शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पाणथळ जागांचे संरक्षण करा

By admin | Updated: January 31, 2016 01:43 IST

पाणथळी जागांचे संरक्षण केलेच पाहिजे, असे म्हणत उच्च न्यायालयाने वादग्रस्त जागांवर न्यायालयाच्या परवानगीशिवाय बांधकाम करता येणार नाही, असे स्पष्ट केले.

मुंबई : पाणथळी जागांचे संरक्षण केलेच पाहिजे, असे म्हणत उच्च न्यायालयाने वादग्रस्त जागांवर न्यायालयाच्या परवानगीशिवाय बांधकाम करता येणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच या वादग्रस्त जागांवर बांधण्यात आलेल्या बांधकामांबाबत दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या ५४ केसेस एका महिन्यात निकाली काढण्याचा आदेशही उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायालयाला दिला.उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही पाणथळ जमिनीवर भराव टाकण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी कचराही टाकण्यात येत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्यात आल्याने अ‍ॅड. झमन अली यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते- ढेरे यांच्या खंडपीठापुढे होती. महापालिकेने बजावलेल्या ‘कारणे-दाखवा’ नोटीसला विकासक दिवाणी न्यायालयात आव्हान देऊन नोटीसवर स्थगिती मिळवत आहेत. त्यामुळे पाणथळीच्या जागांवर उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करणे शक्य नसल्याचे अ‍ॅड. अली यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणले. ‘२०१३ ते आतापर्यंतचे सगळे आदेश लक्षात घेतले तर राज्य सरकारला या जागांचे संरक्षण करण्याबाबत वारंवार सांगण्यात आले. असे असतानाही याचिकाकर्त्यांनी नमूद केलेल्या पाणथळीच्या जागांवर वेगाने बांधकाम सुरू आहे,’ असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. वसई येथील कनाकिया पार्क, एस्सेल वर्ल्ड,दहिसर लिंक रोड येथील गोराई पाणथळ जमीन, ठाण्यातील घोडबंदर रोड, विक्रोळी आणि मुलुंड येथील पाणथळीच्या जागांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे. या ठिकाणील पोलीस उपायुक्तांना पोलिसांचे एक पथक नेमून पाणथळीच्या जागांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश यापूर्वीच खंडपीठाने दिले होते. (प्रतिनिधी)आदेशांचे पालन कराउच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय पाणथळीच्या जागांवर बांधकाम करण्यास परवानगी देऊ नये, असा स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने २०१३ मध्ये दिला आहे.या आदेशानुसार नगरविकास विभागाने राज्यातील सर्व महापालिकांना, नगरपरिषद, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतांना पाणथळीच्या जागांवर बांधकाम करण्याची परवानगी देऊ नका, असा आदेश दिला. मात्र, या आदेशांचे पालन करण्यात आलेले नाही.