शहरं
Join us  
Trending Stories
1
जलप्रलय! पूर आणि भूस्खलनामुळे ३६ जणांचा मृत्यू; लाखो लोक झाले बेघर, ६ जवान बेपत्ता
2
भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!
3
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
4
आजचा अग्रलेख: काम, कळा आणि ‘पिशवी’; महिलांच्या शारीरिक आणि भावनिक वेदनांचे वास्तव
5
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
6
पतीने जबरदस्तीने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, झाला खूप रक्तस्त्राव; २३ वर्षीय महिलेचा मृत्यू
7
Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’
8
कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले
9
सोने खरेदीदारांसाठी 'सुवर्ण' संधी! दर १२,००० रुपयांनी स्वस्त होणार? 'या' ४ कारणांमुळे पडणार फरक
10
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
11
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतर ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
12
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
13
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
14
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
15
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
16
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
17
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
18
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
19
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
20
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'

आंतरजातीय जोडप्यांना संरक्षण

By admin | Updated: April 17, 2017 02:44 IST

आंतरजातीय विवाह केलेल्यांवर हल्ले होणे, अ‍ॅट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल होणे, सामाजिक बहिष्कार यासारखे प्रकार टाळण्यासाठी व मुलीचे संरक्षण होण्यासाठी शासनाने

संदीप भालेराव, नाशिकआंतरजातीय विवाह केलेल्यांवर हल्ले होणे, अ‍ॅट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल होणे, सामाजिक बहिष्कार यासारखे प्रकार टाळण्यासाठी व मुलीचे संरक्षण होण्यासाठी शासनाने आता आंतरजातीय जोडप्यांसाठी स्वतंत्र कायदा करण्याची तयारी चालविली आहे. गावबंदी, कुटुंबांकडून येणाऱ्या धमक्या तसेच प्रसंगी ‘आॅनर किलिंग’पासून त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी शासन अ‍ॅट्रॉसिटीच्या धर्तीवर आंतरजातीय विवाह कायद्याची निर्मिती करीत आहे. त्याची समितीदेखील स्थापन झाली असून, समाजकल्याण मंत्री आणि अधिकारी, कायदेतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नवा कायदा तयार केला जाणार आहे. समाजातील जातीय दुरावा कमी व्हावा, सलोखा निर्माण व्हावा यासाठी आंतरजातीय विवाहाला कायद्यान्वये मान्यता असून शासनाकडून अनेक सुविधा, आर्थिक मदत दिली जाते. १आंतरजातीय विवाह करणाऱ्यांची नोंदणी १९५५ च्या विशेष विवाह कायद्यांतर्गत केली जाते. मात्र त्यामुळे त्यांना संरक्षण मिळत नाही. त्यांची केवळ नोंदणीच होते. त्यांच्यावरील अत्याचाराच्या घटना रोखता आलेल्या नाहीत. २१९१९च्या काळात आंतरजातीय विवाहांना बेकादेशीर ठरविले जात होते. त्यांना कायदेशीर करण्यासाठी शाहू महाराजांनी स्वतंत्र कायदा केला होता. त्यासाठी त्यांनी रुढीपरंपरांना फाटा दिला होता. समाजसुधारणेतील हे एक क्रांतिकारक पाऊल मानले गेले.३आंतरजातीय जोडप्यांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या समितीमध्ये सामाजिक न्यायमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री, विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, सामाजिक न्याय विभागाचे सचिव, आदिवासी विभागाचे सचिव, विधी खात्याचे सचिव, समाजकल्याण आयुक्त आणि बार्टीचे महासंचालक यांचा समावेश आहे. ४आता शासनाने स्वतंत्र कायदा तयार करून अशा जोडप्यांना भयमुक्त करण्याच्यादृष्टीने पाऊल उचलले आहे. त्यांचे वैयक्तिक आणि सामाजिक संरक्षण नव्या कायद्यामुळे होणार आहे.