शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गावठाणातील २०१२ पूर्वीच्या घरांना संरक्षण

By admin | Updated: April 1, 2016 01:43 IST

नवी मुंबईतील गावठाणमध्ये अनधिकृतपणे बांधकाम करून उभारलेल्या प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, डिसेंबर २०१२ पूर्वी बांधलेल्या

मुंबई : नवी मुंबईतील गावठाणमध्ये अनधिकृतपणे बांधकाम करून उभारलेल्या प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, डिसेंबर २०१२ पूर्वी बांधलेल्या घरांनाच सरकार सरंक्षण देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. या निर्णयाचा फायदा प्रकल्पग्रस्त २० हजार कुटुंबांना होणार आहे.नवी मुंबईतील भाजपा आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक, प्रशांत ठाकूर, शशिकांत शिंदे यांनी ही बांधकामे नियमित करण्यासंबंधीची लक्षवेधी सूचना सभागृहात मांडली होती. ही बांधकामे पाडू नयेत आणि त्यांचा सिटी सर्व्हे करावा, अशी त्यांची मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी उत्तरात सांगितले की, गावठाणमधील घरे नियमित करताना त्याचे काय परिणाम होतील, याचा अहवाल येत्या पंधरा दिवसांत येणार आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो न्यायालयात सादर केला जाईल. गावठाणच्या हद्दीसंदर्भात नागरिकांशी चर्चा करण्यात येईल, अन्यथा वाद सुरूच राहतील, असे सांगतानाच नागरिकांच्या सूचना, दावे आदी गोष्टी नक्कीच विचारात घेतल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. हद्द ठरविण्यासाठी सिडको एजन्सी नियुक्त करेल. याबाबतचा शासन निर्णय जारी केल्यानंतर या कामाला सुरु वात होईल. मात्र, डिसेंबर २०१२ पूर्वीच्या घरांवर सरकार कुठलीही कारवाई करणार नाही. ही घरे कुठली, याचे सर्वेक्षण केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. यापूर्वी सर्वेक्षणाचे अनेक प्रयत्न झाले, पण आपली घरे जातील, या शंकेने त्या वेळी नागरिकांनी सहकार्य केले नव्हते, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)