शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विचारवंतापेक्षा आचारवंत मोठा

By admin | Updated: April 26, 2015 01:21 IST

‘विचारवंतापेक्षा आचारवंत केव्हाही मोठा असतो. आचारवंत आपल्या कृतीत विचार उतरवतात. त्यातून समाजाला पुढे नेण्याचे कार्य करतात.

पुणे : ‘विचारवंतापेक्षा आचारवंत केव्हाही मोठा असतो. आचारवंत आपल्या कृतीत विचार उतरवतात. त्यातून समाजाला पुढे नेण्याचे कार्य करतात. शाहीर द. ना. गव्हाणकर, अमर शेख आणि अण्णा भाऊ साठे हेही आचारवंतच होते. त्यांनी त्यांचे विचार आचरणातून मांडले. अशी थोर मंडळी ज्यांनी त्याग करून महाराष्ट्र घडविला, त्यांचा वारसा जपला पाहिजे, पुढे नेला पाहिजे. राजकारणापेक्षा सांस्कृतिकीकरणाकडे आपला ओढा असायला हवा,’’ असे मत संत वाङ्मयाचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांनी व्यक्त केले.लोकशाहीर द. ना. गव्हाणकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डॉ. माधव पोतदारलिखित ‘लोकशाहीर द. ना. गव्हाणकर’ पुस्तकाचे अखिल भारतीय मराठी शाहिरी परिषदेचे अध्यक्ष दादा पासलकर यांच्या हस्ते शनिवारी प्रकाशन झाले. गव्हाणकरांचे कुटुंबीय व मानसगंध प्रकाशनाच्या वतीने हा प्रकाशन सोहळा झाला. ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे अध्यक्षस्थानी होते. प्रा. श्रीकांत नाईक, गव्हाणकर यांचे पुत्र विनय व जावई अरुण नेवाळकर, लेखक माधव पोतदार, डॉ. मनीषा पोतदार आदी उपस्थित होते. कामत म्हणाले, ‘‘ठराविक लोकांचा उदो उदो करून काहींना प्रकाशात, तर काहींना उपेक्षित ठेवण्याचे राजकारण नेहमीच होते. सत्तेच्या राजकारणासाठी याचा वापर करणाऱ्या बेरक्या मंडळींनी अशांचा ताबा घेतला आहे. केवळ द्वेष, असूया आकस राखून प्रगती होईल का? आजच्या समाजातील खरी लढाई ही सत्तापिपासू, आयतोबा आणि उपेक्षित, बकाल आयुष्य जगलेल्या लोकांमधील आहे. आजच्या काळात अण्णा, अमर व दत्ता गव्हाणकर यांच्या समाजातील लोकांना हे समजायला हवे, की धर्म नव्हे, तर मर्म व कर्म ओळखायला हवे. ’’ (प्रतिनिधी)४उपेक्षितांचे चरित्रसंवाद, अवघड विषयांवरचे विश्लेषण डॉ. माधव पोतदार समर्थपणे करीत आहेत. उपेक्षितांना आपलेसे करून त्यांनी लेखन केले; मात्र त्याची म्हणावी तशी दखल घेण्यात आली नाही. ते कायमच उपेक्षित संशोधक राहिले. अमर शेख, अण्णा भाऊ साठे व आता द. ना. गव्हाणकर या तिन्ही शाहिरांवर संशोधनात्मक लिहिणाऱ्या पोतदारांची दखल घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्राने त्यांची दखल घेऊन त्यांना पुरस्कृत करायला हवे. दखलीची फिकर न करता झोकून देऊन लेखन करणाऱ्यांना दाद द्यायला हवी, असे ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांनी सांगितले.