शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

आंतरजातीय जोडप्यांना संरक्षण

By admin | Updated: April 17, 2017 02:44 IST

आंतरजातीय विवाह केलेल्यांवर हल्ले होणे, अ‍ॅट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल होणे, सामाजिक बहिष्कार यासारखे प्रकार टाळण्यासाठी व मुलीचे संरक्षण होण्यासाठी शासनाने

संदीप भालेराव, नाशिकआंतरजातीय विवाह केलेल्यांवर हल्ले होणे, अ‍ॅट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल होणे, सामाजिक बहिष्कार यासारखे प्रकार टाळण्यासाठी व मुलीचे संरक्षण होण्यासाठी शासनाने आता आंतरजातीय जोडप्यांसाठी स्वतंत्र कायदा करण्याची तयारी चालविली आहे. गावबंदी, कुटुंबांकडून येणाऱ्या धमक्या तसेच प्रसंगी ‘आॅनर किलिंग’पासून त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी शासन अ‍ॅट्रॉसिटीच्या धर्तीवर आंतरजातीय विवाह कायद्याची निर्मिती करीत आहे. त्याची समितीदेखील स्थापन झाली असून, समाजकल्याण मंत्री आणि अधिकारी, कायदेतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नवा कायदा तयार केला जाणार आहे. समाजातील जातीय दुरावा कमी व्हावा, सलोखा निर्माण व्हावा यासाठी आंतरजातीय विवाहाला कायद्यान्वये मान्यता असून शासनाकडून अनेक सुविधा, आर्थिक मदत दिली जाते. १आंतरजातीय विवाह करणाऱ्यांची नोंदणी १९५५ च्या विशेष विवाह कायद्यांतर्गत केली जाते. मात्र त्यामुळे त्यांना संरक्षण मिळत नाही. त्यांची केवळ नोंदणीच होते. त्यांच्यावरील अत्याचाराच्या घटना रोखता आलेल्या नाहीत. २१९१९च्या काळात आंतरजातीय विवाहांना बेकादेशीर ठरविले जात होते. त्यांना कायदेशीर करण्यासाठी शाहू महाराजांनी स्वतंत्र कायदा केला होता. त्यासाठी त्यांनी रुढीपरंपरांना फाटा दिला होता. समाजसुधारणेतील हे एक क्रांतिकारक पाऊल मानले गेले.३आंतरजातीय जोडप्यांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या समितीमध्ये सामाजिक न्यायमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री, विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, सामाजिक न्याय विभागाचे सचिव, आदिवासी विभागाचे सचिव, विधी खात्याचे सचिव, समाजकल्याण आयुक्त आणि बार्टीचे महासंचालक यांचा समावेश आहे. ४आता शासनाने स्वतंत्र कायदा तयार करून अशा जोडप्यांना भयमुक्त करण्याच्यादृष्टीने पाऊल उचलले आहे. त्यांचे वैयक्तिक आणि सामाजिक संरक्षण नव्या कायद्यामुळे होणार आहे.