकरणाकडे आपला ओढा असायला हवा,’’ असे मत संत वाङ्मयाचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांनी व्यक्त केले.लोकशाहीर द. ना. गव्हाणकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डॉ. माधव पोतदारलिखित ‘लोकशाहीर द. ना. गव्हाणकर’ पुस्तकाचे अखिल भारतीय मराठी शाहिरी परिषदेचे अध्यक्ष दादा पासलकर यांच्या हस्ते शनिवारी प्रकाशन झाले. गव्हाणकरांचे कुटुंबीय व मानसगंध प्रकाशनाच्या वतीने हा प्रकाशन सोहळा झाला. ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे अध्यक्षस्थानी होते. प्रा. श्रीकांत नाईक, गव्हाणकर यांचे पुत्र विनय व जावई अरुण नेवाळकर, लेखक माधव पोतदार, डॉ. मनीषा पोतदार आदी उपस्थित होते. कामत म्हणाले, ‘‘ठराविक लोकांचा उदो उदो करून काहींना प्रकाशात, तर काहींना उपेक्षित ठेवण्याचे राजकारण नेहमीच होते. सत्तेच्या राजकारणासाठी याचा वापर करणाऱ्या बेरक्या मंडळींनी अशांचा ताबा घेतला आहे. केवळ द्वेष, असूया आकस राखून प्रगती होईल का? आजच्या समाजातील खरी लढाई ही सत्तापिपासू, आयतोबा आणि उपेक्षित, बकाल आयुष्य जगलेल्या लोकांमधील आहे. आजच्या काळात अण्णा, अमर व दत्ता गव्हाणकर यांच्या समाजातील लोकांना हे समजायला हवे, की धर्म नव्हे, तर मर्म व कर्म ओळखायला हवे. ’’ (प्रतिनिधी)४उपेक्षितांचे चरित्रसंवाद, अवघड विषयांवरचे विश्लेषण डॉ. माधव पोतदार समर्थपणे करीत आहेत. उपेक्षितांना आपलेसे करून त्यांनी लेखन केले; मात्र त्याची म्हणावी तशी दखल घेण्यात आली नाही. ते कायमच उपेक्षित संशोधक राहिले. अमर शेख, अण्णा भाऊ साठे व आता द. ना. गव्हाणकर या तिन्ही शाहिरांवर संशोधनात्मक लिहिणाऱ्या पोतदारांची दखल घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्राने त्यांची दखल घेऊन त्यांना पुरस्कृत करायला हवे. दखलीची फिकर न करता झोकून देऊन लेखन करणाऱ्यांना दाद द्यायला हवी, असे ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांनी सांगितले.