शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा
2
VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
3
वयाच्या २३ व्या वर्षी 'शतकी रोमान्स'चा सिलसिला! यशस्वी जैस्वालनं कॅप्टन शुबमन गिलचा विक्रमही मोडला
4
छोटा राजनचा धाकटा भाऊ ठाकरेंच्या शिवसेनेत, प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
5
सासऱ्यांची ७ लाख कोटींची कंपनी, पत्नी अब्जाधीश; माजी पंतप्रधान मायक्रोसॉफ्टमध्ये करणार जॉब
6
इंजिनिअरच्या घरात सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग आणि सोनं-चांदीही जप्त
7
सावधान! दिवाळीत तुमच्या घरीही येऊ शकतं 'विष'; 'अशी' झटपट ओळखा भेसळयुक्त मिठाई
8
भारताचे मोठे पाऊल! काबुलमधील दूतावास पुन्हा सुरू होणार, अफगाणिस्तानशी 'दहशतवादा'वर चर्चा
9
निष्काळजीपणाचा कळस! सिरपनंतर आता गोळ्या... लाखो मुलांना दिलं टेस्टमध्ये फेल झालेलं औषध
10
“CJI गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी”: रामदास आठवले
11
डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक धक्का देणार! H-1B व्हिसा नियमांमध्ये आणखी बदल करण्याची तयारी
12
Yashasvi Jaiswal Record : यशस्वीचा मोठा पराक्रम; गांगुली- द्रविडसह गिल अन् विराटलाही टाकले मागे
13
LG Electronics IPO: एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओचं आज अलॉटमेंट, तुम्हाला मिळालेत का शेअर्स? कसं चेक कराल?
14
हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."
15
"ते माझ्यावर हसले...", ऑफिसमध्ये मानसिक आरोग्याबाबत तरुणीला आला वेदनादायी अनुभव
16
दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!
17
संजय राऊतांच्या गैरहजेरीत बैठका! ‘मातोश्री’वर केली महत्त्वाची खलबते, ठाकरे बंधूंनी डावललं?
18
KL राहुलनं सेंच्युरीत जमलं नाही ते केलं; पण क्लासला दांडी मारून आलेल्या चाहत्यांसमोर नको ते घडलं
19
प्लॅन A विष, प्लॅन B गोळीबार... नवऱ्याचा काटा काढण्यासाठी बायकोचा बॉयफ्रेंडसह भयंकर कट
20
...तर मग लाडक्या बहिणींना योजनेचे १५०० रुपये मिळणार नाहीत का? अजित पवारांनी दिले उत्तर

पर्यावरण संवर्धनासाठी प्राण्यांचे संरक्षण होणे गरजेचे - मुख्यमंत्री

By admin | Updated: March 26, 2017 03:20 IST

पर्यावरणाची परिस्थिती व निसर्ग साखळी चांगली राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक प्राण्याचे जतन होणे गरजेचे आहे.

मुंबई : पर्यावरणाची परिस्थिती व निसर्ग साखळी चांगली राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक प्राण्याचे जतन होणे गरजेचे आहे. अ‍ॅनिमल हॉस्पिटल तथा केअर सेंटरच्या निर्मितीकामी आवश्यक असलेली सर्वतोपरी मदत राज्य शासनामार्फत करण्यात येईल. राज्य शासनाच्या वन विभागाने जंगल आणि प्राण्यांच्या संरक्षणासाठी मोठा पुढाकार घेतला आहे. पूर्वी लोक वन्य प्राण्यांना शत्रू समजत असत, पण वन विभागाने याबाबत केलेल्या जनजागृतीमुळे आता जंगल आणि प्राण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी लोक स्वत:हून पुढे येत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.टाटा ट्रस्ट आणि पीपल फॉर अ‍ॅनिमल यांच्यामार्फत मुंबई येथे प्रस्तावित असलेल्या अ‍ॅनिमल हॉस्पिटल आणि केअर सेंटरचे भूमिपूजन शुक्रवारी हॉटेल ताज पॅलेस येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री मेनका गांधी, टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री मेनका गांधी म्हणाल्या, ‘निसर्गातील प्रत्येक प्राणी महत्त्वाचा आहे. निसर्गातील प्राण्याची एखादी प्रजाती नष्ट झाली, तर त्याचा पर्यावरणावर मोठा दूरगामी परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक प्राण्याचे जतन, संरक्षण आणि संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे,’ असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)