शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गावठाणातील २०१२ पूर्वीच्या घरांना संरक्षण

By admin | Updated: April 1, 2016 01:43 IST

नवी मुंबईतील गावठाणमध्ये अनधिकृतपणे बांधकाम करून उभारलेल्या प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, डिसेंबर २०१२ पूर्वी बांधलेल्या

मुंबई : नवी मुंबईतील गावठाणमध्ये अनधिकृतपणे बांधकाम करून उभारलेल्या प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, डिसेंबर २०१२ पूर्वी बांधलेल्या घरांनाच सरकार सरंक्षण देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. या निर्णयाचा फायदा प्रकल्पग्रस्त २० हजार कुटुंबांना होणार आहे.नवी मुंबईतील भाजपा आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक, प्रशांत ठाकूर, शशिकांत शिंदे यांनी ही बांधकामे नियमित करण्यासंबंधीची लक्षवेधी सूचना सभागृहात मांडली होती. ही बांधकामे पाडू नयेत आणि त्यांचा सिटी सर्व्हे करावा, अशी त्यांची मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी उत्तरात सांगितले की, गावठाणमधील घरे नियमित करताना त्याचे काय परिणाम होतील, याचा अहवाल येत्या पंधरा दिवसांत येणार आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो न्यायालयात सादर केला जाईल. गावठाणच्या हद्दीसंदर्भात नागरिकांशी चर्चा करण्यात येईल, अन्यथा वाद सुरूच राहतील, असे सांगतानाच नागरिकांच्या सूचना, दावे आदी गोष्टी नक्कीच विचारात घेतल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. हद्द ठरविण्यासाठी सिडको एजन्सी नियुक्त करेल. याबाबतचा शासन निर्णय जारी केल्यानंतर या कामाला सुरु वात होईल. मात्र, डिसेंबर २०१२ पूर्वीच्या घरांवर सरकार कुठलीही कारवाई करणार नाही. ही घरे कुठली, याचे सर्वेक्षण केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. यापूर्वी सर्वेक्षणाचे अनेक प्रयत्न झाले, पण आपली घरे जातील, या शंकेने त्या वेळी नागरिकांनी सहकार्य केले नव्हते, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)